Skip to main content

चालू घडामोडी अश्विन शके १९४३ (ऑक्टोबर २०२१)

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 07/10/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा-दिवाळीच्या उत्सवी पर्वास सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व मिपाकरांवर श्री शारदा देवीची कृपा होवो.

वाचने 23011
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

काश्मीर मध्ये मुसलमानांनी गेल्या काही दिवसात 5 जणांची हत्या केली आहे, ज्यात 4 अल्पसंख्यक आहेत (3 हिंदू आणि 1 शीख).

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

काश्मिरात अतिरेक्यांनी शाळेतील मुस्लिम आणि गैर-मुस्लिम शिक्षकांना वेगवेगळे करून मुस्लिम शिक्षकांना जिवंत सोडले व गैर-मुस्लिम शिक्षकांना ठार मारले. मृत शिक्षकांच्या आत्म्यास मोक्षप्राप्ती होवो आणि गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होवो. https://www.opindia.com/2021/10/terrorists-shot-dead-principal-and-teac…

In reply to by वामन देशमुख

पण अशा घटना थांबवयला काही तरी पॉलीसी नक्कि निघायला हवी.

In reply to by गॉडजिला

पण अशा घटना थांबवयला काही तरी पॉलीसी नक्कि निघायला हवी.
असं करणारे पॉलिसी बद्दल अजिबात काळजी करत नाहीत. सुरवातीला यांनी कश्मीरीयत वगैरे बद्दल नाटकं केली. मग खरा जिहादी रंग दाखवला.आता पॉलिसी म्हणजे कशी? तर जिहादींना सगळ्यात महत्त्वाचं काय? तर धर्म. म्हणून तिथे घाव घालणे. या सगळ्यांना जिहादींना मेल्यानंतर स्वर्गलोक हवा असतो. फिलिपाईन्स मध्ये एका अमेरिकन जनरल ने एक प्रयोग केला. ही स्टोरी प्रेसिडेंट ट्रम्प यांनी अशी सांगितली होती: "during his time fighting the Muslim Moro tribesmen in the southern Philippines, Pershing caught 50 terrorists who did tremendous damage ... and he took the 50 terrorists and he took 50 men and dipped 50 bullets in pig’s blood. You heard about that? He took 50 bullets and dipped them in pig’s blood. And he had his men load up their rifles and he lined up 50 people and they shot 49 of those people. And the 50th person, he said, you go back to your people and you tell them what happened. And for 25 years there wasn’t a problem.” स्टोरी अर्थातच खोटी आहे. पण त्यातून एक धडा घेता येऊ शकतो. कोणता ते तुम्ही ठरवा.

In reply to by गॉडजिला

आपण विशीष्ट फलाना फलाना म्हणुन टारगेट नाही आहोत आपण शांततावादी नाही म्हणुन टारगेट आहोत…

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

आपला उपाय रामबाण इलाज वाटतो, आपल्या इतका मोठा माझा याबाबत अभ्यास नसल्याने आपल्या विरोधी तर नक्कीचं मला काही मुद्दा विचार करतां येणार नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

काश्मिरमधे मुस्लिम आतंकवाद्यांनी हत्या केलेल्या त्या मृत लोकांच्या परिवाराची सांत्वना करायला कॉंग्रेसी पिंकी व पप्पू कधी जाणारेत.

In reply to by प्रसाद_१९८२

माझ्या माहितीप्रमाणे जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राची आहे. आता बोट दाखवायला जागा नाहीय दुसरीकडे . आणि तरीही बीजेपी समर्थक का विचारत नाहीयेत प्रश्न पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ?कि बाबानो ३७० हटवल्यावर दहशतवाद संपला असं तुम्हीच म्हणाला होतात आणि का होताहेत अशा घटना?

In reply to by स्वप्निल रेडकर

काश्मीर मधील सुरक्षेची जबाबदारी नक्कीच भाजपा ची आहे, त्याबद्दल भाजपला प्रश्न विचारलेच पाहिजे. तशीच उत्तरप्रदेश मधील सुरक्षेची जबाबदारी पण भजपावरच आहे पण काँग्रेसी काश्मीर मध्ये भेटायला जाणार नाहीत. 2014 नंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झालीय का वाढली याचा अभ्यास व्हायला पाहिजे. 2014 नंतर देशात तरी अतिरेकी हल्ले कमीच झालेत याच श्रेय नक्कीच केंद्रीय यंत्रणांना आणि केंद्र सरकार द्यायला पाहिजे. केंद्रीय यंत्रणांनी कितीतरी अतिरेकी हल्ला करायच्या आधीच पकडले आहेत. 370 हटवल्यानंतर बटन दाबून बल्ब बंद केल्यासारखं दहशतवाद बंद होणार नाही पण कमी होण्यास कदाचित मदत होईल.

In reply to by स्वप्निल रेडकर

बाबानो ३७० हटवल्यावर

दहशतवाद संपला

असं तुम्हीच म्हणाला होतात असं कोण कुठे म्हणालं आहे याचा

एक तरी

दुवा देता येईल का? का तुम्हाला पण १८८ ची लागण झाली आहे?

In reply to by सुबोध खरे

काश्मीर मधील हिंसाचार थांबवणे,काश्मीर मधील हिंदू लोकांचे जीव वाचवणे ,त्यांना तिथे सुरक्षित वाटेल अशी कायदा सुव्यवस्था ठेवणे. हे विश्व गुरू च्या कुवती बाहेरच काम आहे . म्हणून ह्यांची गाडी राहुल जी का कश्मिर गेले नाहीत जे हिंदू दहशत वाद्यांचे शिकार बनले त्यांचे परिजनांस भेटायला हे रडगाणे चालू आहे. राहुल जी नेहमीच अन्यायग्रस्त लोकांच्या पाठी असतात . तुमचे विश्व गुरू,आणि स्वयं घोषित चाणक्य तरी कुठे गेले . हिंदुवादी आहात ना मग का नाही गेले काश्मीर मध्ये.

In reply to by सुबोध खरे

खरे सर आता तुम्ही मला शब्दात पकडताय :) .पण आपण सर्वच जाणतो कि ३७० रद्द करण्यामागचा सर्वात प्रमुख कारण दहशतवाद संपवणं हाच होता.कि नव्हता? हे असं होतंय आता कि ज्यांनी मोदींना मत दिली ते ब्लेम करताहेत नेहरू गांधींना आणि प्रश्न विचारताहेत पप्पू आणि पिंकीला. एवढी मोठी घटना होऊन एका ओळीचा ट्विट पण आलं नाहीय पीएमओ कडून. किंवा आपले गृहमंत्री अजून काश्मीर मध्ये गेले नाहीयेत. आणि हे माझं मत नाहीय तर वस्तुस्थिती आहे.मत सगळ्यांची असू शकतात आणि त्याचा आदर आहेच. कोणी मोदीजी ग्रेट म्हणत असतील तर तर ते त्यांचं मत असू शकत. पण हिंदूवरती हल्ला झालाय काश्मीर मध्ये अतिरेक्यांकडून आणि तिथल्या परिस्थिबद्दल चकार शब्द नाहीय अधिकृतरीत्या पीएम किंवा होम मिनिस्ट्री कडून एवढाच सांगायचं आहे. फक्त आय टी सेल्स ह्या न्युज चा फायदा घेऊन अजून अँटी मुस्लिम भावना भडकवायचं काम करताहेत बस्स. फक्त कल्पना करून बघा कि आता पीडीपी किंवा काँग्रेस सरकार असत जम्मू काश्मीर मध्ये तर मोदीजींची प्रतिक्रिया काय असली असती? https://www.indiatoday.in/india/story/india-eliminated-reason-terrorism… आता असं म्हणू नका कि दहशतवाद 'संपला" असं म्हणाले नाहीत . बाकी लोभ असावा.

In reply to by स्वप्निल रेडकर

पण आपण सर्वच जाणतो कि ३७० रद्द करण्यामागचा सर्वात प्रमुख कारण दहशतवाद संपवणं हाच होता. काय सांगता? एकाच देशात दोन ध्वज आणि दोन घटना चालतील म्हणा कि? भारतीय सर्वोकंच न्यायालयाच्या अधिकार कक्षेत फक्त काश्मीर येत नव्हते. का ? काश्मीरचा सवतासुभा का चालू द्यायचा होता? उद्या महाराष्ट्राने किंवा दुसऱ्या कोणत्याही राज्याने सांगितले कि बाहेरच्या माणसांना येथे कोणताही अधिकार नाही तर भारत हा एकसंध देश आहे असे कसे म्हणता येईल किंवा तो एकसंध राहील का ? दहशतवाद हा ९० च्या शतकापासून चालू झाला त्या आधी नव्हता मुळात ३७० कलम हे घटनेत घुसवले तेही तात्पुरतेच होते आणि ते रद्द करणे हे घटनात्मक कर्तव्य होते. काँग्रेसने लांगूलचालनाच्या राजनीतीपायी तेवढी हिम्मत दाखवली नाही. असो

In reply to by प्रसाद_१९८२

जीपला अतिरेकी बांधून फिरवला आणि नंतर त्याला मोदी सरकारने 10 लाख दिले होते आताही तेच बघतील

In reply to by hrkorde

आता हे बोलतील जम्मू काश्मीर सरकार म्हणजे मोदी सरकार का ?

In reply to by hrkorde

राहुल गांधी काश्मीर मध्ये का नाही गेल्या santvan करायला अशा पुड्या सोडणे चालू आहे. केंद्र शासित प्रदेशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी केंद्र सरकार ची आहे . काश्मीर मध्ये घडलेल्या हत्याकांड ला केंद्र सरकार जबाबदार आहे.केंद्रीय गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नाही देणार भारतात पहिल्यांदाच (अपवाद असू शकतो) केंद्रीय गृह मंत्री आणि त्यांचे असिस्टंट गृह मंत्री ह्यांच्या वर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. देशाला स्वतंत्र ह्याच साठी मिळाले का. अनेक लोकांनी हा दिवस बघण्यासाठी च देशासाठी प्राणाचे बलिदान देवून देश मुक्त केला होता का?

In reply to by hrkorde

Taking suo-moto cognisance of the incident, Jammu and Kashmir Human Rights Commission has asked the state government to pay a compensation of Rs 10 lakh to a local youth who was tied to the bonnet of an army jeep on April 9 as a human shield to avoid attack from stone-pelters.

त्याला मोदी सरकारने 10 लाख दिले होते

यातला

मूलभूत फरक

समजतो का आपल्याला नसेल तर चालू द्या तुमचे आत्मकुंथन

In reply to by श्रीगुरुजी

तुमची मत कधी ओपन समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म वर व्यक्त करा तुमचे पूर्ण ब्रेन वॉश करून तुम्हाला माणसात आणले जाईल.

In reply to by Rajesh188

भारत सरकार मध्ये गृह मंत्री असणाऱ्या व्यक्ती च्या मालकीच्या गाडी नी lokana चिरडले आहे. कोणी चरसी,बेवडा,श्रीमंती ची मस्ती असणाऱ्या,गुंड,लोकांच्या गाडी नी लोकांना चिरडले नाही. भारत सरकार मध्ये राज्य गृह मंत्री असणाऱ्या व्यक्ती चा संबंध आहे. जबाबदारी नी व्यक्त व्हाया. पक्ष ,निष्ठा बाजूला ठेवा. गंभीर बाब आहे ही.

In reply to by रंगीला रतन

त्यात विनोदी काय आहे हे दाखवून ध्या. पातळी सोडून प्रतिसाद देणार असाल तर . आम्हाला पण तोच मार्ग अवलंबवां लागेल. मग सर्व मिळून संपादक कडे जाता गाऱ्हाणी घेवून. दोन आयडी तर चुगल्या करण्यात एक्स्पर्ट आहेत. आम्ही पातळी सोडून व्यक्त व्हावं अशी तुमची इच्छा आहे का

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

यावर महाराष्ट्रातले महाभकास आघाडी सरकार दुखवट्याचा ठराव आणणार का? असे काही झाले म्हणून त्याचा निषेध म्हणून आघाडीतील तीन पक्ष महाराष्ट्र बंदची हाक देणार का? माझा स्वतःचा कोणत्याही कारणावरून पुकारलेल्या बंदना विरोधच असतो. पण हे पक्ष लखीमपूर खेरीवरून बंदची हाक देणार असतील तर मग काश्मीरमध्ये जे काही झाले त्याला दुजाभाव का? जाताजाता एका गोष्टीची आठवण करून देतो- जर कोणी विसरले असेलच तर. पंजाबमध्ये मोगा या ठिकाणी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १२ स्वयंसेवकांची जून १९८९ च्या शेवटच्या आठवड्यात हत्या केली होती. त्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी ३ जुलै १९८९ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज त्याच बाळ ठाकरेंचे पुत्र सत्तेत आहेत नाही का? आणि उठल्यासुटल्या बाळासाहेबांचे नाव ते घेत असतात. मग तशीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायची का?

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ॐ महिषघ्नी महामाये चामुण्डे मुण्डमालिनी। आयुरारोग्यविजयं देहि देवि! नमोऽस्तु ते॥ सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.

Up मध्ये शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्री असलेल्या व्यक्ती च्या मालकीच्या गाडी नी 8 भारतीय नागरिकांना चिरडून मारले हे येथील bjp समर्थक लोकांना सरळ प्रश्न आहे. बाकी राजकीय पक्षांना काय वाटते त्याच्या शी काही देणेघेणे नाही. सामान्य नागरिक म्हणून तुमचे मत सांगा.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या टीम कडे जरा लक्ष ध्या तुमच्या टीम मध्येच सर्व लोच्छा आहे.आणि तुमच्यात पण.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या टीम कडे जरा लक्ष ध्या तुमच्या टीम मध्येच सर्व लोच्छा आहे.आणि तुमच्यात पण.

RBI ने 21-22 साठी रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो रेट 4% तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% आहे. 10 वर्षाचा बेंचमार्क बॉण्ड सध्या 17 महिन्यातील सर्वोच्च अशा 6.30% ला आहे. रुपया बळकट होऊन 74.96 रुपये प्रति डॉलर या रेट वर आला.

In reply to by Ujjwal

IMPS ने पैसे पाठवणे मला वैयक्तीकरित्या नापसंत आहे. बँकेतून जे स्टेटमेंट येते त्यात हे पैसे कुणाला गेले ह्याचा नीट उलगडा होत नाही. NEFT ने पैसे पाठवल्यास त्याची पासबूकला योग्य प्रकारे नोंदणी होते. बँकींग क्षेत्राने यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.