Skip to main content

चालू घडामोडी अश्विन शके १९४३ (ऑक्टोबर २०२१)

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 07/10/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा-दिवाळीच्या उत्सवी पर्वास सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व मिपाकरांवर श्री शारदा देवीची कृपा होवो.

वाचने 23011
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by धर्मराजमुटके

कोणाकडून आले हेही नीट समजत नाही. आमच्या सोसायटीचे मेंटेनन्स बील अनेक जण IMPS ने भरतात. सोसायटीच्या पासबुक मधील IMPS नोंदींचा मेळ घालताना नाकी नऊ येतात.

मूडी ने भारताचे soverign rating outlook हा negative ऐवजी stable केला आहे. S&P चा outlook stable तर Fitch चा outlook negative आहे. भारताच्या real GDP तली नजीकच्या काळातली वाढ 6% राहण्याची शक्यता आहे असे मूडी ने म्हटले आहे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

चार वर्षांपूर्वी मूडीजनेच भारताचे सॉव्हरीन रेटींग अपग्रेड केले होते ते मोदींच्या काळात झाल्याने पिसाळलेल्या विचारवंतांनी मूडीजला जाब विचारायला ट्विटसचा पाऊस पाडला होता. फक्त गफलत अशी झाली होती की मूडीज या अमेरिकन रेटींग एजन्सीऐवजी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडीला त्यांनी ट्विट केले होते. नामसाधर्म्याचा फटका बिचार्‍या टॉम मूडीला बसला होता. मग टॉम मूडीने मी एक क्रिकेटपटू आहे, रेटींग एजन्सी नाही असे स्पष्टीकरण दिले होते. असला प्रकार करणार्‍या लोकांमध्ये भारतातील तथाकथित सर्वात जास्त साक्षर लोकांच्या केरळ राज्यातील लोक पुढे होते असेही वाचल्याचे आठवते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

नुकतीच हि बातमी वाचली. Acuité Ratings & Research became the first local credit rating company to be associated with the Principles for Responsible Investment (PRI), a United Nations-backed initiative that deals with ESG (Environment Social Governance) credit risk. याचा जागतिक पातळीवर आपल्याला काय फायदा होऊ शकतो? जगातल्या प्रमुख पत मूल्यांकन संस्था जसे मूडीज, फिच, स्टॅण्डर्ड अँड पुअर्स यांच्या तुलनेत ACUITE कुठे बसते याविषयी वाचायला आवडेल.

त्या साठी तर इंधनाचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवून लोकांची लूट करून देशाची अर्थ व्यवस्था कशी चांगली आहे असा भास निर्माण केला ..तो फक्त भास आहे. भारताची माहीत नाहि पण भारतीय लोकांची अर्थव्यवस्था आफ्रिकेतील गरीब देश पेक्षा वाईट आहे. फसवणूक करणे हा स्थायी भाव आहे सरकार चा. Moody नी भारताला चांगला दर्जा द्यावा म्हणून इंधनाचे दर वाढवले आहेत हे paid पत्रकार नसलेल्या प्रामाणिक मीडिया नी खूप पूर्वीच प्रसिद्ध केले आहे

In reply to by Rajesh188

कसलं जबराट लिहिता हो तुम्ही. इतकं जबराट लिहिता की कौशिक बसूंच्या कॉर्नेलमध्ये किंवा एम.आय.टीमध्ये अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अ‍ॅक्शन लॅबमध्ये अभिजीत बॅनर्जींबरोबर शोभून दिसाल. ...... कारण असले अतिउच्चशिक्षित प्रोफेसर लोकच इतके आचरट लिहू शकतात. इतर कोणात ती क्षमता असेल असे वाटत नाही. असल्या लोकांच्या कळपात सामील झाला नसाल तर केवळ हा एक प्रतिसाद त्यांना पाठवा- अगदी लाल गालिचे पांघरून तिथे तुमचे स्वागत होईल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कसलं जबराट लिहिता हो तुम्ही त्यांच अर्थशास्त्राचे ऑद्भुत ज्ञान बघुन मी पार भारावुन गेलो अणि अर्थशास्त्रात PhD कराय्ची इच्छा झाली. मला मार्गदर्शन कराल का? विचारले तर माझा प्रतिसाद उडव्ण्यात आला. सध्या सासं मंड्ळ हात धुवुन माझ्या मागे लागले आहे, रोज माझे प्रतिसाद उडवतात. आज पण एक उडवला. मस्त अर्थशास्त्रिय सिद्धांत मांड्तात राजेश गुरुजी. आपण तर फ्यान झालोय त्यांचे. कोरडे वहिनी त्यांच्या साथिला आल्यापसुन प्रभुंच्या लेखणीला भारीच धार चढ्ली आहे :=)

मी सुद्धा सरांना विचारलं ऑन्लाईन क्लास घेता का असं? पण अजुनही त्यांनी उत्तर दिलेल नाही.

स्थानिक न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन नाकारलाय. जामिनासाठी त्याला उद्या सत्र न्यायालयात अर्ज करावा लागेल.

मी आस ऐकलं होतं की कोर्ट सामान्य माणसाची केस असेल आणि जामिनासाठी अर्ज केला तर तो लवकर सुनावणीसाठी घेत नाही. कित्येक कैदी निर्दोष असूनही महिनोन्महिने जेल मध्ये केवळ वेळेत जमीन न मिळाल्यामुळे सडत राहतात. सलमान खान ला मुंबई session कोर्टाने 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एकाच दिवसात जामीन दिला होता. कुणाची केस सूनवण्यासाठी कधी घ्यायची ह्या बाबत काही नियम आहेत का? का जज साहेबांच्या मनानुसार कामकाज चालू असत?

In reply to by रात्रीचे चांदणे

मर्जीनुसार चालते म्हणजे अमक्या केस मध्ये अमुक कागद अजून आला नाही , म्हणून केस पेंडिंग आहे आणि अमुक केस मध्ये पूर्ण कागद आहेत म्हणून घेतली सलमान खानच्या केशीत सगळ्या अडकलेल्या मुविवाल्यानी लवकर तारीख द्या, हजारो करोड अडकलेत म्हणून केस केली होती असे ऐकून आहे

In reply to by रात्रीचे चांदणे

आज च मिरा बोरवणकर ह्यांची मत वाचनात आली. पोलिस खाते हे भ्रष्ट खाते आहे प्रामाणिक अधिकारी शोधायला लागतील . हा भ्रष्टाचार संपवला नाही तर भारताचे बनाना रिपब्लिक बनायला वेळ लागणार नाही मुळात चुकीची ,निष्पाप माणसांना पकडुन त्यांच्या वर आरोप लावणे. चुकीचे आरोप पात्र कोर्टात सादर करणे. विनाकारण कोठडी मागणे असे उद्योग पोलिस वाले करत असतात.

पालघरात 2 मेले तर दंगा करणारे लोक लखीमपुरात 8 मेले तरी गप्प आहेत

In reply to by hrkorde

पालघरात जे साधू मॉब लिंचिगमधे मारले गेले त्यांच्या नातेवाईकांची सांत्वना करायला 'राष्ट्रीय पप्पू व पिंकी' त्यांच्या घरी गेले होते काय ?

In reply to by प्रसाद_१९८२

सगळीकडे दर्शन देत फिरायला ते अंतर्यामी महाराज किंवा विश्वगुरु आहेत का ?

असे त्या मुळे तर बोलले जाते.दाऊद सारखे असंख्य गंभीर गुन्हे करणारे बिन्धास्त मोकळे फिरत असतात.आणि गरीब,(सर्व बाबतीत आर्थिक,मनगट शाही,) असतात ते किरकोळ गुन्ह्यात पण तुरुंगात असतात. ब्रिटिश लोकांच्या सरजाम शाही वृत्ती ची छाप भारतीय कायद्या वर पण आहे.

कोर्ट - आरोपी कुठे आहेत? सरकारी वकील साळवे - आरोपीना नोटीस पाठवली आहे कोर्ट - यापुढे खुनाच्या आरोपीना नोटीस पाठवणार का ? सकृतदर्शनी डेक्कन हेराल्डमध्ये गांधी दोषी दिसले म्हणून नाचणारे आता कुठे आहेत ? आता त्यांचे ते सकृत की यकृतदर्शन कुठे गेले ?

In reply to by hrkorde

पण योगी आणि भोगी सरकार देशाच्या सर्व यंत्रणांची वाट लावतील.देशाचा ढाचा ठिसूळ करतील.आणि नंतर देशाला सावरणे अवघड होईल. खुनाचा आरोप असणाऱ्या आरोपी ला योगी सरकार अटक करायचे सोडून नोटीस पाठवत आहे. आणि उन्माद नी बेफाम झालेले टाळ्या वाजवत आहेत.

In reply to by Rajesh188

पण योगी आणि भोगी सरकार देशाच्या सर्व यंत्रणांची वाट लावतील.देशाचा ढाचा ठिसूळ करतील.आणि नंतर देशाला सावरणे अवघड होईल.
मोदींचे कसे चुकले, ते कशी वाट लावत आहेत, त्यांनी काय करायला हवे होते, काय करायला नको होते वगैरे वगैरे लिहत गेल्या २० वर्षांत अनेक पत्रकारांची कारकिर्द झाली. तशीच तुमची इथे मिपावर कारकिर्द होत आहे. अशा लोकांना आणखी अनेक वर्षे अशीच आपली कारकिर्द घडवायची संधी मिळू दे आणि भविष्यात अमित शहा/योगी देऊ देत ही सदिच्छा.

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या (Mumbai Drug Party) संदर्भात दिवसागणिक धक्कादायक माहिती पुढं येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक स्फोटक दावा केला आहे. 'क्रूझवरील ड्रग पार्टीत भाजपच्या एका बड्या नेत्याचा मेहुणा होता. मात्र, त्याला सोडण्यात आलं,' असा दावा मलिक यांनी केला आहे. याबाबतचे व्हिडिओ पुरावे व त्या भाजप नेत्याचं नाव नवाब मलिक आज जाहीर करणार आहेत. (BJP Connection with Drug Party)

In reply to by hrkorde

स्फोटक दावा यांचा स्वतःचा जावई अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतल्यामुळे आतमध्ये आहे म्हणून जास्त फडफड करत आहेत. मंत्री असून जावयाला बाहेर काढता येत नाही आणि घरच्यांना तोंड दाखवायला लाज वाटते. म्हणून असले भंपक वक्तव्य करत आहेत. स्फोट करायला दोन दिवस थांबायची काय गरज आहे?

In reply to by श्रीगुरुजी

याच्याकडे भक्कम पुरावे असतील तर हा स्वच्छ अंघोळ करून न्यायालयात का जात नाही? बहुतेक भाऊ तोरसेकरांची वाट पाहात असतील. किंवा दोघात स्पर्धाही असेल. काय सांगावे.

In reply to by प्रसाद_१९८२

निवडणुकीनंतर भाजप किंवा राष्ट्रवादी आपल्याशी युती करतील याची खात्री असल्याने आपल्याविरूद्ध जनमत जात असले तरी शिवसेना त्याची पर्वा करीत नाही.

Nitin Gadkari He साहेब स्टेटमेंट देत आहे सरकार ला पेट्रोल डिझेल ची आयात कमी करायची आहे . म्हणजे थोडक्यात दरवाढ करून वापर कमी करायचा आहे. आयात कमी करायची आहे ठीक आहे मग देशाची एनर्जी ची गरज कधी भागवणार. ह्या वर मात्र हे कॉमेडी किंग काहीच बोलत नाहीत. कोणी तरी सिंग म्हणून उर्जा मंत्री आहे तो तर लय च कॉमेडी आहे. कोळसा उपलब्ध नसल्या मुळे थर्मल पॉवर प्रोजेक्ट बंद पडले काही.आणि राहिलेले थोड्याच तासात बंद पडतील.(१०० एक तासात) हे कॉमेडी ऊर्जा मंत्री स्टेट मेंट देत आहेत भारताला कोळसा क्षेत्रात स्वयं पूर्ण बनवायचे आहे म्हणून कोळसा आयात कमी केली आहे. भारत स्वयं पूर्ण झाला का तर कोळसा का कमी पडतोय. पुढे तर लय च कॉमेडी आहे. आम्ही रोज कोळसा पुरवतो स्टॉक करून ठेवत नाही. पॉवर प्लांट चा आज किती कोळसा संपला तेवढं दुसऱ्या दिवशी पुरवतो नी स्टॉक. पॉवर प्लांट आहेत ते म्हशी च तबेला नाही. लोक दूध पण घरात दोन एक दिवस अजुन पुरेल एवढे ठेवतात . आणि तिसरे कॉमेडी किंग चाणक्य. हे म्हणतात अशिक्षित लोक देशावर बोजा आहेत. असतील बिचारे. ना त्यांना बँका लुटायला येत,ना कर्ज बुडवता येत,ना जमिनी हडप करता येत.,त्या मुळे अशिक्षित लोक देशावर बोजा असतील,चाणक्य म्हणतात म्हणजे ते खरेच असणार.

म्हणजे भारताच्या तमाम जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशाने satelite अवकाशात सोडले आहेत . आणि त्यांचा स्पेक्ट्रम वापरून तमाम गोदी मीडिया .रिपब्लिक भारत,पासून अगदी आज तक पर्यंत. फक्त मोदी चाच उदो उदो करत असतात. मुंबई ,ठाणे मध्ये बंद १००% यशस्वी झाला आहे लोकांच्या करातून उभारलेल्या infrastructure च फायदा घेवून न्यूज चॅनेल चे दुकान चालवणाऱ्या अर्णव सारख्या बाकी बटिक लोकांचे मोदी पुराण काही संपत नाही. त्यांना बंद यशस्वी झाला आहे हे दाखवायची पण गरज वाटतं नाही बीबीसी किंवा बाकी तस्तम मीडिया नी भारतीय जणते ची सेवा करावी आणि सत्य स्थिती जगाला दाखवावी.

आजच्या संपाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड किंवा तत्सम ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे. आजपर्यंत विरोधी पक्ष संप करत असत असे उदाहरण होते. मात्र ज्यांचे सरकार आहे त्याच पक्षांनी बंद पुकारावा हे माझ्या माहितीत बहुधा पहिल्यांदाच होत आहे. (चुकभुल द्यावी घ्यावी.)

In reply to by धर्मराजमुटके

आजच्या संपाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड किंवा तत्सम ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे. आजपर्यंत विरोधी पक्ष संप करत असत असे उदाहरण होते. मात्र ज्यांचे सरकार आहे त्याच पक्षांनी बंद पुकारावा हे माझ्या माहितीत बहुधा पहिल्यांदाच होत आहे. (चुकभुल द्यावी घ्यावी.)
सत्ताधारी पक्षानेच बंदची हाक द्यायचा गुडघ्यातला प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. बंगालमध्ये कम्युनिस्टांची राजवट असताना अनेकदा सरकारी बंद आयोजित केले जायचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अहो आक्खे सरकार गुढघ्यातले आहे ... त्याला ते तरी काय करणार? जयंत पाटील म्हणतात "हा बंद महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी आयोजित केला आहे ... त्याचा सरकार शी काहीही संबंध नाही" असले बरळणे पप्पु किंवा सामनाचे कार्यकारी संपादक नेहेमी करत असतात ... यात अजुन एकाची भर. म्हणजे बंद आहे / बंद झाला / १०० टक्के यशस्वी वगेरे बोलत उड्या मारायच्या आणी जबाब्दारीची वेळ आली की "आम्हाला नाय म्हाईत बॉ" म्हणत खाका वर करायच्या ...

शेतकऱ्यांना चिरडून मारणारे bjp चे नेते आणि केंद्रीय गृह मंत्री असलेला व्यक्ती चा मुलगा आहे.. . केंद्रात त्यांचेच सरकार आहे त्यांच्या साठी ही घटना म्हणजे उन्माद उस्तवं आहे.. मग ज्यांना ह्या देशाची चिंता वाटते,गरिबांच्या जीवाची किंमत वाटते ते निषेध करण्यासाठी बंद करणार च. सत्तेवर असले म्हणून काय झाले. मी तर bjp पक्षाला थोडा जरी कळवळा असेल त्यांनी सुद्धा केंद्र सरकार आणि योगी सरकार विरुद्ध यूपी बंद ची हाक दिली पाहिजे.