Skip to main content

चालू घडामोडी अश्विन शके १९४३ (ऑक्टोबर २०२१)

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 07/10/2021 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा-दिवाळीच्या उत्सवी पर्वास सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व मिपाकरांवर श्री शारदा देवीची कृपा होवो.

वाचने 23120
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद_१९८२

सगळीकडे दर्शन देत फिरायला ते अंतर्यामी महाराज किंवा विश्वगुरु आहेत का ?

असे त्या मुळे तर बोलले जाते.दाऊद सारखे असंख्य गंभीर गुन्हे करणारे बिन्धास्त मोकळे फिरत असतात.आणि गरीब,(सर्व बाबतीत आर्थिक,मनगट शाही,) असतात ते किरकोळ गुन्ह्यात पण तुरुंगात असतात. ब्रिटिश लोकांच्या सरजाम शाही वृत्ती ची छाप भारतीय कायद्या वर पण आहे.

कोर्ट - आरोपी कुठे आहेत? सरकारी वकील साळवे - आरोपीना नोटीस पाठवली आहे कोर्ट - यापुढे खुनाच्या आरोपीना नोटीस पाठवणार का ? सकृतदर्शनी डेक्कन हेराल्डमध्ये गांधी दोषी दिसले म्हणून नाचणारे आता कुठे आहेत ? आता त्यांचे ते सकृत की यकृतदर्शन कुठे गेले ?

In reply to by hrkorde

पण योगी आणि भोगी सरकार देशाच्या सर्व यंत्रणांची वाट लावतील.देशाचा ढाचा ठिसूळ करतील.आणि नंतर देशाला सावरणे अवघड होईल. खुनाचा आरोप असणाऱ्या आरोपी ला योगी सरकार अटक करायचे सोडून नोटीस पाठवत आहे. आणि उन्माद नी बेफाम झालेले टाळ्या वाजवत आहेत.

In reply to by Rajesh188

पण योगी आणि भोगी सरकार देशाच्या सर्व यंत्रणांची वाट लावतील.देशाचा ढाचा ठिसूळ करतील.आणि नंतर देशाला सावरणे अवघड होईल.
मोदींचे कसे चुकले, ते कशी वाट लावत आहेत, त्यांनी काय करायला हवे होते, काय करायला नको होते वगैरे वगैरे लिहत गेल्या २० वर्षांत अनेक पत्रकारांची कारकिर्द झाली. तशीच तुमची इथे मिपावर कारकिर्द होत आहे. अशा लोकांना आणखी अनेक वर्षे अशीच आपली कारकिर्द घडवायची संधी मिळू दे आणि भविष्यात अमित शहा/योगी देऊ देत ही सदिच्छा.

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या (Mumbai Drug Party) संदर्भात दिवसागणिक धक्कादायक माहिती पुढं येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक स्फोटक दावा केला आहे. 'क्रूझवरील ड्रग पार्टीत भाजपच्या एका बड्या नेत्याचा मेहुणा होता. मात्र, त्याला सोडण्यात आलं,' असा दावा मलिक यांनी केला आहे. याबाबतचे व्हिडिओ पुरावे व त्या भाजप नेत्याचं नाव नवाब मलिक आज जाहीर करणार आहेत. (BJP Connection with Drug Party)

In reply to by hrkorde

स्फोटक दावा यांचा स्वतःचा जावई अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतल्यामुळे आतमध्ये आहे म्हणून जास्त फडफड करत आहेत. मंत्री असून जावयाला बाहेर काढता येत नाही आणि घरच्यांना तोंड दाखवायला लाज वाटते. म्हणून असले भंपक वक्तव्य करत आहेत. स्फोट करायला दोन दिवस थांबायची काय गरज आहे?

In reply to by सुबोध खरे

याच्याकडे भक्कम पुरावे असतील तर हा स्वच्छ अंघोळ करून न्यायालयात का जात नाही?

In reply to by श्रीगुरुजी

याच्याकडे भक्कम पुरावे असतील तर हा स्वच्छ अंघोळ करून न्यायालयात का जात नाही? बहुतेक भाऊ तोरसेकरांची वाट पाहात असतील. किंवा दोघात स्पर्धाही असेल. काय सांगावे.


In reply to by प्रसाद_१९८२

निवडणुकीनंतर भाजप किंवा राष्ट्रवादी आपल्याशी युती करतील याची खात्री असल्याने आपल्याविरूद्ध जनमत जात असले तरी शिवसेना त्याची पर्वा करीत नाही.

Nitin Gadkari He साहेब स्टेटमेंट देत आहे सरकार ला पेट्रोल डिझेल ची आयात कमी करायची आहे . म्हणजे थोडक्यात दरवाढ करून वापर कमी करायचा आहे. आयात कमी करायची आहे ठीक आहे मग देशाची एनर्जी ची गरज कधी भागवणार. ह्या वर मात्र हे कॉमेडी किंग काहीच बोलत नाहीत. कोणी तरी सिंग म्हणून उर्जा मंत्री आहे तो तर लय च कॉमेडी आहे. कोळसा उपलब्ध नसल्या मुळे थर्मल पॉवर प्रोजेक्ट बंद पडले काही.आणि राहिलेले थोड्याच तासात बंद पडतील.(१०० एक तासात) हे कॉमेडी ऊर्जा मंत्री स्टेट मेंट देत आहेत भारताला कोळसा क्षेत्रात स्वयं पूर्ण बनवायचे आहे म्हणून कोळसा आयात कमी केली आहे. भारत स्वयं पूर्ण झाला का तर कोळसा का कमी पडतोय. पुढे तर लय च कॉमेडी आहे. आम्ही रोज कोळसा पुरवतो स्टॉक करून ठेवत नाही. पॉवर प्लांट चा आज किती कोळसा संपला तेवढं दुसऱ्या दिवशी पुरवतो नी स्टॉक. पॉवर प्लांट आहेत ते म्हशी च तबेला नाही. लोक दूध पण घरात दोन एक दिवस अजुन पुरेल एवढे ठेवतात . आणि तिसरे कॉमेडी किंग चाणक्य. हे म्हणतात अशिक्षित लोक देशावर बोजा आहेत. असतील बिचारे. ना त्यांना बँका लुटायला येत,ना कर्ज बुडवता येत,ना जमिनी हडप करता येत.,त्या मुळे अशिक्षित लोक देशावर बोजा असतील,चाणक्य म्हणतात म्हणजे ते खरेच असणार.

म्हणजे भारताच्या तमाम जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशाने satelite अवकाशात सोडले आहेत . आणि त्यांचा स्पेक्ट्रम वापरून तमाम गोदी मीडिया .रिपब्लिक भारत,पासून अगदी आज तक पर्यंत. फक्त मोदी चाच उदो उदो करत असतात. मुंबई ,ठाणे मध्ये बंद १००% यशस्वी झाला आहे लोकांच्या करातून उभारलेल्या infrastructure च फायदा घेवून न्यूज चॅनेल चे दुकान चालवणाऱ्या अर्णव सारख्या बाकी बटिक लोकांचे मोदी पुराण काही संपत नाही. त्यांना बंद यशस्वी झाला आहे हे दाखवायची पण गरज वाटतं नाही बीबीसी किंवा बाकी तस्तम मीडिया नी भारतीय जणते ची सेवा करावी आणि सत्य स्थिती जगाला दाखवावी.

आजच्या संपाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड किंवा तत्सम ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे. आजपर्यंत विरोधी पक्ष संप करत असत असे उदाहरण होते. मात्र ज्यांचे सरकार आहे त्याच पक्षांनी बंद पुकारावा हे माझ्या माहितीत बहुधा पहिल्यांदाच होत आहे. (चुकभुल द्यावी घ्यावी.)

In reply to by धर्मराजमुटके

आजच्या संपाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड किंवा तत्सम ठिकाणी नोंद व्हायला पाहिजे. आजपर्यंत विरोधी पक्ष संप करत असत असे उदाहरण होते. मात्र ज्यांचे सरकार आहे त्याच पक्षांनी बंद पुकारावा हे माझ्या माहितीत बहुधा पहिल्यांदाच होत आहे. (चुकभुल द्यावी घ्यावी.)
सत्ताधारी पक्षानेच बंदची हाक द्यायचा गुडघ्यातला प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. बंगालमध्ये कम्युनिस्टांची राजवट असताना अनेकदा सरकारी बंद आयोजित केले जायचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अहो आक्खे सरकार गुढघ्यातले आहे ... त्याला ते तरी काय करणार? जयंत पाटील म्हणतात "हा बंद महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी आयोजित केला आहे ... त्याचा सरकार शी काहीही संबंध नाही" असले बरळणे पप्पु किंवा सामनाचे कार्यकारी संपादक नेहेमी करत असतात ... यात अजुन एकाची भर. म्हणजे बंद आहे / बंद झाला / १०० टक्के यशस्वी वगेरे बोलत उड्या मारायच्या आणी जबाब्दारीची वेळ आली की "आम्हाला नाय म्हाईत बॉ" म्हणत खाका वर करायच्या ...

शेतकऱ्यांना चिरडून मारणारे bjp चे नेते आणि केंद्रीय गृह मंत्री असलेला व्यक्ती चा मुलगा आहे.. . केंद्रात त्यांचेच सरकार आहे त्यांच्या साठी ही घटना म्हणजे उन्माद उस्तवं आहे.. मग ज्यांना ह्या देशाची चिंता वाटते,गरिबांच्या जीवाची किंमत वाटते ते निषेध करण्यासाठी बंद करणार च. सत्तेवर असले म्हणून काय झाले. मी तर bjp पक्षाला थोडा जरी कळवळा असेल त्यांनी सुद्धा केंद्र सरकार आणि योगी सरकार विरुद्ध यूपी बंद ची हाक दिली पाहिजे.

In reply to by प्रसाद_१९८२

शेतकऱ्यांना चिरडले तो व्हिडिओ त्याच्या अकाउंट वरून share केला होता का ?नसेल केला तर त्याच्या ह्या व्हिडिओ ला काहीच किंमत देण्याची गरज नाही.

सरकार आणि पक्ष ह्या वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं पाहिजेत.आपल्याच पक्षाचे सरकार लोकांविरुद्ध निर्णय घेत असेल,लोकांवर अन्याय करत असेल तर पक्षाचे कर्तव्य आहे त्याचा विरोध करणे.स्व पक्षाचे सरकार आहे म्हणून मतिमंद सारखं सरकार च्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन पक्ष करत असेल त्या पक्षात आणि गाढवाच्या झुंडीत काय फरक आहे.

In reply to by Rajesh188

मला तुमचं फार कौतुक वाटत, स्वतःची जरा पण न वापरता कस काय राहू शकता तुम्ही.

मी आज संध्याकाळपासून अनेक प्रतिसाद या धाग्यावर लिहिले आहेत पण दरवेळेस एरर येत आहे आणि माझा प्रतिसाद पोस्ट होत नाही तर नुसता मथळा येत आहे. इतर सभासदांचे प्रतिसाद पोस्ट होत आहेत. नक्की काय प्रकार आहे? की माझे विचार हल्ली मिपाच्या संपादकांना मान्य नाहीत म्हणून असे होत आहे? हा पण प्रतिसाद पोस्ट होईल की नाही याची खात्री नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काहीही झाले की संपादक मंडळाच्या नावाने बोटे मोडायला सुरुवात करायची, मिपावर आजकाल हा नवा ट्रेंड बघायला मिळत आहे प्रतिसाद प्रकाशित करताना काहीवेळा अडचणी येतात, विशेषतः मोबाईल वरुन प्रतिसाद दिले, त्यात स्माईलिंचा वापर केला, की फक्त विषय प्रकाशित होतो पण कॉमेंट मधले काही येत नाही असे बर्‍याच वेळा होते. जुन्या सदस्यांना किमान इतके तरी माहित असलेच पाहिजे. तरीही जर का असा संशय होता, तर त्याचे निराकरण करण्याचे इतर मार्ग उपलब्ध आहेत. पण त्या मार्गांचा वापर न करता जाहिर पणे थेट संपादक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. जणु काही सगळे संपादक आपले कामधंदे सोडून चालु चिखलफेकीचे धागे २४ तास मोठ्या चवीने वाचत बसलेले असतात आणि अमुक सदस्याने प्रतिसाद दिला रे दिला की तो संपादित करतात. या व्यतिरीक्त संपादक मंडळ निद्रिस्त आहे , भेदभाव करते, अमुक विचारांच्या / प्रकारच्या लोकांवरच कारवाई करते, काही सदस्यांना मोकाट सोडते, अमक्याबरोबर कट्टा केला की त्याचा आयडी उडत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जाहिर पणे देण्याची जणू मिपावर अहमहिकाच लागलेली आहे. आणि असे प्रतिसाद देण्यात मिपाचे अनेक जेष्ठ आणि माननिय सदस्य आजकाल धन्यता मानु लागले आहेत. अशा सर्व सदस्यांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा व प्रतिसाद प्रकाशित करण्याआधि कमीत कमी दोन वेळा वाचून काढावा व तारतम्याने विचार करुन मगच तो प्रतिसाद प्रकाशित करावा. मिपावर आम्ही दोन घटका चांगल्या जाव्या, काहितरी छान वाचायला मिळावे या अपेक्षेने येतो, पण मिपा उघडले की समोर पहिल्यांदी येते ती चिखलफेकच. त्या मूळे इतर अनेक चांगले धागे खाली फेकले जातात. चांगल्या लेखकांचा उत्साहभंग होतो व वाचकांच्या पदरी पडते ती केवळ निराशाच. कधी कधी तर ही चिखलफेक किळस यावी इतक्या खालच्या थराला जाते, इतकी की काही प्रतिसाद लिहिले तरी कसे असतील? असा प्रश्र्ण पडतो. चालु चिखल फेकीच्या धाग्यांची अवस्था सध्या अति झाले आणि हसु आले इतकी केविलवाणी होत चालली आहे. तेव्हा सर्व चिखलकुस्तीगिरांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया थोडा संयम बाळगावा. हा प्रतिसाद केवळ चंसुकुंसाठी नसून अशा सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ माननिय सदस्यां करता आहे जे या चिखलफेकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अगदी १०० % योग्य आणि महत्वाचा प्रतिसाद. सहमती आहेच. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (मिपाकर)

In reply to by गवि

काही सदस्य कोणतेही पुरावे दुवे न देता बेफाट विधाने करत आहेत त्यावर संपादक मंडळ कोणतीही कृती करत नाही. स्वतः कोणतेही लेख न लिहिता किंवा अभ्यासपूर्वक विचार न मांडता कोणत्याही धाग्यावर वाटेल ती विधाने करून चांगल्या धाग्यांचा विचका केला जातो आहे असे असून संपादक मंडळ काहीही करत नाही यामुळेच अशी धुळवड खेळली जाते असे मी स्पष्टपणे म्हणतो आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वतः कोणतेही लेख न लिहिता किंवा अभ्यासपूर्वक विचार न मांडता कोणत्याही धाग्यावर वाटेल ती विधाने करून चांगल्या धाग्यांचा विचका केला जातो आहे असे असून संपादक मंडळ काहीही करत नाही यामुळेच अशी धुळवड खेळली जाते असे मी स्पष्टपणे म्हणतो आहे.
हे लक्षात न घेणार्‍यांनाच नि:पक्षपाती वगैरे म्हटले जाते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काही सदस्यांसाठी मिपा हे व्यासपीठ फक्त आणि फक्त आपली मते मांडण्यासाठीच आहे असे दिसते. ना कोणत्या चांगल्या लेखांचा, काव्यांचा आस्वाद घ्यायचा ना स्वतः आपल्या लेखनातून कोणत्याही प्रकारची साहित्यनिर्मिती करायची. हे सर्व फुकट आहे किमान याची तरी जाण प्रत्येकाने ठेवावी अशी अपेक्षा आहे. सं - दी - प

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मान्य. काल मी तो प्रतिसाद बराच वेळ घालवून लिहिलेला होता आणि प्रकाशित करा वर क्लिक केल्यावर एरर येत होती. असे किमान दहा वेळा झाले असावे आणि त्याचवेळेस इतर सगळ्यांचे प्रतिसाद येत होते त्यामुळे तो उद्वेग होता.
हा प्रतिसाद केवळ चंसुकुंसाठी नसून अशा सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ माननिय सदस्यां करता आहे जे या चिखलफेकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात.
याचा अर्थ मी चिखलफेकीत सहभागी होत आहे असे थेट तुम्ही लिहिले आहे. असो. तुम्हाला काय वाटायचे असेल ते वाटू दे. त्यावर माझे नियंत्रण नाही. मी काल लिहिलेला एक प्रतिसाद तुम्हाला चिखलफेक वाटत असेल तर त्याच्या शेकडो नाही हजारो पटींनी शूर, कोर्डे वगैरे ५०-१०० आयडींनी केलेल्या चिखलफेकीविरूध्द तुम्ही कधी काही लिहिल्याचे कधी वाचनात आले नाही. हे म्हणजे आकंठ दारूत बुडलेल्यांना काही न बोलता चुकून एखादा घोट कधीतरी घेतला तर तो माणूस कसा दारूडा असे म्हटल्यासारखे झाले. तेव्हा...
अशा सर्व सदस्यांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा व प्रतिसाद प्रकाशित करण्याआधि कमीत कमी दोन वेळा वाचून काढावा व तारतम्याने विचार करुन मगच तो प्रतिसाद प्रकाशित करावा.
हे तुम्ही स्वतः केले आहे की नाही हा प्रश्न नक्कीच पडतो. स्पष्टच लिहितो. दुसर्‍यांना चिखलफेकीत सहभागी असलेले वगैरे वाटेल ते लिहिण्यापूर्वी जरा आरशात बघा ही विनंती. आणि हे मान्य नसेल तर माझ्या प्रतिसादांना उत्तर द्यायची तसदी घेऊ नये ही पण विनंती. बाकी सतत कोणाला तरी जज करणार्‍यांना फाट्यावर मारत आहे. पूर्णविराम.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+ १ कागलकर वारंवार नवीन अवतार धारण करून येतो, यथेच्छ अर्वाच्य चिखलफेक करतो, चांगल्या लेखाची वाट लावतो, हकालपट्टी ओढवून घेतो आणि नंतर निर्लज्जासारखा परत येऊन तेच करतो. दुर्दैवाने फारसे कोणी त्याला विरोध करताना दिसत नाही. उलठ काही महाभाग त्याचे समर्थक आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे म्हणजे आकंठ दारूत बुडलेल्यांना काही न बोलता चुकून एखादा घोट कधीतरी घेतला तर तो माणूस कसा दारूडा असे म्हटल्यासारखे झाले.
यात काय चुकीचे आहे? आपण सहसा त्यालाच बोलतो ज्याच्या कडुन सुधारणेची अपेक्षा असते. जेव्हा जेव्हा तुम्ही इथे काही चांगले लिहिले आहे तेव्हा तेव्हा मी तुमचे कौतुक देखिल केलेच आहे. एखाद्या ज्ञानपिठ विजेत्या लेखकाने जर पिवळी पुस्तके लिहायला घेतली आणि तरी त्याचा कोणी निशेध करु नये अशी अपेक्षा असेल तर ते होणार नाही. स्पष्टच लिहितो तुम्ही काय किंवा श्रीगुरुजी काय किंवा डॉ खरे काय तुमच्या सारख्या विद्वान लोकांकडुन माझ्या सारख्या सामान्य वाचकाची वेगळी अपेक्षा असते. तुम्हा लोकांची सध्या जी घसरगुंडी सुरु आहे ती पाहिली की वाईट वाटते. इतकीच विनंती की वेळेत स्वतःला सावरा आणि तुमच्या कडच्या ज्ञानाचा आम्हालाही आनंद घेउ द्या. दुसरे काय लिहितात या कडे दुर्लक्ष करा थोडेसे, त्यांचे काय व्हायचे ते आपोआप होईलच. या उप्पर जर तुम्ही धुळवड सुरुच ठेवली तर मी तुम्हाला सुध्दा काहीही सल्ला द्यायला येणार नाही याची खात्री बाळगा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद! अज्ञानी प्रतिसादांकडे कितीही दुर्लक्ष केले तरी काही वेळा ते असह्य होतं व त्यामुळे जरा तीव्र प्रतिसाद दिला जातो. पण यापुढे काळजी घेईन.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रतिसादाशी सहमत. चिखलफेक, धुळवड यामध्ये काही अभ्यासू सदस्य सामील होतात, त्यामध्ये कधीकधी प्रतिसादाची पातळी किंवा दर्जा खालावतो, याचे वाईट वाटते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, प्रा. डॉ., गवि, चांदणे संदीप आणि तुषार काळभोर ह्यांच्याशी सहमत आहे 👍

अनेक राज्यांना वेगळा दर्जा आहे. काश्मीरचे ३७० काढल्यावर नागालँडमध्ये साहेबांना लगेच शांती करार करुन ३७१ए रद्द करणार नाही हे वचन द्यावे लागले. नागा लोक म्हणतात की माना अथवा मानू नका आमचा ध्वज वेगळा. https://m.economictimes.com/news/politics-and-nation/recognize-it-or-not-the-nagas-too-have-their-own-national-flag-nscn-im/articleshow/80316442.cms ज्यांना एका देशात दोन ध्वज व राज्यांना वेगळा दर्जा चालत नाही असे शूरवीर काय करताहेत ते पाहणे मनोरंजक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

हे केलं का, मग ते का नाही केलं? ते केलं का मग ते दुसरं का नाही केलं? समजा एकापेक्षा अधिक राज्यांना वेगळा दर्जा होता तर त्यातील सर्वात गंभीर प्रकरण व सर्वात मोठे राज्य काश्मीर होते. ते नुसते सीमेवरील राज्य नसून त्या राज्यातील बहुसंख्य नागरिक मुस्लिम होते व त्यातील काही जण सातत्याने पाकिस्तानमध्ये राज्य विलिनीकरणाची किंवा वेगळा देश करण्याची मागणी करीत होते. त्यांच्या या मागणीला पाकिस्तान सर्व प्रकारची मदत देत होता व त्यातून देशभर दहशतवादी हल्ले होत होते. त्यामुळे वेगळेपणाचे कलम हटविण्यासाठी याच राज्याला प्राधान्य देणे अत्यावश्यक होते. बाकी नागालॅंडची काश्मीरशी तुलना केली तर लक्षात येईल की हे राज्य तुलनेने अत्यंत लहान आहे, येथील बरीच लोकसंख्या वेगळ्या धर्माची असली तरी ते मुस्लिम नाहीत जे कोणत्याच देशाशी (विशेषतः जेथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत तेथे) एकनिष्ठ नसतात, तेथील नागरिक उर्वरीत भारतात येऊन दहशतवादी हल्ले करीत नाहीत, आपल्याला नागालॅंड हा वेगळा देश म्हणून हवा किंवा हे राज्य चीनमध्ये विलीन करा अशी त्यांची मागणी नाही, नागालॅंडला लागून असलेल्या म्यानमारच्या लोकांचा धर्म व नागा लोकांचा धर्म वेगळा आहे, म्यानमारचे व भालताचे चांगले संबंध आहेत. हे सर्व पाहता जर नागालॅंडला वेगळेपणाचे कलम दिले असेल तर ते काढून टाकण्याचे प्राधान्य काश्मीरला दिलेल्या ३७० कलमाच्या हकालपट्टीपेक्षा बरेच कमी आहे. भविष्यात योग्य वेळी ते सुद्धा होईलच.

In reply to by नगरीनिरंजन

संस्कृती ,भौगोलिक स्थिती,अशा अनेक स्थिती चा विचार करून राज्यांना विशेष दर्जा देण्याची घटनेत तरतूद आहे .नागालँड ला जो विशेष दर्जा दिला आहे तो कायदेशीर आहे त्याला राज्य घटनेची मंजुरी आहे..देशात अनेक राज्यांना असा काही ना काही दर्जा देवून त्यांच्या प्रगती चा मार्ग सोपा केला गेला आहे..बिहार पण विशेष राज्याचा दर्जा द्यावा म्हणून आग्रही आहे.गोवा ह्या राज्याला पण असा विशेष दर्जा आहे.. काश्मीर ला पण काही कारणास्तव 370 चे संरक्षण दिले होते..प्रतेक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याची उत्तर पण वेगळी आहेत. त्या साठी राज्य घटनेटच त्या वर उपाय दिला आहे. सर्व राज्य एकसारखी आहेत ,सर्व राज्यांचे प्रश्न एक सारखेच आहेत असला बुद्धिहीन विचार फक्त अडाणी लोक च करू शकतात.

In reply to by Rajesh188

सर्व राज्य एकसारखी आहेत ,सर्व राज्यांचे प्रश्न एक सारखेच आहेत असला बुद्धिहीन विचार फक्त अडाणी लोक च करू शकतात. सहमत, म्हणूनच काश्मीर आणि नागालँड यांची तुलना करणे योग्य नाही.

In reply to by नगरीनिरंजन

नागा लोक म्हणतात की माना अथवा मानू नका आमचा ध्वज वेगळा. शिवसेनेचा ध्वज वेगळा आहे. शीख पंथाचा ध्वज वेगळा आहे. पण ते ध्वज काही शासकीय किंवा राज्याचे अधिकृत ध्वज नाहीत. एखाद्या फुटीरतावादी संघटनेने केलेलं विधान घेऊन त्याबद्दल तुम्ही येथे प्रश्न विचारता आहात याचा अर्थ स्पष्ट आहे असो

गोवा राज्याला पण लागू आहे ते पाहिले राज्य करते मूर्ख होते म्हणून नाही तर आताचे सरकार सोडून भारतात सर्व केंद्र सरकार ही mature होती. कलम 371 नुसार गोवा राज्याला विशेष अधिकार दिले गेले आहेत.

In reply to by Rajesh188

पण अमेरिका, यू.के., फ्रान्स, जर्मनी, जपान, झालंच तर नॉर्वे, स्वीडन, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादींपैकी - म्हणजे गैरकम्युनिस्ट अशा कुठल्या देशांची विमानसेवा सरकारी मालकीची आहे, हे कृपया व्यवस्थित माहिती घेऊन, व शक्य असले तर दुवे देऊन येथे सांगावे.

In reply to by प्रदीप

जगातील किमान १०० देशात एकही सरकारी विमान कंपनी नाही. कोणतीही माहिती न शोधता, माहिती नसताना बिनडोकासारखी आपली मते फेकायची, त्यावरून मोदींना शिव्या घालायच्या आणि आपल्या बिनडोकपणाचे तावातावाने समर्थन करीत रहायचे हे काही जणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ही गॉन केस आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ही गॉन केस आहे. पण संपादक मंडळ त्याच्याकडे काणा डोळा करत आहे. अशा सदस्यां मुळेच अनेक सदस्यांनी दिवाळी अंकासाठी लेख पाठवावे असे अजिबात वाटत नाही असे मला खाजगीत बोलून दाखवले आहे.

In reply to by सुबोध खरे

दोन खरे आणि एक खोटे ह्यांच्या हेकटपणामुळे, सतत दुसर्‍याची लायकी काढण्यामुळे आणि आम्ह्ही तेवढे शहाणे अशा आविर्भावामुळे मिपावर लिहिणे सोडा, वाचूसुध्दा वाटत नाही असे कित्येक सदस्य खाजगीत बोलतात. त्यांचे खाजगी बोलणेसुध्दा ग्राह्य धरावे ही नम्र विनंती.

In reply to by सुरिया

त्यांचे खाजगी बोलणेसुध्दा ग्राह्य धरावे ही नम्र विनंती. त्यांचे खाजगी बोलणे मान्य करून मी मिपा वर येणे थांबवतो धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

जगातील सर्व देशात airlines मध्ये सरकार ची काहीच भागीदारी नाही असे देश . वायुदल ची विमान सोडून जगातील सर्व देशात सरकारी मालकीचे एक पण विमान नाही. असे देश आणि त्याची भारता शी तुलना असा माझ्या पोस्ट च अर्थ आहे. ज्यांनी उतावीळ होवून प्रतिसाद दिले आहेत.. त्यांना कम्युनिस्ट देश सोडून बाकी उर्वरित देशात सरकारी मालकीचे विमान असणाऱ्या(वायू दल पण सोडून ) देशांची यादी यादी दिली तर ते जाहीर माफी मागणार आहेत का?

In reply to by Rajesh188

सरकारी मालकीची एक पण विमान कंपनी नसणार भारत हा एकमेव देश आहे.
असे तुम्ही म्हटले आहे. ह्याचा सरळ अर्थ सरकारची भागी व त्याचा, त्या त्या विमान कंपन्यांवरील अंमल (कंट्रोल), असा अभिप्रेत असावा असे मलातरी वाटते. कारण खाजगी विमानसेवेत सरकारने पैसे गुंतवले, पण त्यात सरकारचा काहीही कंट्रोल नाही, तर ती निव्वळ गुंतवणूक ठरते, त्या पलिकडे काहीही नाही. तेव्हा अशी उदाहरणे द्यावीत जिथे सरकारची भागी व अनुषंगाने कंट्रोलही आहे.-- निव्वळ गुंतवणूक नव्हे.

In reply to by प्रदीप

'मी यादी दिली तर....' वगैरे डरकाळ्या फोडल्यावर तुम्ही आता नक्की यादी देणार, अशी भीति वाटते आहे व म्हणून वाट पहातोय.

In reply to by प्रदीप

राजेश१८८, इथे 'मी नावे दिली तर माझ्यावर येथे ह्यासाठी टिका करणारे माझी माफी मागणार का' असे लिहून तुम्ही ह्या धाग्यावरून नाहीसे झालेला आहात. आता तुम्ही दुसर्‍या एका धाग्यावर हजर आहांत असे पाहिले. तेव्हा, आता एकतर नावे द्या (मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे, ज्या विमान कंपन्यांत सरकारांचा हिस्सा व त्यांना निर्णय घेण्याची क्षमता आहे, अशाच फक्त-- नुसती बिन- निर्णयक्षमता असलेली गुंतवणूक नव्हे) अथवा चुकीची टिका केल्याबद्दल माफी मागा.

In reply to by प्रदीप

राजेश१८८ यांनी नेहमीप्रमाणेच थापा मारून पलायन केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आणि त्यात नवे ते काय आहे? आता दुसर्‍या धाग्यावर त्यांचे तेच नेहमीचे मतांचे बुडबुडे उडवणे सुरू झाले, तेव्हा मी त्यांना ह्याची पुन्हा आठवण करून दिली. त्यांचे त्यावर हे उत्तर आहे. वास्तविक मी स्वतः कुणालाही माफी वगैरे मागावयास सांगत नाही. पण हे आव्हान त्यांनीच येथे केले होते. राजेश१८८ ह्यांना, त्यांनी केलेल्या बुडबुड्यांबद्दल माफी मागावयास कुणी सांगितली, तर इथे त्यांना दिवसातून अनेकवेळा ते करत बसावे लागेल. चर्चेची पातळी का घसरते त्याचे मूळ ह्या असल्या बुडबुडी प्रतिसादांत आहे.

In reply to by प्रदीप

अत्यंत मूर्ख माणूस आहे हा. वाटेल त्या थापा मारायच्या आणि त्याचे पुरावे विचारले की धूम ठोकून पळ काढायचा हे १८८, आग्या वगैरेंचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

In reply to by प्रदीप

राजेश भाऊ कडून उत्तराची अपेक्षा ठेऊ नका. काहितरी प्रतिसाद द्यायचा आणि अंगलट आलं की पळ काढायचा हे त्यांचं धोरण आहे.