Skip to main content

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 12/02/2013 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2729
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

तरही गझल म्हणजे काय?

तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल. ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.

सुरेख रचना:
जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
व्वाह!

लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले | दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-) ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)