धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना
सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना
गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी
देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना
हे कायदे निजामी, का लावता फुलांना
भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना
अंधार दाटताना, रंगून सांज यावी
थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना
ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी
कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना
संध्या
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6480
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरल कविता... छान..
वा दिल गार्डन गार्डन हो गया..
हम्म
???
In reply to हम्म by प्रचेतस
कवितेतला टाइपकास्टपणा आवडला
In reply to ??? by मोदक
सहमत पण जरा फरकाने
In reply to हम्म by प्रचेतस
:अओ:
In reply to सहमत पण जरा फरकाने by चौकटराजा
वन मोअर बेस्ट..........
संध्या .....
सुरेख ! ! !
सर्वांचे आभार.
सुरेख मला तर आवड्ली बै कविता
शंका ???
In reply to सुरेख मला तर आवड्ली बै कविता by पियुशा
आयला परत कच्चा माल
-
In reply to आयला परत कच्चा माल by सुहास..
अगदी नाजुक साजुक....गोड...
मला सुद्धा खुप आवडली
मस्त
कविता अजून वाचली नाही पण...
सांभाळा की सांभाळ ??
सो...
In reply to सांभाळा की सांभाळ ?? by चौकटराजा
कविता वाचता ...
In reply to सो... by सुबक ठेंगणी
येस्स
In reply to सो... by सुबक ठेंगणी
चौरा