Skip to main content

कहीं दूर जब दिन ढल जाये

लेखक Anand More यांनी रविवार, 02/12/2018 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक. आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला. त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता.

यूं-ही-चला-चल-राही भाग - ३

लेखक मालविका यांनी शनिवार, 01/12/2018 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
13 November, 2018 तिसरा दिवस उजाडला.आज कोळथरे ते वेळणेश्वर असे अंतर पार करायचे होते. गूगल मॅप ४५किमी दाखवत होता. मध्ये दाभोळ – धोपावे फेरी बोट होती. धोपावे इथे उतरून वेलदूर – गुहागर मार्गे वेळणेश्वर असा आमचा मार्ग होता. निघू निघू म्हणता म्हणता ०७. ४५ झाले. भावजींनी दोन बाटल्या भरून शहाळ्याचे पाणी दिल होत आणि एक साध्या पाण्याची बाटली होती. सकाळचा चहा पिऊन सर्वाना बाय करून निघालो. जाताना एकदम मस्त वाटत होत. पंचनदी पाठी टाकून दाभोळच्या रस्त्याला लागलो आणि मग सुरवातीला साधा सरळ असणाऱ्या रस्त्याला फक्त चढ एके चढ लागायला लागले. १-१ असा गिअरचा रेशो असूनसुद्धा पॅडल मारायला जड जायला लागलं.

नदी आणि गाव

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/12/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत. नदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे.

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ८

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 01/12/2018 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सुद्धा लवकरच जाग आली. काल संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहणे झाले असल्याने आज समुद्रात पोहायला जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे झटपट तयार होऊन समुद्रावर गेलो. आमच्या हॉटेलसारखीच किनाऱ्याला लागून इतरही हॉटेल होती आणि त्यातले पर्यटक समुद्रावर फिरायला किंवा डुंबायला किंवा जॉगिंग ला बाहेर पडलेले दिसत होते.वेळ भरतीची होती आणि समुद्रकिनारा बराच उतरता होता त्यामुळे लाटांचा जोरही जास्त वाटत होता. विशेष करून परतीच्या लाटेला जास्त ओढ होती. त्यामुळे कमरेपेक्षा जास्त पाण्यात जायचे नाही असे आधीच ठरवून टाकले.

बोका ए आझम ओंकार पत्कीची एक्झिट

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 30/11/2018 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरच्या श्री गणेश लेखमालेतील लेखाच्या निमित्ताने पहिल्यांना व्यनिमध्ये भेटलास आणि कळलं, आपण एकमेकांपासून एक किलोमीटरहूनही कमी अंतरावर राहतोय. मग काय, आपण दुस-याच दिवशी शिवाजी पार्काजवळच्या गोल्डनमध्ये ऐन गणपती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा ठोकायला भेटलो. तेव्हाच कळलं की माझे आजोबा तुझ्या आईचे शिक्षक आणि तुझी आई नि माझी आत्या वर्गमैत्रीणी, आपलं मैत्रही तिथेच पक्क जुळलं. मिसळपाव डाॅट काॅमच्या माध्यमातून जुळलेलं मैत्र पुढे गाढंच होत गेलं. रात्रं रात्रं चालणा-या चर्चा, वाद, गप्पा, तुझ्याकडच्या माहितीच्या खजिन्यामुळे कधीच कंटाळवाण्या झाल्या नाहीत.

भेट

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 30/11/2018 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय.... भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय? कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला.

यूं ही चला चल राही - भाग 2

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 30/11/2018 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
10th November, 2018 दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आम्ही ४.३० ला उठून तयार होऊन ठरल्याप्रमाणे ५. ३० ला सुमंताचं घर सोडलं. थंडी नसली तरी हवेत थोडा गारवा होता. चिपळूणहून बाजारपेठेतून रस्ता जातो तो डायरेक्ट मुंबई – गोवा हायवेला परशुराम घाटाच्या पायथ्याशी पोचतो. सुमंता आम्हाला तिथपर्यंत सोडायला आला. त्याला बाय करून आम्ही घाट चढायला सुरवात केली. अजूनही सगळीकडे काळोख होता. डोक्यावर हेडलाईट्स होते. सायकलला ब्लिंकर लावलेले होते. तरीही प्रचंड धुके त्या हेडलाईटच्या मध्ये येत होते. हेडलाईट वापरायची सवय नसल्याने रस्त्यातले खड्डे चुकवायला जमत नव्हतं. पण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे काम भागत होत.