Skip to main content

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ८

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 20/05/2019 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १ ते भाग ५ यांमधील लिखाण मुख्यतः "दिल्ली, बहादूरशहा आणि १८५७" याबद्दलचे होते. या मालिकेतील पुढील भाग "अवांतर " म्हणायला हरकत नाही. हा भाग या मालिकेंतील शेवटचा भाग आहे .

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?

लेखक onlinetushar यांनी रविवार, 19/05/2019 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या खूप दिवसांपासून अनेकांचे माझ्या फेसबुक पेजवर मेसेज येत होते कि आम्ही आधी ब्लॉगरवर ब्लॉग तयार केलाय. आता तो आम्हाला वर्डप्रेसवर स्थलांतरित (Migrate) करायचा आहे कसा करू? तर हे अतिशय सोपे आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुमच्या गुगल रँक अथवा इतर गोष्टींना धक्का न पोहचवता ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा हे जाणून घेऊ.

ब्लॉगर आणि वर्डप्रेस यामध्ये नेमका फरक काय?

ब्लॉगर हे एक गुगलचे प्रोडक्ट आहे. ब्लॉगरवरील आपल्या ब्लॉगवर आपल्यापेक्षा गुगलचे अधिक कण्ट्रोल आहे.

आंबा नावाचे झाड

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 19/05/2019 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
पातेल्यातले आंबे आईने माझ्याकडे सरकवले आणि " घे काढून .." असा आदेश दिला. हातातले काम सोडले आणि एक एक आंबा पिळून काढू लागलो. दुध, वेलदोडे टाकून झाले आणि शेवटी साखर टाकायची म्हणून ती शोधायला लागलो. आईला विचारावे तर तिचे उत्तर असणार "तिथे आहे. " "तिथे कुठे? " असा प्रतिप्रश्न केला तर "तिथे स्टिलच्या गोल डब्यात " असे उत्तर मिळणार. शेवटी समोरच्या अगणित डब्यातून मलाच पाहिजे ते शोधावे लागते. तो अनुभव पाठीशी असल्याने मी एकटाच साखर शोधू लागलो. त्यावेळी मात्र आईच्या कामात लुडबूड होऊ लागली. माझ्याकडे एक तिरपी नजर टाकली आणि बोलली ," साखर हवीए? अरे एवढा गोड आंबा आणि त्यात अजून साखर? जाड होशील की अजून !

आणि बुद्ध हसला !

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 18/05/2019 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली. कृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें।. "आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है।" ७ सप्टेंबर १९७२ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली, त्या भेटींत गांधींनी पिसफूल न्यूक्लियर डिव्हाईस म्हणजेच PNE तयार करण्यासाठी परवानगी दिली आणि हसऱ्या बुद्धाचा प्रवास सुरु झाला. पण हे अगदी अलीकडचं नक्कीच नव्हतं.

माझ्या आठवणीतला तात्या

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/05/2019 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
"आम्ही तात्याला पहिला नाही"अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत. मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो. २००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले "असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद"यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो..... मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली.

खाण्यासाठी जन्म आपुला १ : साई दावणगिरी डोसा

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे जसं जसं वाढत चाललं आहे तसं तसं खाण्याच्या बाबतीत हि ग्लोबल होत जाते आहे. आधी इडली डोसा सारखे दाक्षिणात्य पदार्थ म्हंटल की लोकांच्या तोंडी रुपाली-वैशाली-वाडेश्वर हि नाव यायची, आता अपसाऊथ, सांबार, अण्णाज इडली वगैरे साऊथ इंडियन पदार्थ खाऊ घालण्याच्या नावाखाली चकचकीत रेस्टॉरंट आली. पण या सर्वात एक कमी होती ती म्हणजे या पैकी एकही जण धड चवीचा 'लोणी स्पंज डोसा' देऊ शकत नव्हतं.

शतजन्म शोधितांना....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.

शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान

लेखक Sumant Juvekar यांनी शुक्रवार, 17/05/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपला शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरू दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेले ११४ ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास दादासाहेबांना अडिच महिने लागले. तस्मात् वाचकांनी १५ मिनिटे तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व 9967840005 वर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिनंदन, अभिनंदन! एक मार्च २०१९ रोजी आपला शूर वैमानिक अभिनंदन वर्धमान, शत्रु देशातून स्वदेशी परतला.

लोकशाही ‘शाई’ पुरती!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/05/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारताचे तमाम लोक हे नागरिक नाहीत. फक्त मतदार आहेत. भारताचे लोक स्वत:ला ‘जागरूक नागरिक’ समजतात. आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून मतदान करतात. वीस- पंचवीस उमेदवारांपैकी मतदारांना एकही पसंत नसतो, पण निवड न करता कसं चालेल, म्हणून तो कोणाला तरी मतदान करतो. NOTA पर्यायही स्वीकारतो. (नोटा पर्याय निवडणं म्हणजे बोटाला शाई लावण्यापुरतं मतदान करणं.) इतक्यांपैकी नागरिकांना एकही उमेदवार योग्य वाटू नये, हे खरं तर उमेदवारांनाच लज्जास्पद वाटलं पाहिजे. दिवसेंदिवस नोटावरचं मतदान वाढतंय, याचं चिंतन मतदारांनी नव्हे, तर उमेदवारांनी- पक्षांनी केलं पाहिजे.