सांग ना,सख्या
मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने..
सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने?
*
निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा
सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी?
*
अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा
सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे
*
मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी
सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी???
मिसळपाव
उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली.
.
ती घोडे सांभाळणार्या सेवकाच्या प्रेमात पडली.