Skip to main content

पावणेदोन पायांचा माणूस

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/09/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.

शिंडलर्स लिस्ट

लेखक प्रमोद मदाल यांनी बुधवार, 11/09/2019 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळच्या वेळी एका उच्चभ्रू वस्तीतून कर्फ्यू मोडून फिरणारी लांबलचक, चकचकीत अॅडलर लिमोझिन गाडी सरकारी अधिकाऱ्यांना ओळखीची झाली होती. एका अलिशान हॉटेल समोर येवून थांबताच दारावरचा पहारेकरी अभिवादन करत पुढे येतो. आपला महागडा ओव्हरकोट व्यव्यस्थित करत साधारण पस्तीशीतला, उंच देखणा तरुण गाडीतून उतरतो. कोटावरचे सोनेरी स्वस्तिक चिंन्ह हाताने ठीक करून आत जातो. नेहमीप्रमाणे महागडे मद्य मागवतो, जवळच बसलेल्या सैनिकी अधिकाऱ्याकडे त्याचे काहीतरी महत्वाचे काम असते. त्या कामासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तो तयार होता.

त्या

लेखक क्रांती यांनी बुधवार, 11/09/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
h3 { font-size: 22px; font-family: 'mu

आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - ३)

लेखक वैभव.पुणे यांनी मंगळवार, 10/09/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
झोप येईना, क्वालालंपूर येईना!!
दे दणादण टेक ऑफ झाल्यानंतर, आता टार्गेट होते, कधी एकदा क्वालालंपूर येते आणि आम्ही मलेशियात उतरतो. दिवसभराची धावपळ, ते कुतूहल, ते मलेशिया, मन अगदी विचारांनी भारावलेले आणि सोबतच धास्तावलेले! सलग ५ तासांचा मुंबईहून प्रवास, सकाळी ५.३० आणि शेवटी तो क्षण! वेलकम टू मलेशिया, एअरलाइं कडून ऑफिषियल अन्नौंस्मेंट! वुहू...

एक तरी खड्डा अनुभवावा...।

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 09/09/2019 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
'एक तरी खड्डा अनुभवावा' वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत.