पाऊस आणि ती
ऐन जुलै महिना. पावसाने अगदी मनावर घेतलं होतं की ह्या वेळी कोणालाही तक्रार करायची संधी द्यायची नाही. आणि म्हणून तो दररोज मनसोक्त बरसत होता. बिचारे मुंबईकर नेहमीच पावसाचे बळी ठरतात. पण असा एकही मुंबईकर शोधून सापडणार नाही ज्याच्याकडे पावसाची एखादी रंगवून सांगावी अशी गोष्ट नसेल. त्या दिवशीचा तो दिवस हा असाच एक नेहमीसारखा पावसाळी दिवस होता, पण कोणासाठी तरी तो त्यांची पावसाळ्याची गोष्ट ठरला.
सलग छत्तीस तास पडणार्या पावसाने मुंबई ची ‘लाइफ़ लाइन’ रखडायला सुरुवात झाली होती. पाउस कमी होण्याची चिन्हं न दिसल्यामुळे सगळी ऑफिसेस लवकर सोडण्यात आली होती. जे नशीबवान होते ते घरी पोचले.
मिसळपाव
मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची.