Skip to main content

महाराष्ट्र वैभव.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 28/09/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले. महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर. महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले. महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे. महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.

मम सुखाची ठेव...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच

आपण आणि आपले "ठराविक साचे"

लेखक मुक्तसुनीत यांनी रविवार, 28/09/2008 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर गाजत असलेला "स्त्रिया आणि ड्रायव्हिंग"चा धागा पाहिला आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनावर असलेल्या "ठराविक साच्यांचा" (इंग्रजी शब्द : स्टीरिओटाईप्स) परिणाम किती पक्का आहे ; या पगड्यामुळे आपण कशी घाऊक विधाने करतो ( स्वीपींग स्टेटमेंट्स) करतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. अनेक सामाजिक कारणे , पिढ्यानुपिढ्यांचे संस्कार आणि इतर परिस्थितीजन्य कारणे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हे साचे. "स्त्रियांना ड्रायव्हिंग न येणे" हा असाच एक साचा. या निमित्ताने असा विचार आला की, असे कितीकिती साचे आपण कुठल्याकुठल्या प्रकारे मनात वागवत असू ?

(अफवा)

लेखक चतुरंग यांनी रविवार, 28/09/2008 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसाद कुलकर्णींच्या 'अफवा' वाचून आमच्या पूर्वीच्या काही प्रमादांबद्द्ल उठलेल्या अफवांची आठवण ताजी झाली!

ऐका हो ऐकाऽऽऽ 'गूगल'चा नवा उपक्रम

लेखक राहूल यांनी रविवार, 28/09/2008 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो ऐकाऽऽऽऽ 'मिपा'च्या समस्त गावकऱ्यांना आवाहन! 'गूगल'नामक कंपनीने जगातील सर्व लोकांच्या बुद्धीला उत्तेजन देण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सर्वांनी आपापल्या बुद्धीला ताण देऊन अशा संकल्पना (ideas) पाठवायच्या की ज्यामध्ये जग बदलण्याची ताकद असेल. ज्या संकल्पना विजयी होतील त्या १ कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य देऊन राबवण्यात येतील. या संधीचा फायदा घेऊन सर्व 'मिपा'करांनी यामध्ये सामील व्हावे होऽऽऽऽऽऽ (जुन्या काळचे गावामध्ये दवंडी देणारे तराळ आता राहिले नाहीत, म्हणून काय झाले? आपल्यासाठी 'मिपा'चा कट्टा आहे ना).

मराठी प्रतिशब्द हवेत

लेखक वर्षा यांनी रविवार, 28/09/2008 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
मला खालील शब्दांसाठी मराठी शब्द हवे आहेत. (खरं तर काही काही शब्द इतके सोपे आहेत पण जाम सुचत नाहीयेत किंवा सुचले तरी खात्री वाटत नाहीये :() १) Prefecture (eg. Chiba prefecture) २) Simmer ३) Get together ४) Tableware ५) Sea weed - (म्हणजे समुद्री शेवाळ?) ६) Porcelain - (म्हणजे चिनी माती?) इंग्रजी-मराठी अशी ऑनलाईन डिक्शनरी आहे का एखादी? -वर्षा

आपल्याला वृद्धाश्रम का आवडत नाहीत?

लेखक मृदुला यांनी रविवार, 28/09/2008 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी मुलांनी घ्यायची की नातेवाईक-मित्रमंडळींनी?
या तात्यांच्या एका प्रतिक्रियेतून ही चर्चा सुरू कराविशी वाटली. जीवशास्त्रीय दृष्टीने बघता, आईवडिलांनी, इतकेच नव्हे तर आजी आजोबा, काका, आत्या, मामा, मावश्या अश्या सगळ्या नातेवाईकांनी बाळाचे संगोपन करणे माणसाच्या जातीला नैसर्गिक आहे. आईवडील आणि आजीआजोबा हे यात महत्वाचे.

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 27/09/2008 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला. नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " .... फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता. असो.

कांदा-कोलंबी-कैरीच कालवण

लेखक लवंगी यांनी शनिवार, 27/09/2008 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या आईची पाककृती. पावसाळी दिवसात गरम मऊ भाताबरोबर खाल्ल्यावर हमखास पांघरूण घेऊन ताणून देताय की नाही पहा!! २ मोठे कांदे उभे चिरून घ्यावे. १ मोठी कैरी सोलून उभ्या चिरा करून घ्याव्या. २ वाट्या कोलंबी सोलून घ्यावी. छोटे ३-४ चमचे लसूण-आले -हिरवि मिरचि पेस्ट करून घ्यावी. भांड्यात २ मोठे चमचे तेल गरम करून घ्यावे. तेलात आल-लसूण पेस्ट टाकून कोलंबी टाकावी. कोलंबी लालसर झाली की चिरलेले कांदे टाकून अर्धवट गुलाबी परतून घ्यावे. नंतर त्यात कैरी टाकून थोडे पाणी टाकावे. थोडी लाल मिरची पावडर, मालवणी मसाला असेल तर १ चमचा आणि थोडे मीठ टाकावे. एक चांगली उकळी आणून कैरी शीजली की बंद करावे.