Skip to main content

कळले मला ना........

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कळले मला न केव्हा तूझ्यात गून्तले मी पापणीत साठले पाणी प्रीतीत नाहले मी ओठ जरा थरथरले अंग अंग शहारले नकळत सारे घडले पण गूपित तुला कळले कळले मला न केव्हा मेघ दाटून आले नयनात जमली स्वप्ने रात्रीत जागले मी गीत जरा स्मरले सप्तसूर जूळले तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले कळले मला न केव्हा फूल उमलून आले आसवांची झाली फूले गंधात दंगले मी

बकूळ फूले

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओन्जळितल्या बकूळ फुलांना ओन्जळित तूझ्या धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला सांग प्रीया तू देशील का? ओन्जळितल्या त्या बकुळ फुलांना पापणीत तूझ्या ठेवशील का? पापणीतून अलगद त्यांना मनात सामावून घेशील का? अखेपर्यंत आठवणीने मनात तू जपशील का? सूखलेल्या निर्माल्यवत त्या फुलांना ओन्जळित पून्हा धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला पून्हा प्रीया तू देशील का?

मुंबईतल्या रस्त्यांचं चाललेलं कॉंक्रिटीकरण

लेखक तात्यालबाड यांनी शुक्रवार, 30/01/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्व जण सध्या पहात आहात की जिथे तिथे रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण चालू आहे. हे का ते माहिती आहे का ? तर आता आले आहे मतदान...नगरसेवक,आमदार आणि खासदार या पदांसाठी. जी त्यांना ४ १/२ जमू शकत नाही ती कामे त्यांना निवडणूका जवळ आल्या की आठवणीने आठवतात.

कुमारी माता

लेखक कशिद यांनी शुक्रवार, 30/01/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का? नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे . तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे. मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे . ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...

सारेगमप लिटिल चॅम्प्समधे मुलांचे बालपण हरवत आहे का?

लेखक संभाजी यांनी शुक्रवार, 30/01/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या झी टीव्हीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स हा अत्यंत लोकप्रीय कर्यक्रम चालू आहे. त्यात भाग घेणारी मुले अगदी लहान आहेत. पण परिक्षक मंडळी , विशेषतः अवधूत गुप्ते त्याना भलभलते प्रश्न विचारून भंडावून सोडताना दिसतो. दोन आठवड्यापूर्वी त्याने रोहित राउतला "एवढी पल्लवी आख्खी समोर असताना तिच्याभोवती का नाचला नाहीस?" असे विचारले होते. सहाजिकच पुढच्या खेपेस परफॉर्म करताना त्याने शर्वरी पाटणकरभोवती पिंगा घातला.

चिनी म्हण--आणि रामदुलारी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 30/01/2009 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगावं,खरं ओकूं नये! "स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ" रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.

सेंडॉफ नंतरची शाळा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 30/01/2009 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमरः या लेखातली सगळी पात्रं खरीखुरी आहेत आणि सगळ्यांनी जरी चाळिशी ओलांडली असली तरी त्यांचा उल्लेख मुलं अथवा मुली असाच होईल. कोणाला आक्षेप असतिल तर ते आपल्या स्वतःकडेच ठेवावेत. आम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. :) *** साधारण ३-४ वर्षं झाली असतिल. रविवारचा दिवस होता. सकाळी साडेदहाचा सुमार असेल. दारावरची बेल वाजली. मीच दार उघडलं. एक वयस्क गृहस्थ दारात उभे होते. माझ्या वडिलांचे कागदोपत्री लावायचे नाव घेऊन ते घरात आहेत का अशी विचारणा झाली. मी साहजिकच त्यांना आत घेतले. तेवढ्यात बाबा पण बाहेर आले. पाहुणे म्हणाले, "काय रे? ओळखलंस का?".

ऑक्सिटॉसिन अलिंगनौषधी

लेखक मृदुला यांनी शुक्रवार, 30/01/2009 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच्या उत्क्रांतीच्या बातम्या चाळताचाळता ऑक्सिटॉसिनविषयी वाचले. शास्त्राज्ञांनी असे शोधले आहे की माणसाला जेव्हा दुसर्‍या माणसाविषयी प्रेम, ममत्व वाटते तेव्हा पियुषिका ग्रंथीद्वारे ऑक्सिटॉसिन शरिरात सोडले जाते. या द्रव्यामुळे भावनिक धागे घट्ट होण्यास मदत होते. प्रयोगातून असेही सिद्ध झाले आहे की काही जातीच्या उंदरांत नर-मादी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात ते ह्याच द्रव्याच्या प्रभावाने. माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे.

मुखवास

लेखक शुभान्गी यांनी शुक्रवार, 30/01/2009 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
जलजिराच्या गोळ्या. साहित्य:१टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, ५० , १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर कृती :काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून पावडर करुन घेणे. सगळे साहित्य मिसळून परत एकदा मिक्सर फिरवा. सगळे एका बाऊल मधे घेऊन गुलाबपाणी घालून गोळ्या बनवा. बडीशेप साहित्य: अर्धा किलो मोठी बडीशेप्,दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्,लिन्बू टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे कृती: गार पाण्यात हळ्द, मीठ, लिन्बू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा.

एका रानवेड्याची शोधयात्रा

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी.....! ख-याखु-या जंगलपुत्रासारखं राहून.... जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय. "काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात" असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती.... आणि झालंही तसंच ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणा-या ह्या "कृ्ष्णमेघा"ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना...की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही. अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा !