हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन
बर्याच काळानंतर घागा लिहित आहे.
त्याला कारण ही मजबूत आहे.
विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे.
इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.
आधार घेते
रेंगाळलेली सांज होतांना
नभीधुंद जरा माघार घेते,
चांदण्याची रात होतांना
तुझ्या मिठीचा आधार घेते||१||
दवांत भिजलेला गुलाब
पहाटे खुडण्याचा अपराध करते,
नको थांबवू तुझ्यासाठी
काट्याचाही घाव एकवार घेते||२||
नाजूक वात तेवतांना
देवाला कधी प्रश्न विचारते?
उमलू दे तुझे नेत्रदीपक
उरला जरी मी अंधार घेते||३||
बांधून रहस्य गाठोडे
पाऊलवाट प्रवासाला निघते,
विसावशील मन गाभारी
तुझा अनमोल व्यापार घेते||४||
तेव्हापासून..
'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..!
उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..! हे बरं नाही..
हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय..
एक पावसाळी संध्याकाळ.....
"खरं आजोबा तू फार लक्की म्हणजे अगदी लक्की आहेस बघ!!! एन्जॉय कर !!बाय!!!" असं म्हणून तिने फोन ठेवला अन स्वत:शीच गुणगुणत अलगद हसताना मी तिला पाहिलं..
आणि आज विचारूनच बघुयात म्हणून म्हणालो," मला एक समजत नाही ,तुझे आजोबा तुला रोज एकदा कॉल करून तास तास भर काहीतरी ऐकवतात आणि तूही रोज अगदी उत्साहाने अरे वा!!!छान!!! मस्तच!!! अशा प्रतिक्रिया देत सगळं ऐकून घेतेस आणि फोन ठेवताना तू फार लक्की आहेस आजोबा असं म्हणतेस !
निष्क्रिय सज्जन म्हणजे...
- डॉ. सुधीर रा. देवरे
आपल्यातल्याच काही विभूती दैनंदिन स्तुत्य कृतीतून विकास पावत इतिहासात लोकदेव झाले. कृतीतून त्यांनी लोकांना त्यांच्यातला देवत्वाचा दृष्टांत दिला. परोपकार देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आयुष्यातील कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येतं. कृतीतून देवमाणूस होत जाणं साधी सोपी गोष्ट नाही. आपण अशा देवमाणसांचा आदर्श न घेता मंदिरं बांधून दानपेट्या ठेवत कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरु करतो.
माणसाला एकुलतं एक आयुष्य मिळतं. त्यातलं निम्म्याधिक आयुष्य झोपेत निघून जातं. बालपणातलं आयुष्यही बेरजेत नसतं. उरलेल्या आयुष्यात माणूस कष्ट करत दोन वेळचं जेवण कमवतो.
नष्ट झालेल्या आजाराचा निद्रिस्त विषाणू
नुकतेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने Brincidofovir या औषधाला देवीरोगावरचा (smallpox) उपचार म्हणून मान्यता दिली. हे वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस नक्कीच बुचकळ्यात पडेल ! तुम्हीसुद्धा पडले असाल, नाही का ?
देवीच्या आजाराचे तर फार पूर्वीच उच्चाटन झालेले आहे. मग जो आजार आत्ता मानवजातीत अस्तित्वातच नाही, त्याच्यासाठी औषधाला मान्यता देण्याची गरज काय, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे.
याचे स्पष्टीकरण रोचक असून ते देण्यासाठीच हा लेख लिहीत आहे.
सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे.
१९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...
मिसळपाव