Skip to main content

हा कवी झाला कशाला....!

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 16/04/2009 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा खोडसाळ यांची रचना (शब्द मी आहे असा...! ) आणि प्रदीप कुलकर्णी यांची सुरेख कविता शब्द मी आहे असा....! ............................................ हा कवी झाला कशाला....! ............................................ अर्थ अमुच्या 'वाहवा'चा लावला भलताच केला! आणि हा आता बघा की, पुर्ण शेफारून गेला! हा कवी झाला कशाला, नेहमी वाटून जाते... शेवटी र्‍हासास याला याच कवितेनेच नेला! वाचकांचे या कवीने ऐकले नाही कधीही.... हा जरासुद्धा न थांबे वाटतो पुरता हटेला!

"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/04/2009 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा, "गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान" (चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन) आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.
Taxonomy upgrade extras

फोन मेसेज

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 16/04/2009 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
फोन मेसेज !*****! अरे हलो - फोन नाहीस उचलत... म्हणजे कामात आहेस. अजून? उशीर झाला तरी जेवण गरम कर. नाहीतर खाशील तसंच नेहमीसारखा - खुडबुडीने माझी झोप मोडेल म्हणून... !*****!

निवडणूक आणि ड्राय डे

लेखक मिसळभोक्ता यांनी बुधवार, 15/04/2009 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १६ एप्रिल. विदर्भात आणि इतरत्रही बर्‍याच मतदारसंघांत लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकशाहीमुळे जनतेला जे अधिकार मिळालेले आहेत, आणि जी कर्तव्ये हा महान देश उभा ठेवण्यासाठी जनतेला पार पाडावी लागतात, त्यातला "मतदान" हा अधिकार आणि कर्तव्य आहे. परंतु, निवडणूक आयोग, हा हिटलरच्या बापाचा अवतार आहे. टी एन शेषन पासून लोकशाहीवर गदा आणण्याचे काम निवडणूक आयोगाने केला आहे. लोकशाहीत, कुठलेही कायदे अस्तित्वात नसताना, निवडणूक आयोग दरवेळी आपली मनमानी करीत असतो.

बाललीला

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 15/04/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोरगी सध्या तिच्या मधल्या मावशीकडे गेलेय. दोन दिवस मुक्कामाला. (आता राजा-राणीला रान मोकळं म्हणून चहाटळ कॉमेंट करू नका! रात्री साडेबाराला घरी जातोय रोज. नि सकाळी दोन तास फक्त राजा-राणीला मोकळे असतात. त्यातही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे यातच जीव जातो. असो!) आज सहज फोन केला, तर तिच्या मावसभावाच्या उखाळ्यापाखाळ्या करत होती. ढकललं, मारलं, थुंकी उडवली वगैरे वगैरे. नेहमीचंच!

ताबडतोब रस मलाई.. :)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 15/04/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खवय्यांनो, (झालं! आली का परत एक नवा प्रयोग घेऊन..असं कोण रे म्हणतंय तिकडे...??) रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तश्शी. आम्रखंड्,श्रीखंड.. हे पदार्थ तर छानच. गुलाबजाम, खीर तर रोजचेच. रसमलाई माझी अतिशय आवडती डिश आहे. गोड पदार्थांमध्ये जर मन लावून मी काही खात असेन तर ती रसमलाई. चपटे पेढ्याच्य आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगूर मलाई.. माझ्या कोल्हापूरी घशातून ही रसमलाई इतकी अलगद उतरते... व्वा! काय सांगू आता. इथे स्वादची रसमलाई मिळते.

प्रभातरंग

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 15/04/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली उधळले प्रभातरंग सुखावले नयन मन आनंदात गुंग सोनेरी किरणे फुला-पानांत ओसंडे निसर्गसौंदर्यास कळा सतरावी चढे नवचैतन्य पहाट विखुरते नवरंग पाण्यात झळाळे नवसुर्य प्रतिबिंब पक्षी किलबिलाट छेडे सुर हळुवार वेलीफुलांना येई तारुण्याची बहार काळोख भेदे प्रकाश जशी निराशेस आशा सुर्य विराजमान होई संपवुन अंधारी निशा टीपः कविता आवडल्यास किंवा न आवडल्यास/ बदल करावेसे किंवा विडंबन करावेसे वाटल्यास जरुर कळवावे/ करावे. आपला (प्रभातरंगप्रेमी) मराठमोळा.
Taxonomy upgrade extras

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १

लेखक सातारकर यांनी बुधवार, 15/04/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी - अमराठी वाद आज अगदी ऐरणीवर आला आहे अस मला वाटत होत. प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या जन्माआधीपासूनच हे भांडण चालू आहे अस एकंदरीत उल्लेखांवरून दिसून येत. कदाचित मिपाकरांना ह्यातल्या बय्राचश्या गोष्टींची माहीती असेल देखील पण मला बहुतेक सगळच नविन होत म्हणून माझ्यासारख्यांसाठी हा लेखन प्रपंच. राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यांच Thoughts On Linguistic States (१९५५) हे पुस्तक नुकतच वाचल. त्यात त्यांनी ह्या समस्येच्या वेगवेगळ्या बाजूंचा सविस्तर उहापोह केला आहे.