Skip to main content

मीपा करांची कविता.....

लेखक पियुशा यांनी सोमवार, 21/03/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी पा करांची कविता कधी आहे मस्ती ,कधी धिंगाणा , तर कधी कधी राडा मीपा सदस्यांचा वाचते हो मी पाढा ............. ,धमाल मुलगा ,कमाल मुलगा काहीपण इचारा लगेच सांगणार उत्तर , मीपा चे आहेत हे जुने मास्तर ........... छोटा डॉन........ कायम बीजी असणारे हे व्यक्ती कुणावरही करत नाही बोलण्याची सक्ती ढवळ्या शेजारी बांधला पवळा.. वान नाही पण गुण लागला गप्प गप्प असलेला छोट डॉन पर्या सारखा गु लु गु लु बोलायला लागला जागु ,अमिता ,गणपा , मृणाल अन निवेदिता ताई , यांना रेसेपी बनविण्याची

कविता ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 21/03/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
चला मस्त तारुण्य फुललेय जरा मजेत जगूया कसे जगायचे त्याचे स्वातत्र्य घेऊया कशे प्रेम करायचे त्याचे गणित आपणच ठरवूया कशाला करायची कुणाची कॉपी आपण आपल्या पद्धतीने जगूया चला जरा मस्त सूर लावूया शोभादर्शक नि त्यात रंगीत काच तुकडे कसे छान शोभादर्शक बनते तसे काही तरी करुया प्रेमाचे क्षण आपल्याला हवे तसे आपल्या मनात मांडूया जमेल [?] खरेच जमेल ..! प्रयत्न करुया ..!! कशासाठी कुणाला लाजून प्रेमाचे सूर लपवायचे कुणावर असेल प्रेम तर कशासाठी दडवायचे ? ती आली त्या दिवशी कसे ढग भरून आले होते निळ्या निळ्या साडीमध्ये तिचे मन फुलत होते काळेभोर डोळे नि मस्त चेहरा तारुण्याचे एक
काव्यरस

वासांसि जीर्णानि यथा विहाय

लेखक अवलिया यांनी सोमवार, 21/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि | तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२ ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो. सांख्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानानुसार त्या तत्वज्ञानाचे स्वरुप विशद करुन सांगतांना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे संवादातुन सांगितले त्यातले एक महत्वाचे वाक्य असे या श्लोकाला म्हणता येईल. जुन्या वस्त्रांच्या त्यागानंतर नवीन वस्त्रं धारण करणे हा दाखला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण नेहमी पहात असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही.

आज नव्याने

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 21/03/2011 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी झालो सज्ज रचाया तुझ्यावर नवीन सुरेल गाणी उघडली पुरचुंडी अन, काढल्या जुन्या आठवणी जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे मुद्दाम झालो पूर्णपणे रिते ... आता टाकली ती कात लिहायचो पूर्वी प्रेम गीते ... आता टाकली ती जात कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन फिरून नव्याने विणतो आहे तीच जुनी मी जाळी आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी

असेच काही

लेखक निनाव यांनी सोमवार, 21/03/2011 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली तु येशीलच आता असेच वाटतच राहिले वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले. तु येशील का खरंच? प्रश्न पडत राहिले ज्ञात असुन उत्तर, तरी विचारत राहिले उजाडण्याची वाट कशी बघतात सुर्यफुले मन माझे टक्क तुझी वाट बघत राहिले तु बघतच असशील चंद्र आकाशतले म्हणून व्हावे मी चंद्र असे वाटत राहिले आभाळात बसून मग तुला पाहात राहावे असेच अजुन न कळे पण बरेच काही...! पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली तु येशीलच आता असेच वाटतच राहिले वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले.

रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार

लेखक शुचि यांनी रविवार, 20/03/2011 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे. खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत. एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती.

होळी २०११

लेखक Antarang यांनी रविवार, 20/03/2011 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येवुन जवळ ४ वर्ष होत अलीत.... पण कधीच पुण्यातील होळी पाहण्याची इच्छा अथवा योग आला नाही... घरी होतो तेव्हा या सणाना फार महत्व होते आणी आज पण आहे... तेव्हा कमीत कमी शाळा/कोलेजला सुट्टी तरी असायची कीव्हा घरात काहीना काही गोड धोड बनत असायचे ... पण बाहेर असल्यावर ह्या गोष्टी अनुभवायला काय पहायला पण मीळत नाही... काल आमच्या सोसायटीतल्या (आमची एक अपार्टमेन्ट) मन्ड्ळीनी होळी साजरी करायचा बेत आखला होता..त्यात शनीवार असल्याने बाजुच्या काकु आणि ताईनी होळी बघायला बोलावले होते....

ओले परीस...

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 20/03/2011 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यामधील आसू परतून ना गळावे धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे आता न जाणवावी दुःखे उदासवाणी ’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी श्वासात ध्यास आहे तोची प्रकाश दावे आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com