फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, आमचे काका मिलिटरीमधून निवृत्ती घेउन कोकणातल्या आपल्या गावी जाऊन राहीले.
परिस्थिती अशी की बसून खाणे शक्य
कारण अनेक आंबे फणस काजु कोकमाच्या स्वतःच्या बागा.
पण स्वस्थ बसवेना...
घराच्या पुढील बाजूस एक छोटंसं दुकान टाकलं. गिर्हाइक येऊ लागलं... लोकांच्या अपेक्षा वाढू लागल्या
मग दुकानात अधिक वस्तु ठेवणे सुरु झाले.
दुध, आइस्क्रीम, कोल्ड ड्रींक सार्याच्या एजन्सी घेतल्या.
हे एका बाजूला पण तिथल्या स्थानिक लोकांचं वागणं अजब.
शक्यतो काही काम सांगितलं की चेहेरा वाकडा.