Skip to main content

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/03/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

रताळ्याचा शिरा

लेखक कच्ची कैरी यांनी रविवार, 10/03/2013 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
shiraकृती- १)रताळे सोलून व किसून घ्यावे . २) एका कढाईत तूप गरम करावे ,त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे . रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी .उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व निट एकजीव करून घ्यावे . ३) रताळी चांगली शिजू द्यावी ( साधारण १० ते १५ मिनिट लागतील ) .

प्रेम - भक्ती

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 10/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत. संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं.

अद्भुत भाग ३

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 10/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
8 तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/ अॅन आहे तो कोण आहे? अर्धमानव म्हणजे? म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता. तो कसा काय? 2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. अच्छा.

राहुलजींच्या कारकीर्दीतील पुढचा टप्पा

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 10/03/2013 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.theunrealtimes.com/2013/03/08/impressed-by-rahuls-lack-of-in… राहुलजींनी लग्नाचा विचार नाही व भारताचा अनभिषिक्त सम्राट व्हायची इच्छा नाही. तमाम पायघड्या घालणारे काँग्रेसी चेले बुचकळ्यात पडले. पण ह्या थोर वर्तमानपत्राने आपला मोठ्ठा शोध लावला आहे की महाज्ञानी राहुलजी पोपच्या पदाकरता उत्सुक आहेत. आता सगळा उलगडा झाला.

हाळिवाचे लाडु

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 09/03/2013 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः हाळिव - १ वाटी नारळ - १ गुळ - दिड वाटी नारळाचे पाणी - १ वाटी विलायची पावडर - १/२ छोटा चमचा कृती: १. हाळिव निट निवडुन घ्यावेत. त्या मधे अगदी बारीक खडे असण्याची शक्यता असते. लाडु खाताना ते दाताखाली आल्यास कचकच लागते. त्यामुळे हे काम वेळखाउ असले तरी निट करावे. २. ओला नारळ फोडुन, त्याचे पाणी वाटीत काढावे व खोबरे खवुन घ्यावे. ३. एका भांड्यामधे हाळिव, नारळाचे पाणी व खवलेले खोबरे टाकुन मिक्स करावे. नारळात जास्त पाणी नसल्यास, शहाळ्याचे पाणी वापरले तरी चालेल. ४. आता हे सर्व निट मिक्स करुन, २-३ तासांसाठी झाकुन ठेवावे.

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

लेखक लिलि काळे यांनी शनिवार, 09/03/2013 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का? आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे. अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात.

करंट मस्त...दत्त दत्त...!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 09/03/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्‍या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.

मनोरमा

लेखक प्रतिज्ञा यांनी शनिवार, 09/03/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रिनिनो, थोड पाककृतीच्या नावाबद्दल सांगावस वाटत. मनोरमा हा पदार्थ एकदम साधा पण चविष्ट पाककृती मध्ये मोडतो. मला माझ्या मामा मुळे महाराष्ट्रातील अधिवासी पट्ट्याचा (धडगाव, अक्कलकुवा, तोरणमाळ ई.) सहवास लाभला. त्या भागात मनोरमा न्याहारी/ नाश्त्यात बनतो. माझ्या आजीच्या एका मैत्रीणीने मोठ्या कौतुकाने (कौतुकाने ते या साठी कि मी पहिल्यांदाच त्यांच्या पाड्यावर जाणार होती व त्याच वर्षी मी दहावी बोर्डात वर्गात पहिला क्रमांक मिळवला होता:) ) मला मनोरमा व माझ्यासमोरच काढलेल्या बकरीच्या दुधाचा गुळ घालून बनवलेला पातळसा (खर सांगायचं म्हणजे बकरीच्या दुधाचा चहा पातळच बनतो. पण हे मला त्यावेळी माहित नव्हत.