Skip to main content

जे का रंजले गांजले

लेखक Rahul Bhuskute यांनी बुधवार, 08/01/2014 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमटे हे कुटुंब हे खरोखर आदरणीय आहे. बाबा आमटेंची मुले (डॉ. प्रकाश आमटे) हेच त्या आदिवासींच्या शाळेत शिकले व कुठलही आधुनिक सोविसुविधा नसताना डॉक्टर बनवून दाखवले. जिथे कुष्टरोग म्हटले तर आपल्या अंगावर काटा येतो व त्यांच्या जवळ पण जायची भीती वाटते. अश्या लोकांना आपले म्हणून जवळ केले व ते समाज कार्य केले ते खरोखर वंदनीय आहे. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." जेंव्हा सरकारांनी ९ वरील gas सिलेंडर वरील अनुदान रद्द केले तेंव्हा डॉ. प्रकाश आमटेनी असे सांगितले कि आम्हाला गस सिलेंडर भरपूर लागतात व सिलेंडर मध्ये आमचे खूप पैसे खर्च होतील.

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

लेखक विद्युत् बालक यांनी मंगळवार, 07/01/2014 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे २०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे . ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील . आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे .

भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 07/01/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
'आरं ते रम्या आलंय नव्हं,' 'आणि आलं का?,' 'म्हणजे लग्नाला मुलगी बघतोय माहीत नाय काय?,' 'लाय गावडळं हाय बघ,कोण देणार त्याला मुलगी,' 'आरं मुलगा कसला का आसना काम करणार पाहिजे,आणि हा तर शहरात वाँचमनी करतोय की,' 'ते बरोबर हाय पण याचं नशिब कसं फळणार,याच्या बरोबरची लगीन होऊन दोन दोन पोरं झाल्याती, आणि हा बसलाय हात हालवत,' आसे शिरर्क्या म्हणताना सर्व जण हासु लागले, या महिन्यात रम्यानं कारण नसताना चांगली पंधरा दिवसाची रजा काढुन गावी आला होता,पहिल्या पाच दिवसात त्यानं दोन मुली शेजारच्या गावात पाहिल्या,पण काही जुळले नाही.नेहमीप्रमाणे तो बाबाला हातबार लावण्यासाठी पिठाच्या चक्कीवर काम करी,मग वसंतराव ही रम

ट्रोजन युद्ध भाग २.४- अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

लेखक बॅटमॅन यांनी मंगळवार, 07/01/2014 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते. मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले.

योगी पावन मनाचा

लेखक धन्या यांनी मंगळवार, 07/01/2014 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी.

माझे [मावळत्या (भागः१/३)] पंतप्रधानांवरील आक्षेप

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 07/01/2014 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
या ठिकाणी कोणत्याही व्यक्ती अथवा पक्षाबद्दल लिहिण्याआधी या लेखमालिकेबद्दल प्रस्तावना म्हणा उद्देश म्हणा लिहिणे गरजेचे ठरते. सदर लेखमालिका राजकीय विषयावर असली तरी ती मी 'जनातले मनातले' विभागात टाकतो आहे कारण या लेखमालिकेत व्यक्त केलेली मते ही निव्वळ वैयक्तिक आहेत. ही मते माझ्या भोवती घडणार्‍या घटना, माझ्या वाचनात येणार्‍या बातम्या, मला जाणवणारी/दिसणारी वस्तुस्थिती यांच्यामुळे तयार झालेले माझे पर्सेप्शन आहे.

बीट पुलाव

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 07/01/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव कि. तांदूळ, एक टोमॅटो, दोन कांदे, १०-१२ फरसबी शेंगा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी काजूगर, एक गाजर, ५-६ लसूण पाकळ्या, आलं एक छोटा तुकडा, लाल तिखट १ चमचा, एक चमचा गरम मसाला, दोन मध्यम बीट, तूप, जिरे, ५-६ काळी मिरी, मीठ. कृती: तांदूळ धूऊन निथळत ठेवावेत. बीट शिजवून घ्यावीत. साले काढून बीट मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी. काजूगर पाण्यात भिजत घालावेत. तांदूळ थोड्या तूपावर परतून मीठ, थोडे वाटलेले बीट घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे चिरून घ्यावे. गाजराचे पेरभर लांबीचे पातळ चपटे तुकडे करावे. फरसबीच्या शेंगांचे पेरभर लांबीचे तिरके तुकडे करावे.

नविनच

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 07/01/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते....
काव्यरस

साहित्यिक ख़ज़ीना

लेखक शुचि यांनी मंगळवार, 07/01/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला. http://www.belvalkarhousing.com/ या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे. लहानपणी चिवड़ा लाडूचे बोकाणे भरत भरत वाचलेले साहित्य परत वाचावयास मिळते आहे. पुनर्वाचनाचा अत्यंत उच्च आनंद अनुभविण्यास मिळत आहे.