Skip to main content

मग कधीतरी

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 11/08/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
मग कधीतरी ..... त्या समुद्राला उधाण असेल, त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल त्या विजेचाही कडकडाट असेल मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल त्या अंधारलेल्या पावसाळी, तू आणि मी माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार, भिजलेली मनं, पेटलेली शरीरं काहीतरी नक्कीच घडनार आज पण कसेचे काय, माझी बस येइल आणि मी निघून जाइल पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल मग

पैसा येतो आणिक जातो

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/08/2014 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

सलाम एसटी चालकांना

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 11/08/2014 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता. तिथे उभं राहून त्या अजस्त्रयंत्राला मी न्याहाळायला लागलो.

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 11/08/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यातील नवरसांत देशभक्तीच्या दहाव्या रसाची भर घालणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू आणि हिंदी गीतांची सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है ही सीडी www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येत्या १५ ऑगस्टपर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे.

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 11/08/2014 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे, १) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच.

हे मन सैरभैर....!

लेखक फिझा यांनी सोमवार, 11/08/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे मन सैरभैर....! मृगजळाच्या मागे धावते तप्त उजाड वाळवंट त्यात …. मोकळं मोकळं निळं आभाळ ढग पांढराही नसे त्यात …. दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. खोल खोल दाट काळोख आसवांचे काजवे त्यात … थकली पावलेही अंधारात मऊ मऊ काट्यांची वाट … दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. बरसुनही मुसळधार कधीचे परत दाटुनी आले त्यात …… प्रत्येकाचं भिजणं वेगळं पाऊसही चिंब आज तशात ………. दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. शांत भासतो समुद्र जरी फेकीतो लाटांवर लाट … छोटीच होडी वाचलेली , मोठी नौका गिळंकृत …….

प्रेमाची कहाणी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 11/08/2014 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो । बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।। प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी । संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।। प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत । कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।। कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई । कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।। भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले । "ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।। आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग । तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।। परिणाम होव

भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 10/08/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा! खात्री असणार्‍यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते.