द्वेष्टे -भाग 2
त्या पाय-या रेघारेघांच्या सुती कापडानी आच्छादलेल्या होत्या. ॲबोजीनने पहिल्या मजल्यावरील उजळलेल्या खिडक्या बघितल्या ,त्याक्षणी त्याचा थरथरता श्वास अगदी स्पष्ट ऐकू येत होता.
जर काही अभद्र घडले असेल तर.... तर मी जिवंत राहू शकणार नाहीं...तो स्वताशी म्हणाला.डॉक्टरांना घेऊन तो आत दिवाणखान्यात शिरला .अस्वस्थपणे तो आपले हात चोळत होता. तिथे असलेली शांतता पाहून तो म्हणाला, 'इथे काही गडबड गोंधळ दिसत नाही त्याअर्थी अजूनपर्यंत तरी सारे ठीक दिसते आहे.'
दिवाणखान्यात कसलेहीआवाज किंवा कुणाचीही चाहूल नव्हती. प्रकाशाने उजळलेले ते घर गाढ झोपी गेल्यासारखं दिसत होतं.
मिसळपाव
पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.