Skip to main content

अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवे वादळ आणू पाहात आहे जीवनाला परखूं पाहात आहे जे अपशब्दापायी बेचैनीत हरवले त्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला जीवनाशी प्रतिघात करता, जे थकले अशासंगे हसत रहावे असे वाटे मला अनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनो उत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला सरहद्दीवर शव वस्त्र ओढून आहेत उभे, हिम्मत त्यांची वृद्धिंगत करावी वाटे मला जरका एखादा मोका मिळू शकला मला, मनुष्याचे दुःख विसरवीणे असे वाटे मला कवीला जरका नसेल कसले सामर्थ्य, शांती,सुरक्षा दुनियेत यावी असे वाटे मला *

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी श्री समर्थांना म्हणालो, “बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो. मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे. परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट, अहंकारी आहे असं म्हणाली. ऐकून मला वाईट वाटलं “ असं म

(चार दिवस मिळाले असता )

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 14/05/2024 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

वरवर लहान वाटणारे अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली. मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं.

काय करावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे
काव्यरस

"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे. मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते. माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

अत्तर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 12/05/2024 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तर ------------------------------------------------ संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती. राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला. ‘अप्पा काय आणलं ?’ असं कुतूहलाने विचारत त्याने अप्पांच्या हातातली पिशवी घेतली. तो घरात शिरला .

सुंदर गीते ही स्मरणात येती

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
अवकाश आहे म्हणून बसता जुन्या गोष्टी स्मरणात येती कधी सत्याची,कधी असत्याची सुंदर गीते ही स्मरणात येती शताब्दी एकवीसावी अन् समय नवे प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारे भोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारे सणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होई किंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई आता लाखोंची घरे वीजदिपानी सजविती रातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येती आता लाख रुपयांना किंमत विशेष नाही चवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात येई

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.