मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

असणे आणि दिसणे...

बाजीगर ·
लेखनविषय:
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-article-navneet-rana-and-relief-in-caste-certificate-case-reason-given-by-supreme-court-give-print-exp-asj-82-4300786/ Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app ज्या शाळेत शिकल्या म्हणे नवनीत राणा । ती अस्तीत्वात च नाही, म्हणे, हे कारण जाणा ।। पंजाबी चमार चे, केले मराठी मोची । विरोधकांनी केली, थोडा काळ गोची ।। जात प्रमाणपत्र, पाहता अवैध । मुलं घाबरली,आई होणार का कैद ?? हायकोर्टाने ठरवले अवैध । सुप्रीम कोर्ट ने करवले वैध ।। युक्तीवाद म्हणजे, शब्दांना किसणे । शेवटी कामी आले, छान छान

वासोटा जंगल ट्रेक

चक्कर_बंडा ·
जानेवारी २६, २०२४ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातंर्गातील, सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात वसलेला वासोटा हा एक पुरातन वनदुर्ग, पुर्वी घनदाट जंगलाने वेढलेला तर कोयनेवर बांधलेल्या धरणामुळे आता पाण्यानेही वेढला गेल्याने अधिकच दुर्गम झालेल्या या किल्ल्यावर शिवसागर जलाशयाच्या कडेला वसलेल्या बामणोली गावातून स्वयंचलित लाँचसेवेच्या मदतीने पोहोचता येते.

डीलर झाले लिडर..

बाजीगर ·
लेखनविषय:
https://www.loksatta.com/politics/in-nanded-lok-sabha-bjp-s-ashok-chavan-now-became-leader-for-the-bjp-previously-called-as-dealer-print-politics-news-css-98-4299400/ Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app डीलर झाले लिडर भित्रे झाले नीडर ।। झाले भाजपा-वासी, धरला भगवा दामन ।। दाग अच्छे है..., दागी झाले पावन ।। नानांचा रिक्रृटमेंट ड्राईव्ह, चर्चा हाॅटेल स्टार फाईव्ह ।। नेत्यांना करा अगवा, व द्या हाती भगवा !! कालचा जो चोर, आजचा अर्थमंत्री।। काल जमीन-चोर, आज थोर लोकतंत्री ।। पहायचय अजून फार । मिशन चारसो पार ।।

वाढदिवस स्पेशल: आलू बोंडे

विवेकपटाईत ·
आज माझा ६३वां वाढदिवस. सौ. ने वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत शिऱ्याचा नैवैद्य दाखविला.

एक आत्मशोध...

बाजीगर ·
लेखनविषय:
https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-biological-mother-i-want-to-hug-her-once-ask97 घ्या कविता... कुणी आई देता का आई पेट्रीसिया विचारत जाई. स्विडन ते नागपूर घेऊन डोळ्यात पूर तपासल्या सर्व सरकारी नोंदी तरी सुटेना कोडे, तिची कोंडी. मला काहीच नको, नाही काही तक्रार, फक्त मला झोपू दे शांत मांडीवर एकवार तू टाकलेस आश्रमाबाहेर सोडले वा-यावर स्विडिश फरीश्त्यां नी झेलले वरवरच्या वर आंगणवाड्या,पोलीसस्टेशन, शांतीनगर जुन्या भागाला भेट, कुठलाच दुवा मिळाला नाही पुन्हा पाहून आले आश्रम-गेट. तुझी नकोशी, त्यांची पेट्रीसिया अशीच का सापडली जनका स सिया (?!) आता शोधल्या शिवाय

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·
लेखनप्रकार
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

पाकिस्तान -९

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
. “काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान. युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या.

कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं...

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
जंग जंग पछाडले शब्द नाही फुटला सरकारी यंत्रणांना दरदरून घाम सुटला मीच करणार राज मीच रहाणार चिफ माझाच पट, माझीच चीत मज द्या न द्या रिलीफ मला नाही माहीत नाही मला आठवत सरकारी यंत्रणांना हे का नाही कळत मी नाही काही केलं ज्यांनी केलं त्यांना बोला सरकारी यंत्रणेला आम आदमीचा टोला बघू आता पुढं काय होतय कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ४

गोरगावलेकर ·
भाग ३ येथे वाचा काल रात्री आम्ही सावित्री नदी पार करून हरिहरेश्वरास आलो होतो. सावित्री नदीच्या दक्षिण तीरावर जेथून फेरीबोट सुटते तेथे वेश्वी गाव आहे आणि येथेच रत्नागिरी जिल्ह्याची हद्दही संपली. नदीच्या उत्तर तीरावरील बागमांडला येथे पोहचताच आमचा आता रायगड जिल्ह्यात प्रवेश झाला होता. आज सहलीस निमित्त ठरलेला दिवस म्हणजेच 'महिला दिन' उगवला. ध्यानी मनी नसतांना आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी आम्ही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरास येऊन पोहचलो होतो. मंदिरात प्रचंड गर्दी असणार होती.