Skip to main content

ये कश्मीर है - दिवस पाचवा - १३ मे

लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 20/05/2017 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
'रात गई बात गई' हे वाक्य गुलमर्गने ऐकले नसावे, कारण आज आम्ही उठलो तर हवा अगदी कालसारखीच होती. 'नऊ वाजता गुलमर्ग गोंडोलाची तिकीटखिडकी उघडते, वेळेआधी अर्धा तास तिथे पोहोचायला हवे, नाहीतर रांग मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाईल आणि मग रखडपट्टी! गोंडोला उरकून आपल्याला आज पेहेलगामला पोहोचायचे आहे' हे गणित पुरते लक्षात असल्याने मी आळस झटकला आणि आवरायला सुरुवात केली. बाथरूमात गरम पाण्याची वेगळीच गंमत होती. पाणी जेव्हा गरम येत होते तेव्हा ते पुरेसे येत नव्हते आणि जेव्हा पुरेसे येत होते तेव्हा गरम येत नव्हते. तशाही परिस्थितीत आम्ही आंघोळी उरकल्या.

कथुकल्या ८

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 20/05/2017 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
१. शेवटची इच्छा "तात्या, पाणी तर वाढतच चाललंय. आता काय करायचं ?" "चिंता करू नको. निलगिरीचं ते उंचच उंच झाड दिसतंय ना, त्यावर जाऊयात." झाडाच्या फांद्यांनी अलगद तोललेल्या आपल्या लाकडी घरातून त्या तिघांनी आवश्यक तेवढं सामान गोळा केलं. फळे, कंदमुळे, आजूबाजूच्या पाण्याने वाहून आणलेल्या मृत मासोळ्या थैल्यांमध्ये भरल्या. बाहेर गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा कहर माजला होता, विजा आकाशीचा नगारा बडवत गर्जत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने लहानमोठ्या झाडांना तर केव्हाच उपटून फेकून दिलं होतं.

रव्याचे झटपट अप्पे

लेखक रुपी यांनी शनिवार, 20/05/2017 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी ऐन वेळी ठरवून सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहाच्या वेळी हे अप्पे करता येतात.

अनवट किल्ले ८ : दाजीपुर अभयारण्यात, शिवगड (Shivgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 19/05/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुस्वागतम मंडळी ! या कोल्हापुरी रांगड्या मातीत सर्व मिपाकरांचे मनापासुन स्वागत. कोल्हापुर हे नाव आले की, महारांजाची धाकटी गादी, नवा आणि जुना राजवाडा, अंबाबाई मंदिर, साठमारी अशी अनेक एतिहासीक स्थळे डोळ्यासमोर येतात. खवय्याना तर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, तर माझ्यासारख्या घासफुसवाल्या मंडळीना मिसळपाव आठवतो. फॅशनप्रेमींसाठी कोल्हापुरी चपला आहेतच व खिसा हलका करायची तयारी असेल तर गुजरीला जाउन कोल्हापुरी साजाची ऑर्डर करुन कारभारणीला खुष करा, तर रसिक मंड्ळीना लावणी व कुस्तीचा आंनंद घेता येईल.

शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ३

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 19/05/2017 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस तिसरा कालचा दिवस " रोम" स्पेशल असे काहीही हाती काहीही लागले नाही म्हणून आजचा दिवस तरी पुरता कारणी लावायचा या निश्चयाने बाहेर पडलो. बाहेर गार हवा व थोडासा पाउस पडत होताच. आम्हाला सांता मारिया चर्च बघायचे आहे असे एकाला विचारले असता त्याने " आता येणार्‍या बस क्र २३ ने पिरॅमिड चौकात उतरा व तेथून ८ नंबर ट्राम ने मोरमाटा मार्गाने एम्पोरिओ चौकात उतरा तेथून जवळ त्रास्तवेर विभाग सुरू होतो." असे सांगितले. . पिरॅमिड चौक .

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 19/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 19/05/2017 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग 'अनुक्रमणिका' वापरून वाचता येतील आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/39406 सात सालको क्रांती - राणा राजवटीचा अंत आणि नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग! १९४७ साली भारतातून ब्रिटिश निघून गेले आणि नेपाळमध्ये ब्रिटीश समर्थक राणा शासनाचे पारडे काहीसे हलके झाले. पण त्याही आधी, म्हणजे चाळीशीच्या दशकात नेपाळमध्ये एक रंजक बदल घडत होता, हळू हळू पण निश्चित असा बदल.

मँगो पुडींग

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 19/05/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
aamba साध्या सरळ शांत स्वभावाच्या नवय्राने एकोणिस वर्ष मला सहन केलं, मी करत असलेल्या प्रायोगिक रेसिपी नावं ठेवता खाल्ल्या म्हणून आज त्याच्यासाठी ही स्पेशल डीश!

बर्गर आणि वडापाव.

लेखक सचिन काळे यांनी शुक्रवार, 19/05/2017 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला." तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!" ती : "अरेरे! लक्ष कुठे असतं कोण जाणे त्यांच्या आयांचं? हो सरक त्या बाजूला.

"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

लेखक जीएस यांनी गुरुवार, 18/05/2017 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन हजार सहा सालची गोष्ट आहे. माझा एका उद्योगसमूहाच्या बायोडिझेल प्रकल्पाशी संबंध आला. अखाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेलची निर्मिती असे प्रकल्पाचे स्वरूप होते. साहजिकच असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करंज तेलासारख्या अखाद्य तेलांची खरेदी करू शकतात. यातूनच एक योजना सुचली होती की वनवासींना पडीक वनजमिनीवर जर करंज लागवड करायला मदत केली तर एका एकरात एका कुटुंबाला २४००० रुपये एवढे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल. सुरुवातीला पाच हजार एकर जमीन व पाच हजार वनवासी परिवार असा एक पथदर्शी प्रकल्प राबवता येईल अशी कल्पना होती. कुठल्यातरी राज्य सरकारच्या मदतीनेच हे होणे शक्य होते. मला श्री.