Skip to main content

अनवट किल्ले २४: महाराष्ट्राच्या उत्तरटोकाचा, सोनगीर ( Songir )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 15/12/2017 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वाचा होता कारण उत्तरेकडील शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी या मार्गाचा वापर करीत. तर मागच्या बाजुने जाणारा रस्ता नंदुरबार-सुरत या मध्ययुगीन महत्वाच्या शहरांना जोडतो. त्यामुळे या आक्रमकांना प्रतिबंध करण्या साठी मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. २५० मध्ये अहिर राजांनी तो जिंकला.

अरि

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/12/2017 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
अरि ....... त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!! तर वार्षिक क्रिडा महोत्सव सुरु झाला. हा जोश, हा उत्साह!!

हिरवे सोने

लेखक चांदणशेला यांनी गुरुवार, 14/12/2017 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी
काव्यरस

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग १

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 14/12/2017 04:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन भारताच्या काळात जे यज्ञ केले जात त्या यज्ञाचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी यज्ञ तंतोतंत मुळाबरहुकूम केला जाणे अपेक्षित होते आणि त्यामुळे यज्ञविधीमधील मन्त्रोच्चारण, त्यांचे व्याकरण, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी व्युत्पत्ति, ऋक्-छन्दांचे ज्ञान, यज्ञास योग्य काळ आणि यज्ञांमधील कृति अशा सहा गोष्टी शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्दस्, ज्योतिष आणि कल्प ह्या सहा निरनिराळ्या वेदांगांनी नियमित केल्या गेल्या आहेत. ह्या सहा वेदांगांपैकी कल्प हे वेदांग नाना यज्ञांचे विधि कसे करावेत हे सांगण्यासाठी निर्माण झाले आहे. कल्पसूत्रांचे मुख्यत: दोन विभाग आहेत.

दिवस उजाडता.....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 13/12/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या चालण्याने आरोग्यसंपन्न आयु लाभते असं म्हणतात. पण रात्रीच्या सुखासिन झोपेचे साखळदंड तोडणं फार कठीण असतं, हा अनुभव आहे. त्यातून पुन्हा ह्यात सातत्य राखण्याचे अवघड उद्दिष्ट. मोठ्या कष्टसाध्य यशानंतर अवतीभवतीचं जग मला नव्याने 'दिसू' लागलं. नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाळी वातावरणाने हवेत, सुखदपेक्षा जास्त आणि बोचरा म्हणता येणार नाही असा आल्हाददायी गारवा अनुभवत होतो. दूरवरून जाणार्‍या गाडीच्या इंजिनाचा भोंगाही, शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या भूप रागाइतकाच प्रसन्न वाटतो.

देव,धर्मादी संकल्पना-- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी.

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी मंगळवार, 12/12/2017 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही. मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण

(नोटा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/12/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी? चालः- गे मायभू तुझे मी नोटा नोटा कितीक असती हजार पाचशेच्या नाही कुणास मुल्य कागद वाटती साऱ्या दूरस्थ आयकर विभाग ठाऊक पाहतो मजला डोळ्यांत् कॅशियरच्या अनुकंप दाटलेला झालो विवश परंतु बोलणार काही नाही निःशब्द भावनांना होळीच साक्षी राही अत्यंत भित्रे 08112016 पैजारबुवा,

वाटा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 12/12/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा वाटा कितीक असती येती तुझ्याकडे ज्या नाहीच एकही माझी परक्याच वाटती साऱ्या दूरस्थ तूही तेथे ठाऊक पाहसी मजला ओठांवरी तुझ्या ही वसलेला तोच अबोला वाटे परंतु तरीही बोलणार कुणीही नाही निःशब्द भावनांना आभाळ साक्षी राही पद्मश्री चित्रे 24102017
काव्यरस

आता ई-बुक मोडी लिपीतही! जाणून घ्या पहिल्या मोडी ई-बुक निर्मिती मागची धडपड

लेखक कौशिक लेले यांनी सोमवार, 11/12/2017 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं.