Skip to main content

वेदांग शिरोडकर

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 17/02/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारंभ: एच् ब्लॉक, रुम नंबर ११७. हॉस्टेलच्या ४-५ मजली इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडी जाळीच्या गेटपासून पहिलीच रुम मी पसंद केली होती. भूकंप झाला तर सर्वात अगोदर इमारतीपासून शक्य तितक्या दूर धूम ठोकता यावी असा माझ्या लातूरकडच्या भूकंपकंपित मनाचा हिशेब त्यामागे होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाड्याचा कोटा कमी असल्यानं त्यामानानं चांगले मार्क असूनही मला उशिरा, म्हणजे दुसर्‍या यादीत, १-२ महिन्यांनी, हॉस्टेलरुम अलॉट झाली होती. रुमच्या लोकेशनवर मी खुष असलो तरी मात्र तिथला व्यत्यय नि वर्दळ यांच्यामुळं शिरोडकरला ती आवडत नसे.

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

लेखक परशुराम सोंडगे यांनी शनिवार, 17/02/2018 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************** अजून एका स्वांतञ्यासाठी....!! ************************* मातीची महती गात. तुक्याचे अभंग घोकत. रक्ताचं पाणी करतं नुसता घाम गाळत राहूनचं रान हिरवं गार करायचं पण मातीचं तरी मोल असत का आमच्या जिण्याला तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू नाही तरी या देशाचा शेतकरीराजा अाहे असं समजून हा देश क्रषीप्रधान अाहे म्हणून नुसत्या टिरी बडवून का घ्यायच्या? शेती तंत्रज्ञान , नवीन शोध,कार्यशाळा वैगेर असे खास थाट करून भाषण छान होतील पण रान नसतात पिकत अशा क्रत्रीम अवसानाने अाणि हे समजून घ्या तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही निघत घाम नि रक्ताचे ही नाही होत पाणी घ

मूठ / कर्ज

लेखक संदीप-लेले यांनी शुक्रवार, 16/02/2018 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूठ झाकली मूठ म्हणे सव्वा लाखाची दाबली मूठ ती मात्र तिजोरी कुबेराची कर्ज अर्जावर अर्ज तरी नाही गरिबाला कर्ज हात करा ओले मिळेल अर्जाशिवाय कर्ज

अनवट किल्ले २७: राणी लक्ष्मीबाईचा माहेरचा वारसा, पारोळा ( Parola )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 16/02/2018 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मै मेरी झांसी नही दुंगी" हा बाणेदार उदगार काढणारी मर्दानी झाशींची राणी उर्फ मनकर्णिका तांबे ह्या मुळ पारोळा या गावच्या. याच गावात खंदकांनी वेढलेला बळकट भुईकोट आज काहीश्या पडीक अवस्थेत उभा आहे. याच भुईकोटाची या धाग्यात माहिती घेणार आहोत. केळी, सोन्याच्या पेठा आणि चित्रपटांच्या वितरणाचे केंद्र अश्या विवीध कारणासाठी प्रखात्य असणार्‍या जळगाव जिल्ह्यातून धुळे-नागपुर महामार्ग जातो. याच महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी पारोळे गाव वसलेले आहे. पूर्वी या गावातील रस्त्यावर अधूनमधून पिंपळाचे अनेक ' पार ' ओळीने बांधलेले दिसायचे.

काही त्रिवेणी रचना...

लेखक राघव यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द.. ============ सांगायचं कसं अन् लिहायचं कसं.. मनांतलं शब्दांत मांडायचं कसं? त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?" ============ लहान मुलं आणि त्यांची निरागसता.. वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन.. पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व! ============ प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये.. ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं.. गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात! ============ केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास..
काव्यरस

बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला... आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच. आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला .. छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं.. ................................................................................ माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता.. आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता.. बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ?

॥ रमू नको या जगात ॥

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 16/02/2018 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
रमू नको या जगात दुःखांचा राजा तू दुःख कनवटीला असे घे दुःखांची मजा तू विरह असो , प्रेम असो असो प्रेमाचा भंग तो कुणीही तुला काही म्हणो तू मात्र अभंग हो जळो कुणी , कुणी मरो जगण्यात काय ते जळीस्थळी दुःख ज्याला त्याला मरण्यात काय ते दुःख दुःख दुःख कुणी पहिले नसेल ते सुख सुख सुख कुणी स्पर्शिले नसेल ते वंद तू धर्मास या कर्माचे मर्म जाण मोक्ष असा ना मिळतो विरहाचे कर्मकांड अंतरी तू शोध घे विरहाचे काय ते सोड वस्त्र देहाचे आत्म्याचे पाय ते उडून जा किरणासम भेद घे तू आत्म्याचा मोक्ष प्राप्त होई तुज आवाज हा परमात्म्याचा सिद्धेश्वर विलास पाटणकर C
काव्यरस

वलय (कादंबरी) - प्रकरण १२

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 16/02/2018 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ९, १० आणि ११ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41948 ---- प्रकरण 12 संध्याकाळी साडेसात वाजता दोघे बेडवर एकमेकांच्या पायात पाय अडकवून बाहुपाशात बसलेले होते. न बोलता. शांत. निवांत. “मी कॉफी बनवून आणते!”, रागिणीने शांतता भंग केली. “थांब. बैस अजून! अशीच मला चिटकून बाहुपाशात बसून रहा! तुला क्षणभरसुद्धा दूर होऊ द्यावेसे वाटत नाही!” सूरज तिला आणखी छातीशी ओढत म्हणाला. “मिस्टर सूरज सिंग! आता अप्रेम बास झालं! थोडं प्रेम उद्यासाठी राहू द्या!”, असे म्हणत तिने जवळ पडलेली ब्रा उचली आणि घालायला सुरुवात केली. “ओके रागिणी जी!

पेशवाईतल्या गमतीजमती

लेखक मनो यांनी शुक्रवार, 16/02/2018 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही माहिती मला उल्लेखनीय वाटली म्हणून काही पुस्तकातून जवळपास जशीच्या तशी घेतली आहे. इतिहास संशोधकांना अर्थात ती आधी माहित असेलच. शक्य तिथे मूळ पुस्तकाचे उल्लेख केले आहेत. नवीन संशोधनाबद्दल वाचायचे असेल तर थोडी वाट पहा - दोन लेख नवीन माहितीसह देणार आहे काही दिवसात, एक साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आणि दुसरा पुण्याच्या शनिवारवाड्याबद्दल ... :). १) श्री. यशवंत नरसिंह केळकर यांनी 'मराठी रियासत - उत्तरविभाग १ - सवाई माधवरावाच्या पूर्वायुष्यक्रम' या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात दोन पानी लेख लिहिला आहे.

ग्रामीणांचा आहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/02/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा.