Skip to main content

असं वाटतं !

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 25/04/2018 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं............... निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................
काव्यरस

ऑक्टोबर

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 24/04/2018 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या महत्वाच्या गरजा भागलेली आजची तरुणाई. कुठच्यातरी भयंकर अडचणींमधून मार्ग काढून काहीतरी नेत्रदीपक करण्याची निकड संपलेली. जगण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोय, हे कळण्याइतका विचार करण्याची सवय नाही, आणि तरी त्या प्रश्नाच्या गर्तेत कधी ना कधी अडकून भरकटणारी, त्या डोळ्यांत भरणाऱ्या भरकटलेपणावर आपापल्या कुवतीने उत्तरं शोधणाऱ्या, सुचवणाऱ्या जगावर कावलेली तरुणाई. ऑक्टोबरमधला डॅन म्हणून सहजपणे आपला वाटू शकतो. व्यवहारात मंद, आणि तरी काहीतरी करण्याची इच्छा असणारा, ते करण्यासाठी मार्ग माहीत नसलेला, आणि मग ती काही करण्यासाठीची ऊर्जा उगाच जगाला हडतुड करत वाया घालवणारा डॅन.

रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/04/2018 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
कोण अपुला कोण परका ओळखावे मी कसे? काळजाचे प्रश्न अवघड समजवावे मी कसे? कोरड्या रस्त्यात स्वप्नांचे विखुरले पंख कां, जखम ओली, तप्त रुधिरा आवरावे मी कसे? हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे, रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे? ऐक वेड्या ओळखीचे चोर दिसती साजरे या घडीला माणसांना पारखावे मी कसे ? स्वार्थ सत्ता द्वेष मत्सर माणसांचे सोयरे बंधुभावाचे नगारे वाजवावे मी कसे ? शांतचित्ताने विशाला आळवावे राघवा दांभिकांचे दंभ फुसके जोजवावे मी कसे? © विशाल कुलकर्णी
काव्यरस

हो मी अर्जुन आहे..

लेखक निओ यांनी मंगळवार, 24/04/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हो मी अर्जुन आहे.. तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा गुणवत्तेने भरलेला नव्या चक्रव्यूहात अडकलेला न लढताच पराभूत झालेला हो मी अर्जुन आहे.. या महाभारतात कृष्ण शोधतो आहे जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा जरी सापडला तरी माझ्या वाटणीला किती यायचा ईथे अवती भवती सारेच अर्जुन दिशा हरवलेले... तो कृष्ण.. सखा गुरू ज्ञाता परिस्थितीची जाणीव करून देणारा ध्येयाची जाणीव करून देणारा मला कृष्ण हवाय मार्ग दाखवणारा माझ्या रथाचं सारथ्य करणारा माझं मनोधैर्य ऊंचावणारा नारायणा....

न्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सभा , बरखास्ती प्रस्ताव आणि काही वेगळे प्रश्न या महिन्यात भारताच्या सर्वोच्च न्यायाधिशां विरुद्ध बरखास्तीचा प्रस्ताव राज्यसभेतील जवळपास ६५ खासदारानि राज्यसभा अध्यक्ष (उपराष्ट्रपती) व्यंकय्या नायडू यांच्या कडे पाठवला तो राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला आहे तूर्ततरी दिसते . एकंदर प्रकाराबद्दल मला काही जरासे वेगळे प्रश्न पडले . राज्यसभा हे भारतीय संसदेच वरीष्ठ सभागृह.

एकदा टारझन अंगात आला

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो

टोमॅटो सूप .. जरा वेगळ्या पद्धतीने ..

लेखक प्रिया१ यांनी सोमवार, 23/04/2018 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी जे टोमॅटो सूप किंवा सार करतो त्यापेक्षा हे जरा वेगळ्या पद्धतीचे आहे ... छान लागते... शिवाय फार वेळही लागत नाही ... साहित्य: -------- ३ ते ४ मोठे लालबूंद टोमॅटो २ मोठे कांदे १ टीस्पून जिरे २-३ मिरच्या १.५ इंच आल्याचा तुकडा किंचित हळद (जास्ती घालू नये नाहीतर टोमॅटोचा लाल रंग लपून जाईल) मीठ चवीपुरते साखर चवीपुरती थोडेसे पाणी १.५ चमचा अमूल बटर किंवा तूप (दोन्हीही छान लागते) फ्रेश क्रीम आवडीप्रमाणे - साधारण २-३ चमचे (अमूल चा टेट्रा पॅक मिळतो ते क्रीम त्याच्या even texture मुळे सुपात छान मिसळून जाते) आवडत असल्यास कोथिंबीर कृती: ------- कांदे सोलून घ्यावेत.

बस्तर

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 23/04/2018 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
झगड्यानं एक दगड उचलला आणि मागून पळत येत भिरकावून दिला. दगड डोक्यात बसला. पण डायवर हूं की चू न करता तसाच मातीत डोकं रूतवून पडला. दुपारची काहिली झळाळत होती. पाण्यावाचून तहानलेल्या बाभळीच्या वनात तो आडमुठा ट्रक उभा होता. कमरेवर हात ठेऊन दाद्या म्हणाला, "मेला की काय आयघालीचा?" "ह्या... आसा कसा मरंल.. उठंय ये शिकड्या.." बुटाडान त्याचंं थोबाड ढकलत झगड्या खाली बसला. तसा रक्ताचा एक ओघळंच त्या डायवरची पगडी भिजवत खाली निथळला. भर दुपारी आग ओकत दोघे चालू लागले. एका डबक्यात बुटाला लागलेलं रक्त झगड्यानं पुसून घेतलं.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ५

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 23/04/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वसूत्र :
खालची सही थोडी स्टायलिश असली तरी नाव सहज वाचता येत होते.
‘बापरे, १८५८ च्या जून महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाली होती !’ मी थक्क झालो.
‘हो. ...आणि १ नोव्हेंबर १८५८ ला हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटची, राणी व्हिक्टोरियाची सत्ता स्थापित झाली !’ प्रद्युम्न शांतपणे म्हणाला.

भाग – ५

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/04/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो " काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे.