Skip to main content

मा.ल.क.-२

लेखक शाली यांनी बुधवार, 23/05/2018 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावातुन दुसऱ्या गावात जायचे असल्यास मधले काही मैलांचे जंगल पार करुन जावे लागत असे. जंगलातुन जाणारा रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट वनराई, मधेच गवताळ कुरणे, विस्तिर्ण जलाशय, लहाण-मोठ्या टेकड्या. पण रस्ता कितीही सुंदर असला तरी निर्जन होता. त्यामुळे वाटमारी करणाऱ्यांचा हा आवडता परिसर होता. गावातुन रस्ता ज्या ठिकाणी जंगलात शिरायचा तेथे एक टुमदार धर्मशाळा होती. कारण कुणालाही जंगल पार करायचे असले की तो या धर्मशाळेत थांबे. सकाळपर्यंत दोघे-चौघे जमा होत. मग एकमेकांच्या सोबतिने जंगल पार केले जाई. एकट्याने जायची सोयच नसायची दरोडेखोरांमुळे. आषाढाचे दिवस होते.

मी पाहिले ..मी पाहिले

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 22/05/2018 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिले ..मी पाहिले या कथेतील एक नायक एके काळी भारतीय सैन्यात मेजर पदावर असलेला . एका धाडसी मोहिमेच्या वेळी स्फोटात जखमी झाल्याने त्याला आपला एक पाय गमवावा लागतो . नाईलाजाने आपल्या गावात परत येउन तो शेती व्यवसायात जम बसवतो. तरिही मनात कुठेतरी मुख्य प्रवाहापासुन वेगळे पडल्याचे दु:ख त्याच्या मनात आहेच . हे दु:ख आपल्या शेती कामातुन , तर कधी पिण्यातुन तो झाकुन टाकत असतो . पण कधी ना कधी त्याच्या बोलण्यातुन मनातला कडवटपणा बाहेर पडतोच . अजुनही त्याला बरेचजण आदराने मेजर या नावानेच ओळखतात . कथेतील दुसरा नायक आहे मनोहर . शहरातील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या श्रीमंत आई बाबांचा एकुलता एक मुलगा .

नाचणीचे शेंगोळे

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 22/05/2018 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
नाचणीचे शेंगोळे १. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत. २. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी. ३. पॅनमध्ये फोडणी करावी. त्यात आले, लसुण, कांदा , कढीपत्ता , कोरड्या मिरच्या वापराव्यात. नंतर अर्धवट शिजलेली डाळ घलुम्न थोडे घोटावे, पाणी वाढवून शेंगोळे सोडावेत व भरपूर शिजवावेत. शेवटी चिंचेचा कोळ व गूळ घालून हलवुन पुन्हा शिजवावे. sh

माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/05/2018 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन.... 1 मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो... त्यातला एक किस्सा सादर... ...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला.

राजयोग - १

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 22/05/2018 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - प्रस्तावना: रवींद्रनाथ ठाकूर लिखित 'राजर्षी' या हिंदी कादंबरीचा भावानुवाद करण्याचा हा छोटासा प्रयत्न. मायबाप रसिक वाचकांनी तो गोड मानून घ्यावा ही कळकळीची विनंती. रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलं आहे त्या योग्यतेचं लिहिणं आपल्याला शक्य नाही ही मर्यादा माहीत असूनही हे वेडं दु:साहस करतीये. ही कथा वाचताना वाचकांना काही त्रुटी जाणवल्या तर तो सर्वस्वी माझ्या लेखणीतला दोष आहे. लिहायला सुरुवात केल्यानंतर आठवलं की, इथे मिपावरच एका धाग्यात त्रिपुराच्या इतिहासाबद्दल थोडंस वाचायला मिळालं होतं.

Everything , everything

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 21/05/2018 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , चित्रपट समीक्षण वगैरे करण्याइतका मी दर्दी नाही.. त्यातही इंग्लिश चित्रपट --ज्यातले सगळे संवाद नेमके कळाले असतीलच असं नाही.. झरकन जाणारे सगळे सब टाईटल्स सुद्धा १००% वाचले गेल्याची शक्यता नाही. झालंच तर पात्रांची नावं पण विसरलोय (इंटरनेटवर पुन्हा शोध घेता येईल पण कट्ट्यावर गप्पा मारताना कशाला पुन्हा तो खटाटोप).. तर समीक्षण नाही पण एका सुंदर चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटतेय.. ते सांगण्याचा हा प्रयत्न मुळात मी इंग्लिश चित्रपट फारसे बघत नाही..

मा. ल. क.-१

लेखक शाली यांनी सोमवार, 21/05/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राम्हण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा भिक्षूकी आणि पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे.

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 21/05/2018 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना : अर्थातच गायछाप बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक ! सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा... हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक ! नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम... उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक ! मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये... मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक ! लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट... हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक ! तन मन रोमांचित, पिसा समान वाटते... हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक ! जय हो बुड्ढे बाबाकी, आम्ही तयाचे बंदे... गजर चिअर्स उंचावुनी, प्राशितो सखी ओल्डमंक !
काव्यरस

आख्यायिका

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 20/05/2018 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला आल्या. ** आख्यायिका सर्रियल भासतात. लाईफलाईक असतात. 'हे खरं आहे' असं वाटता वाटता एकदम भानावर येऊन लक्षात येतं अरे ही तर आख्यायिका आहे. पण आख्यायिका आभासी मात्र नसतात. किंबहुना त्या वास्तवाची जुळी प्रतिमा असतात. वास्तवाचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे, आख्यायिका अमर आहेत. कारण वास्तव अमर आहे, अचल आहे. ** भक्तीमार्गात नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण, किर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे ते भक्तीचे प्रकार. सांगणारे सांगून गेले.