शिवप्रतापाची झुंज ( भाग १)
आषाढाच्या सरी थांबायचे नाव घेत नव्हत्या. तरी अश्या पर्जन्यकाळात कान्होजी जेधे लगबगीने राजगडाच्या पायर्या चढत होते. पाली दरवाज्याने आत येउन त्यांनी तातडीने सदर गाठली आणि आत सांगावा दिला. पहारेकर्याच्या वर्दीनंतर कान्होजी अंग पुसून आत गेले आणि राजांना मुजरा घालून सदरेवर टेकले.
"इतक्या तातडीने येणे केलेत कान्होजी काका ! काही विशेष ?" राजांनी पृच्छा केली.
"वखुतच तसा आलाय राजं. तुम्हास्नी जावळीचा समदा पेच म्हायतीच आहे. जावळीचा ह्यो तिढा सोडवायला ईजापुरास्न अफझुलखान वाईला येउन बसलाय. आपण यशवंतरावास जावळीचा चंद्रराव नामजद केला, ते या ईजापुर दरबाराला खटकलयं.
मिसळपाव
मान्यवर लेखक आपले लेखन कसे करतात? त्यासाठी ते पुर्व तयारी कशी करतात? वेगवेगळे देशविदेशीतील संदर्भ ग्रंथ मिळवून त्यांतील पान व प्रकरण क्रमांकासह त्यांना ते कसे हाताळायला लागतात? अचूकपणे हव्या त्या वेळी त्यांना ते ते संदर्भ कसे आठवणीत राहतात? इंग्रजीतील मोठमोठ्या परिच्छेदांचे मराठीत अनुवाद करताना त्यांना सारखे इंग्रजी ते मराठी शब्दकोशाची मदत लागते का?