Skip to main content

इ-पत्रातून पुढे ढकललेल्या साहित्याबाबत...

लेखक सरपंच यांनी रविवार, 20/01/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, काही मंडळी येथे पुढे ढकललेल्या विरोपांतून वगैरे आलेले साहित्य (विशेष करून काव्य,) इथे प्रकाशित करतात. मिसळपावला या प्रकारच्या साहित्याचे वावडे नाही. परंतु जर इथे प्रकाशित होणारे साहित्य हे सभासदाव्यतिरिक्त इतर कुणाचे असेल तर सदर साहित्य प्रकाशित करणार्‍या सभासदाने मूळ साहित्यिकाचे/लेखकाचे/कवीचे/गझलकाराचे नांव जाहीर करणे अत्यावश्यक आहे. जर हे नांव अज्ञात असेल तर संबंधित लेखनाच्या शेवटी 'मूळ लेखक/कवी अज्ञात!' असा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे.

पिंक स्लिप

लेखक सुनील यांनी रविवार, 20/01/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"हा, सरे...सरे...हां हां सरे.....", असे म्हणून बालाने फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिले. मागे त्याचा सहकारी देशपांडे उभा होता. सकाळचे अकरा वाजले होते. ही त्यांची नेहेमीची चहा पिण्याची वेळ. बाला उठला आणि दोघेही कँटीनच्या दिशेने जाऊ लागले. "घरचा फोन काय?", देशपांडेने चहा पिता पिता विचारले. "हो. काल फोटो दाखवला होता ना तुला? तिच्याबद्दलच!

गद्य्-काव्य

लेखक वेडा यांनी रविवार, 20/01/2008 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

शाकंभरी पौर्णिमा = मंगळवार २२ जानेवारी २००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 20/01/2008 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या.

श्वासालाही उघाणं आलं.

लेखक raje1981 यांनी रविवार, 20/01/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेताना चुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेताना तिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांत जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना. आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरताना थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता आज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना. मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.
Taxonomy upgrade extras

प्रिय प्राजुस....

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 20/01/2008 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय प्राजुस, काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण, आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले. पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो. कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी.. तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत..... तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे.. कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे...

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 19/01/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.
Taxonomy upgrade extras

प्रेम

लेखक raje1981 यांनी शनिवार, 19/01/2008 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...

चारोळी

लेखक raje1981 यांनी शनिवार, 19/01/2008 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
खरच तुझ्या आठवनिंना दुसरी कुठलीच तोड नाही ...... तुझ्या आठवण झऱ्यां इतकी तर साखरही गोड नाही !!!