Skip to main content

सबसे प्रेम करो...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 07/01/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
`हात मत लगाना'... पुढच्या बाकावरचा तो माणूस अचानक किंचाळल्यासारखा ओरडला. काहीसं ओशाळत शेजारच्या माणसानं त्याच्याकडे बघितलं. `अरे भैया, मै तो सिर्फ आपको तिकिट लेनेको बोल रहा हू'... तो समजावणीच्या सुरात म्हणाला, आणि शेजारच्या त्या संतापलेल्या माणसानं आणखीनच रागानं त्याच्याकडे बघितलं. `मै आगे यहीपें उतर रहा हूं'’... तो गुर्मीत म्हणाला. `फिर भी टिकट ले लो, और जहां चाहिये घूम लो'...

धर्मावर टिका करायला उच्च न्यायालयाची परवानगी...

लेखक विकास यांनी गुरुवार, 07/01/2010 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम्स ऑफ इंडीयातील या बातमी प्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने धर्मावर टिका करण्यात काहीच गैर नाही मात्र याचा अर्थ द्वेष पसरवायला परवानगी आहे असा नाही अशा अर्थाचा निर्णय दिला आहे. आर. व्हि. भसीन नामक एका वकीलाने लिहीलेल्या इस्लामवरील पुस्तकात चुकीची विधाने केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यावर (तीन-चार वर्षांनी) बंदी घातली. त्याविरुद्धच्या सुनावणीच्या वेळेस हे सांगितले गेले.

मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी..

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 07/01/2010 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी cpmumbai09@gmail.com या पत्यावर तुम्ही इ-मेल करू शकता असं श्री. शिवानंदन यांनी कळवलं आहे. पोलिसांसंबंधी इतर माहितीसाठी www.mumbaipolice.org या संस्थळाचा उपयोग करावा असंही ते सुचवतात.

पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला..आज श्रीनगरमध्ये

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 06/01/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एका मध्यवर्ती हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ला केला आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. शंभरावर लोकांना हॉटेलातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चकमक अजूनही चालू आहे. जम्मू-काश्मीर सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं सांगितलं होतं. त्याला अतिरेक्यांचं हे उत्तर आहे.

आठवण

लेखक प्रभो यांनी बुधवार, 06/01/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेचा विषय आमची 'ती'.......दुसर्‍या विषयावर कविता जमत नाहीत :) जाता दुरदेशी वाटलं होतं विसरेन तूला पण नुसत्या विचारानेच त्रासले मला नाही विसरू शकलो मी येते का कधी आठवण गं माझी? शेवटचे पाहिले तुला त्या दिवशी सोडवायला ही आली नाहीस तू वाट बघून वाट धरली मी प्रवासाची अशी का पाठवण केलीस गं माझी? पहिल्याच दिवशी पावसाने स्वागत केलं आठवली आपली पहिल्या पावसातली एकाच छत्रीतली सफर बसस्टॉपवरची पावसाने का पाठ सोडली नाही गं माझी? मनाची समजूत घालत फोन केला तूला आवाज ऐकताच मनातलं एक वादळ शांत झालं आणी दुसर्‍या शिडाला वारा भेटला या वेगालाही का कीव नाही आली गं माझी? आता थोडेच दिवस उरलेत इथे परत य
काव्यरस

भटकंती स्पेशल २०१० कॅलेंडर

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 06/01/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा'कर बंधू आणि भगिनी. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. नववर्षासाठी आम्ही काही तरी भेट म्हणून एक उपक्रम राबवला आहे. एक भटकंती स्पेशल कॅलेंडर. पूर्ण कॅलेंडर इथे देण्याऐवजी पहिल्या वर्षाचे पान इथे दाखवत आहे. बाकी कॅलेंडर माझ्या ब्लॉगवरुन डाऊनलोड साठी उपलब्ध आहे.

नमस्कार...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 06/01/2010 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कसे आहात सगळे..? आज बर्‍याच दिवसांनी मिपावर येतो आहे.. तूर्तास माझ्या आयुष्यात पुष्कळ काळी घटना घडत आहेत, घडल्या आहेत.. लाईफची एक बाजू खूप जवळून पाहायला मिळत आहे.. सगळी स्वप्न नसतात, वास्तवही असतं आणि ते खूप कटू असतं याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहे.. आणि कटू वास्तव भोगयला आपली चूक असावीच लागते असं नाही याचाही पुन्हा एकदा पुरेपूर अनुभव घेत आहे.. परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.. तूर्तास सगळी कामं बाजूला सोडून दोन दिवस फक्त मिपावर रहायचं म्हणतो आहे.. बाकी चालू द्या..

ती -२

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 06/01/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता ती आणि रंग्याची (ती) वाचुन आम्हाला आमची झालेली फजि'ती' आठवली ती समीप माझ्या येते, खुणवुन जाते ती चक्क, गुलाबी रुमाल टाकुन जाते ती शिकवुन जाते अर्थ नवे नजरांना जागवते हृदयी भलत्या अन स्वप्नांना मग स्वारी अमुची तिच्या मागुन जाते ती गालांवर ओठांनी काढत रेषा तनमनी जागवी अशी अनामिक भाषा अन स्वारी अमुची पुरी मोहरुन जाते या गालांवरती पडले काहीबाही ते मणा सारखे मला भासते काही ती खडबडून मज जागे करुन जाते ती कुणी,कल्पना वा ना कविता माझी ती कजाग, फुगरी असे बायको मा