माझे एक सीनिअर आणि एक उत्तम कवी असलेले पण माझ्यासारख्या नवख्या कवीला मित्र मानणारे श्री.महेश घाणेकर यांनी मला तू "मुक्तछंदात पण लिही , उगीचच यमकात स्वतःला जखडून घेऊ नकोस !" असे स्पष्टपणे सांगितले.ते सांगणे आज जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यात उतरले असावे अशी दाट शंका मनात आहे.....बघा , जमलय का ते !
म्हणून.....
ए , तुझ्या जाड वेणीवर मस्त गजरा माळू ?
नाही, मला काही हौस नाहिये ,
ती वेणी एकटीच उदास वाटत्येय ना, म्हणून !
रात्रभर मोगर्यातली ती वेणी सोडू?
मोकळे करू का लांबसडक काळेभोर केस तुझे?
नाही , न पिता नशा चढावी ना , म्हणून !
श्रावणसरीत अबोली साडीत भिजलेली तू ,
थरथरत्या तनूला कवेत घेऊ का?
न