आयुष्याचा 'अर्धा' प्याला..
आयुष्याचा प्याला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा? हे मानण्या न मानण्यावर असतं.
माझ्या दोन मैत्रिणींची लग्ने एकाच दिवशी एकाच मांडवात झाली. दोघींनाही प्रत्येकी पंधरा हजार प्रतिमाह कमावणारे नवरे लाभले होते. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर संसाराची गणिते चुकू लागली, प्रपंचाची गाडी आर्थिक रूळावरून वेळोवेळी घसरू लागली. महागाईच्या वणवा झोडपायला नवऱ्याचा पगार अपुरा पडू लागल्यावर दोघीँनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला...
येथवर सर्व काही ठीक चाललं होतं, अगदी समसमान होतं. परंतु एकीचा पगार जास्तीत जास्त पाच हजारापर्यँतच पोचणारा, तर दुसरीला पंधरा हजारांची नोकरी. शिवाय पदोन्नतीची शक्यता.
मिसळपाव