मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल ?

Manoj Katwe · · काथ्याकूट
http://www.esakal.com/esakal/20100517/5121804310460583483.htm http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5942667.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5942654.cms (हि यादी वाढतच जाणार आहे. ) एकीकडून अतिरेकी, दुसरीकडून नक्षली, तिसरी कडून भ्रष्ट राजकारणी, आणि कमीत भरती म्हणजे जातीयवाद , विविध प्रांतिक वाद , गरिबी, विषमता. आता कुठे ६० वर्ष होत आली आहे स्वातंत्र्य मिळून तर एवढ्या बाजूने भारत वेढला गेला आहे. मला देशाबद्दल नितांत प्रेम आहे पण हे कुठ पर्यंत मी सहन करू, मी स्वतः काय करू सुद्धा शकत नाही, जर माझ्या हातात असते तर मी ह्या सर्व राजकारण्यांचा एका क्षणात खात्मा केला असता. हे हिंदू, मुस्लीम, मराठी, बिहारी etc असलं काही चालू दिले नसते, केवळ आणि केवळ भारतीय हीच ओळख करण्यास सर्वांना भाग पडले असते. पण मी एक सामान्य माणूस, ५ वर्षांनी एकदा मत देणार आणि पुढील ५ वर्ष सगळा खेळ बघणार. आपण किती दिवस हे खेळ पाहणार आहोत ?. मला हा खेळ पाहवत नाही. अरे घुसवा न मिलिटरी आणि उडवून टाका ना ते नक्षली, आणि ते अतिरेकी. फार फार तर काय होईल थोडे फार नुकसान च होईल ना ? पण हे रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लागून जाईल. मला बोलवा हवा तर त्या मिलिटरी मध्ये. ह्या लढ्यात जरी मी मेलो तर निदान माझी मुलांना तरी कमीत कमी ह्या नक्षली आणि अतिरेक्यांचा त्रास नसेल (?). एका सामान्य माणसाला आपला काय सल्ला असेल. त्याने भारत सोडून जावा काय ? काय इथेच राहून सडावे ? (सिनेमा मधील "नायक" हि सिनेमातच शोभून दिसतो) प्रत्यक्षात जर कोणी असं काय करायला गेला तर त्याचा मुडदा पडल्याशिवाय हे राजकारणी (गुंड) लोक राहणार नाहीत हेच सत्य. राजकारणी लोक जी प्रगतीची गणिते मांडत आहे ती सगळी थोतांडे आहेत. भारत प्रगती करीत नसून अधोगती करत आहे. लवकरच भारत एक मागासलेला , भ्रष्ट , आणि स्वतावर राज्य करण्याची लायकी नसलेला देश म्हणून पुढे येईल. आपणांस काय वाटते कि किती दिवस आपली लोकशाही ह्या पुढे तग धरू शकेल ? माझ्या मते जास्तीत जास्त २०२५ पर्यंतच आपण तग धरून राहू शकू. तो पर्यंत हा भारत देश, (अतिरेकी आणि नक्षली ह्यांचातून वाचला तर) ह्या राजकारण्यांनी विकून खाल्ला असेल .

वाचन 12468 प्रतिक्रिया 63