Skip to main content

पुढचं पाऊल (१९५०) – पण नंतर काय?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 18/04/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
नंदा खरे यांचा मानसपुत्र 'अंताजी'विषयीच्या या धाग्यावर नुकतीच झालेली चर्चा ताजी असतानाच योगायोगानं १९५० सालचा ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट अंशत: पाहण्यात आला आणि पुन्हा एकदा त्या चर्चेची आठवण झाली. चित्रपटाचं ढोबळ कथासूत्र इथे वाचता येईल. त्यात मांडलेला विचार आणि तो मांडण्याची पद्धत रोचक वाटते. प्रमुख पात्र असणारा गावातला किसना महार सालस, गुणी, कष्टाळू पण भडक माथ्याचा असतो.

प्रगतीच्या दाराआड

लेखक रमताराम यांनी सोमवार, 18/04/2011 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज NDTV वर हादरवून टाकणारा हा रिपोर्ट पाहिला. दिल्लीच्या इंडिया गेट पासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीच्या - खरे तर शहराच्या - दारूण अवस्थेकडे पाहून हादरून गेलो. तब्बल १० लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची अवस्था काय आहे हे स्वतःच पहा.

श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 18/04/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥ बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।

कळत नाही...

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 18/04/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस कधीतरी होत कि आयुष्याच्या वळणावर कोणीतरी आपल्या बरोबर चालू लागत, आपल्या चालीशी चाल जुळवू पाहत, त्या साठी तो खूप तडजोडहि करतो, छान दिवस जाऊ लागतात, त्या माणसाची सवय होऊ लागते.. आणि... आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो. आपल्याला काळतच नाही कि काय झाल, मान्य असत कि आपण त्याच्या चालीने चालू शकलो नाही, शक्यही नव्हत, पण... अलगद डोळ्यात पाणी येंत, कोणास ठाऊक कशामुळे, आता त्रास होत असतो, त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....

कठीण आहे कधी कधी

लेखक निनाव यांनी सोमवार, 18/04/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना आठवत नाहीत शब्द तु समोर असतांना नेहमीच पडतात अपुरे मग तुला लिहितांना लाजुन जे झुकतात नजरांचे प्रणय होतांना शब्दात करू कसे परिमित अश्या तुझ्या डोळ्यांना हरवतो मी तुझ्या ह्रदयाचे स्पंदन तीव्र ऐकतांना सांग आता लावू कसे शब्द ह्या चालीस बसतांना बांधु कसे शंब्दात अल्हड केश तुझे ते उडतांना जीवच जाईल माझा तसा प्रयत्न देखील करतांना कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना

महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 17/04/2011 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार.... सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...

समुद्र भरल्या डोळ्यांनी

लेखक तीन फुल्या तीन बदाम यांनी रविवार, 17/04/2011 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द पण बोलके क्षण, हसरे अन लाजरे क्षण, गालाच्या खळी आडून वेडावणारे तर ओठांनी खुणावणारे क्षण. वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण. क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे शोधतोय मी... समुद्र भरल्या डोळ्यांनी....