Skip to main content

घेऊ कसा उखाणा (तिकडम)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडम सगळे जण आग्रह करतात लवकर नाव घ्याना तोंडात लाडुचा बकाणा घेऊ कसा उखाणा? . , . . शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी दात वाजती टणाणा मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा घेऊ कसा उखाणा? . . . . पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा तिसरा सपशेल उताणा चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा घेऊ कसा उखाणा? ..........................................................
काव्यरस

विक्रम आणि वेताळः अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समभाव

लेखक नगरीनिरंजन यांनी सोमवार, 13/06/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 13/06/2011 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषोत्त्म लक्ष्मण देशपांडे नावचा पुरुषोत्तम लेखक १२ जुन २००० रोजी वरती स्वर्गात देवाला हसवण्यासाठी आपल्यातुन कायमचा निघुन गेला. जातीयवाद, ध्रर्म यांच्या चर्चांमध्ये या महान लेखक, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, गायकाला मानवंदना द्यायचे राहुन जाउ नये यासाठी हा वेगळा धागा. २० हून आधिक पुस्तके, १५ पेक्षा अधिक नाटके, काही अविस्वरणीय व्यक्तिरेखा आणि २५ एक चित्रपटांना अजरामर बनविणार्‍या या महान व्यक्तिमत्वाला माझा सलाम.

एक शोकांतिका

लेखक शरद यांनी सोमवार, 13/06/2011 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्षांपूर्वी दिवे आगरला गेलो होतो. सोन्याच्या गणपतीची मूर्ती सापडून त्याचे देऊळही बांधून झाले होते.ही काही पूजेतील मूर्ती नक्कीच नव्हती; पण धंदा जोरात चालला होता. दुर्वा, फुले, नारळ यांना चढ्या भावातही चांगले गिर्‍हाईक मिळत होते. पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र नव्हे, म्हणून दिवे आगरचे भविष्य सगळ्यांना, विशेषत: स्थानीकांना लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातले चढे भाव लोकांना खुणावत होते. पुण्यात ६ रुपयांना मिळणारा मोदक तेथे आठ रुपयांना मिळत होता. समुद्र किनारा, वाड्या इतरत्र कोकणांत असतात तश्याच होत्या पण त्यांचे गुणवर्णन केले जात होते.

भीती

लेखक धोणी यांनी सोमवार, 13/06/2011 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, आपण आयुष्यात कधी न कधी भितो, आपल्याला कोनची न कोनची भीती वाटते , इथे कसे काही नवीन आयडी जुन्या तगड्या, आयडींना घाबरतात असो तर.. तुम्हाला कोणाची भीती वाटते , मांडा इथे.. आपण जरा चर्चा करून यावर .. आणि हा धागा एकोळी नाही.. याची कृपया नोंद घ्यावी

शाळाचे शुल्क ..

लेखक शाहिर यांनी सोमवार, 13/06/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या काळात (१२-१५) वर्षापूर्वी बालवाडी- प्राथमिक शाळाचे शुल्क २००-३०० रुपये प्रती वर्ष असायचे ...आता पुन्या मधे ते ३००००-६०००० आहे ..(बाणेर परिसरा मधे व सिन्हगड रस्ता ).. एवढे शुल्क पाहता काहि प्रश्न पडतात.. १. या शाळा मधे असे काय शिकवतात? २. महागडे म्हाणजे चान्गले का?? ३.बालवाडी पुर्व गटा चे शुल्क देखील २०,००० आहे.. एवढे देण्यचा पाल्यास काहि फाय्दा होतो का? ४. हे शुल्क वाजवी आहे कि लूट ??

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/06/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला. स.न.वि.वि दि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत "प्रकल्प आधारित शेती" या विषयावर मार्गदर्शन करताना "शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्‍यांची प्रवृत्तीच झाली आहे" अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे. डॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे.

पर्सनल अकाऊंट

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 13/06/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
खरच...?मी आहे स्वतंत्र?... की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥ आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या... आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच... प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा। आत राहायचे,निवारा हवा म्हणुन... आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही... पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?। कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी... पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?... काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा। आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे... आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे... खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा। पराग दिवेकर...
काव्यरस

जय जय लंबोदरा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/06/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय लंबोदरा
जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| विनंती आमची तुझीया ठायी करीतो आर्जव नमीतो पायी सकल कार्य नेई सिद्धीस आशिर्वाद देण्या त्वरा करा ||१|| रूप अन गुण तुझे कितीक वर्णू मुढ बालके आम्ही, तू कृपासिंधू फळ द्यावया कष्टास आमच्या करीतो आम्ही तुझा पुकारा ||२|| जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०६/२०११
काव्यरस