Skip to main content

दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २

लेखक अजया यांनी रविवार, 13/12/2015 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ मागच्या भागात आपण प्रेग्नंसीमध्ये आणि बाळाच्या दातांची काळजी कशी घ्यावी ते पाहिले.या भागात आपण ३ ते १२ वयोगटातील मुलांच्या दातांबद्दल जाणून घेऊ. . साधारण सहाव्या महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते ते तीन वर्षापर्यंत प्रत्येक जबड्यात दुधाचे दहा दात येतात.यात समोरचे पटाशीचे दात,सुळे आणि दाढा असतात.हे सर्व दात निरनिराळ्या वयात पडतात.तरीही लोकांचा दुधाचे दात पडणारच आहेत तर का त्यांच्या किडण्याकडे

मदहोश (शायरी)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी शनिवार, 12/12/2015 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे मी जरी आहे द
काव्यरस

कुळीथः विविध पाककृती

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 12/12/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे. मेद कमी होण्यासाठी आहारात कुळथाचा समावेश करतात. आमच्याकडे मुलगी झाली की कुळथाच्या घुगय्रा करण्याची पध्दत आहे, आणि मुलगा झाल्यावर या कुळथात शेंगदाणे घालतात.

या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/12/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला बाबा आमटेंच्या 'आनंदवनात', अभय बंगाच्या 'मेळघाटात', कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात', पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत, जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे, दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये, वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे, अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात, चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे, 'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे, 'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे, साहेबाच्या देशातल्य

देवाचं अज्ञान, कुतुहल आणि विज्ञान

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शनिवार, 12/12/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून देव आणि वि़ज्ञान ह्यावर दंगा करून पॉपकॉर्न उधळायला मिळतील असा गोड गैरसमज करून घेवू नये. कारण हा लेख एका पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आहे. ह्या पुस्तकाचं नाव आहे "God's Debris". आणि लेखक आहेत "Dilbert" चे निर्माते Scott Adams. ह्या पुस्तकाविषयी सविस्तर लिहले तर वाचण्यातील मज्जा निघून जाईल कारण हा एक विचार प्रयोग आहे. पुस्तकाची रचना दोन व्यक्तींमधील संवाद आणि तेही प्रश्न-उत्तर स्वरूपात आहे. एक व्यक्ती आहे ज्ञानी तर दुसरी आपल्यासारखी गोंधळलेली. पुस्तकात देव किती ज्ञानी असनं हे देवासाठी फायद्याचं आहे ह्या विषयावर थोडं चिंतन करण्यात आलं आहे.

एक आटपाट नगर होतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 12/12/2015 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी व्हिडियो गेम्स नव्हते.त्यामुळे आमचे खेळ मैदानातच व्हायचे.रात्री जेवल्यानंतर दमल्यामुळे झोपेची पेंग यायला सुरवात व्हायची.बरेच वेळा झोपताना आम्ही आजोबांना गोष्ट सांगायला सांगायचो. बर्‍याच गोष्टी आम्हाला त्यांनी सांगीतल्या आहेत.त्यातली "एक आटपाट नगर होतं " ही त्यांची पेट गोष्ट आम्हाला फार आवडायची. आजोबा म्हणायचे, "एक आटपाट नगर होतं.तिथे राजा-राणी राज्य करायची.त्यांचा एक प्रधान होता.तो पण राजा-राणीच्या सत्त्तेत सामिल असणार हे उघड होतं.परंतु, राजाच्या बाजूने असलेली जनता आणि प्रधानाच्या बाजूने असलेली जनता यामधे चूरस असायची.असं असूनही वरकरणी राजा-प्रधानाची युतीची सत्ता होती असं भासवलं जायच

चमत्कारी बाबा (कथा)

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 12/12/2015 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रि पोहचायला उशीर झाला म्हणुन सकाळी थोड़े जास्त झोपावे म्हटले तर मिल्याची काहीतरी शोधा शोध सुरु झाली. त्याने टीव्ही चा टेबल खर्रकण सरकावाला आणि मी उठुन बसलो. "काय शोधतोय रे, मिल्या?" "काय नाय, तु झोप" त्याची सरका सरकी चालूच. मी भिंतीला टेकुन त्याच्याकड़े पाहत बसलो. कॉट खाली, टेबलाखाली, टीव्ही मागे, बॅग मधे पाहुन झाल्यावर त्याला काहीतरी आठवल्या सारखे झाले. त्यानं रॅक मधल्या पुस्तकांच्या सांदित हात घातला आणि एक वाळलेले लिम्बु बाहेर काढले. ते दोन वेळा कपाळाला लाऊन उजव्या खिशात ठेवले. "हे शोधित होतो.

एक स्कॉर्पियो आणि सहा जण...

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 11/12/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या २४ तासातल्या ९०० किमीच्या गुजरात मोहिमेबद्दल थोडक्यात. १. काल सहा वाजता विचारणा झाली. कुठे जायचे सांगितले नाही. सांगितलेले ठिकाण अजिबात ओळखीचे, स्मरणातले नाही. २. दहा हजार भरले की कुणीतरी बँक अधिकारी मुद्रालोन अंतर्गत दहा लाखाचे कर्ज मंजूर करून देतो. अशा अधिकार्‍याला सुरतमध्ये भेटायला जायचे आहे. दहा हजार द्यायची तयारी असेल तर चला. ३. प्रवास सुरु केल्यावर कळले की कुठल्या तरी मंदिरात दर्शनाला जायचे आहे. ४. रात्रभर गुजरात मॉडेलच्या नावाने बोटे मोडत, पाय मोडत अ‍ॅक्स्लिटर-ब्रेक-क्लचवर डान्स केला. ५.

विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 11/12/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर http://www.misalpav.com/node/34037 माझ्या लहानपणी घरी येणारे एक काका गंमत करण्यासाठी म्हणून 'कोंबडी आधी की अंडे आधी?' असा प्रश्न विचारायचे, आणि मी गोंधळात पडलो की कशी मजा आली म्हणून हसायचे.

कडेमनी कंपाऊंड

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.