Skip to main content

राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 02/04/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

भालचंद्र नेमाडे यांच्याशी एक अविस्मरणीय भेट.

लेखक अमृता_जोशी यांनी शनिवार, 02/04/2016 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीला असताना कोसला पहिल्यांदा वाचली, आणी त्या कथेच्या नायकाचा आणि त्याचा विचारांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. नौकरी मिळाल्यानंतर एक एक करून त्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण केले आणि मी भालचंद्र नेमाडेंची फ्यान झाले. माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक, म्हणजे एकदा नेमाडेंना भेटणे आणि त्यांच्या पुस्तकांविशयी माझ्या मनातले सर्व प्रश्न त्यांना विचारणे हे होते.

ओळखले का?

लेखक राजू यांनी शनिवार, 02/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"ए शुक शुक" "ए अरे थांब" अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते. म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो. आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते. तर "ए" अशा एकेरी नावाने आ

गरिबाला विचार

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शुक्रवार, 01/04/2016 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ? दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ? नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ? - अभिषेक पांचाळ
काव्यरस

भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/04/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी - डॉ. सुधीर रा. देवरे भारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल? भारताच्या शेतकर्‍याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय? दुष्काळात शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो? पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो? गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो? आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे? इतका दैवाधिन का आहे? इतका पारंपरिक का आहे? इतका कर्जबाजारी का आहे? त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही? असे असंख्य प्रश्न शेतकर्‍यांच्या बाबतीत विचार करताना उद्‍भवू लागतात. खरं तर भारतातील सर्व शेतकर्‍यांपुढील समस्या सारख्याच नाहीत.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.

काळ असा.......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!