चिरंतन भेट
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे ।
नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।।
तिचे मौनही पल्याड देशी दरवळते ।
अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।।
दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते ।
ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।।
कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे ।
क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।।
तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा ।
तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।।
चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची
अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।।
-चैतन्य
काव्यरस
मिसळपाव
लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा तसा घडत जातो. मुलांच्या वाढत्या वयात पालक तसंच शिक्षक या दोघांचा ही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. वाचन, श्रवण, निरिक्षण व लेखन अशा विविध माध्यमातून मुलं सतत शिकत असतात. यापै़की 'वाचन' मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा. विविध विषयातील वाचन फक्त आनंदच देत नाही तर त्यामुळे स्वविकासही साधता येतो.