Skip to main content

बलुचिस्तानची तोंडओळख

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 18/07/2016 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
बलुचिस्तानची तोंडओळख लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com) हा लेख ई-सकाळच्या पैलतीर या सदरात १७ मे २०१६ रोजी प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे http://www.esakal.com/Tiny.aspx?K=C6EBSx ‘बलुचिस्तानमध्ये भारताला इतके स्वारस्य का असावे‘ या प्रश्‍नाचे उत्तर ज्यांना पाकिस्तानचा इतिहास व भूगोल माहीत आहे, त्यांना सहज देता येईल. पण ज्यांना या इतिहासाची व भूगोलाची माहिती नाही त्यांना ‘असं काय वेगळं आहे बलुचिस्तानमध्ये?‘ असे वाटेल.

भर पावसातला चांभारगड, शेवते घाट आणी उपांड्या घाट

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी सोमवार, 18/07/2016 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
चांभारगड - शेवत्या घाट - उपांड्या घाट दोन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. शेवटचा ट्रेक करूनही ६ महीने लोटले होते. मनाला आणी शरीलाला जणू घाण्याच्या बैलाप्रमाणे एकाच चक्रात फिरायची सवय झाली होती. ह्या चक्रातून बाहेर पडून नेहेमी सह्याद्रीकडे जायची ती सवयही सुटल्या गत झाली होती. काहीतरी करणे गरजेचे होते. सप्टेंबर उजाडला आणी अश्यातच ट्रेकींग कायप्पा ग्रूपवर कुणी तरी विचारले की जायचे का कुठेतरी? पावसाळा पुर्ण जोमात होताच, मनाने उचल खाल्ली की बास झाले शहरी घाण्यातले रगडणे आता बुस्टर म्हणून कुठेतरी जायलाच हवे होते. पण कुठे?

आतां आमोद सुनांस जाले

लेखक Anand More यांनी सोमवार, 18/07/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

<भग्न शरीरे>

लेखक अनुप ढेरे यांनी रविवार, 17/07/2016 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस श्रवंती शेखरला भेटायचा प्रयत्न करत होती. दर तासाला फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या शेखरला असं अचानक काय झालं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेला. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून श्रवंती ऑफिसमधून बाहेर पडली. काकांनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलिए की काय म्हणून त्यांनी "कसली औषधं विकायला आलायत?" असं विचारलं. "काका, एक मिनिट.

अर्नळगुंडू

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 17/07/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
"इधर ना रातको शैतान लोग आते है" रेलींगजवळ उभारलेली बाई म्हणाली. "अच्छा, तो?" फुटपाथवर खुर्च्यांची माळ पसरली होती. नावालाच छप्पर असलेल्या बसस्टॉपवर मी बसलो होतो. सोबतीला होता अंधार. अन अचानक पुढे आलेली ती बाई. "नै, तुम अच्छा आदमी लगता है, इधर क्या कर रा है?" डोक्यावर पडलीय काय ही? मग मीच तिला उलटं विचारलं, "तू क्या कर रही है इधर?" "अरे मेरा तो रोजका है, इधरीच होती है ना मै" "तो मै क्या करू? पागल तो नै हो?" "नै" हसली का ती? "तो फिर भाड मे जाव" मी सिगारेट काढली. ती बाई जरा वेळ उभारली आणि बाजूलाच बसली कोपऱ्यात खाली. नसती कटकट तिच्यायला. शहराच्या बदनाम गल्लीत हा बसस्टॉप पडतो, त्याला इलाज नाही.

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 17/07/2016 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥

माझा मिपाविश्व प्रवेश

लेखक संत घोडेकर यांनी रविवार, 17/07/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले.

रांजण खळगी

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 17/07/2016 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला. शेकडो वर्षे कुकडी नदीच्या पाण्यातून येणारे दगड गोटे ह्या नदीपात्रातील बसाल्ट खडकावरून 'वर्तुळाकार पद्धतीने' फिरल्याने ही सर्व खळगी तयार झाली असावीत असा भूगर्भ शास्त्रन्यांचा कयास आहे. ही क्रिया सतत चालूच असल्याने खळग्यान्चा आकार वाढतच चालला आहे.

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 16/07/2016 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥