Skip to main content

राजांचे मावळे - 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 27/10/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला घोडखिंड : मल्हारी मल्हारी सगळ्यांच्या पुढे होता कारण त्याला हा रस्ता तळहाताच्या फोडाप्रमाणे माहीत झाला होता. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेला गुढघाभर चिखल. आता ते सगळे एका छोट्या पठारावर पोचले होते. थोडाच वेळ का होईना पण ते सगळे उघड्यावर आले होते. न सांगताच मावळे राजांच्या आजूबाजूला पसरले. मल्हारी अजून पुढेच होता आणि त्याच्या मागेच राजे पळत होते. राजांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 2 2 मावळे होते आणि मागे बाजी. पालखीवाले सगळ्यात मागे पडले होते ते आता हळू हळू अंतर कमी करत होते.

पावसात "रतनगड ते हरिश्चंद्रगड"

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 27/10/2017 01:28 या दिवशी प्रकाशित केले.

पावसात "किल्ले रतनगड ते हरिश्चंद्रगड"

सुरूवात...

सप्टेंबर-ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपल्या नंतरच्या ट्रेकींगच्या मोसमाची सुरुवात होण्याचा काळ. १० सप्टेंबरला नाखिंदा घाट, कोथळीगड आणि कौल्याच्या धारेचा पावसाळी ट्रेक संपवून घरी परतताना बसमध्ये जाहीर केलं की "०७-०८ ऑक्टोबरला 'आजोबा ऊर्फ आजा पर्वत' पाथरा आणि गुयरीदार अशा दोन घाटांसह करायचा आहे" त्यावेळी बसमधल्या प्रत्येकाने या ट्रेकला येण्याची तयारी दाखवली. पण हा ट्रेक अवघड प्रकारातला असल्यानं सर्वांना नेणं काही शक्य नव्हतं.

अनवट किल्ले २१: नरसिंह, बलभीमाचा सहवास, मच्छिंद्रगड( Macchindragad )

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 26/10/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर, नरसिंहाचे प्राचीन भुयारी देवस्थानाच्या आणि कॄष्णेच्या एन पात्रातील बेटाची सोबत असलेला एक अतिशय सोपा पण रम्य परिसर लाभलेला किल्ला म्हणजे मच्छिंद्रगड. आज याचीच भटकंती करायची आहे. या किल्ल्याबरोबरच परिसरातील सागरेश्वर अभयारण्य, नव्याने विकसीत केलेले पर्यटनस्थळ चौरंगीनाथ हेही पहाता येतील.

मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 25/10/2017 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे. उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो.

तो.. एक शुद्ध-घन-घट्ट गोळा !!

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/10/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
"श्रीयुत जोशी श्रेष्ठी आहेत का निवासात?", जरा पुरुषी पण नाजूक आवाजात त्याने विचारले. "कोण?", मी विचारले. "मी सुरेश, तसा आपला परिचय नाही. मी श्रीयुत जोशी श्रेष्ठींसोबत एकाच कार्यालयात कार्य करतो." "अच्छा..या ना आतमध्ये." "श्रीयुत जोशी श्रेष्ठी नाहीयेत का निवासात?" "नाही..जोशी साहेब बाहेर गेले आहेत", स्वयंपाकघरातून बाहेर येत माझी काकू म्हणाली. "रात्रप्रहरी शतपावली करण्यास निर्गमन केले का त्यांनी?" "नाही हो..जरा कामासाठी बाहेर गेले. तुमचं काही काम होतं का?" "हो ना..हरकत नाही..तसं कार्यालयीनच होतं.

!अनंत मी !

लेखक sayali यांनी बुधवार, 25/10/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती! त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्‍या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची. म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते ! आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो! शुभम भवतु !

!माझी छबी!

लेखक sayali यांनी बुधवार, 25/10/2017 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात. माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ? जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात !

जरी अज्ञात देशाचा

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 25/10/2017 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
जरी अज्ञात देशाचा किनारा गाठला होता तरी वारा शिडामधला जरा खंतावला होता दूरवरचे दिवे तिथले झळाळून पेटले होते तरी अंधार हटवादी जरा रेंगाळला होता वितळत्या चंद्रबिंबाने दशदिशा भारल्या होत्या तरी त्या चांदरातीचा कवडसा गोठला होता
काव्यरस

आज पांडव पंचमीच्या निमित्ताने केलेली कविता ...

लेखक वैभवदातार यांनी बुधवार, 25/10/2017 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज पांडव पंचमीच्या निमित्ताने केलेली कविता ... श्रीकृष्णा रे कसा मी सोडू बाण कंठाशी आले मम प्राण || धृ.|| शंख पांचजन्य हा घुमतो आज ह्या रणी त्याचा निनाद घुमतो कानी मम शरीरासी कंप सुटे हा भारी गांडीव धनुष्य न धरी करी चाल माझ्या समोरी आप्तेष्ट हे जमले भीष्म पितामह दुर्योधन सगळे माझ्या विरुद्ध काही बाही वदले कसा वार करू युद्धविन्मुख माझे मन पाहुनिया मम आप्तस्वजन ||१|| द्रोणाचार्यांच्या गृही कौरवांसवे मी खेळलो धनुर्विद्येमध्ये पारंगत झालो द्युत खेळताना राज्य आम्ही हे हरलो वनवासा जाते झालो चाल राज्य न मिळे मागुनिया आता कौरव उभे ठाकले युद्धाकरिता मम चित्तासी न मिळे स्थिरता स्वजन

फास्टर फेणे च्या निमित्ताने

लेखक ओरायन यांनी बुधवार, 25/10/2017 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते. सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची. भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.