Skip to main content

(बार हो)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 22/03/2018 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : यारहो ... दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है .... ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो माँक कुठला? कोण मल्ल्या?

पश्चिम खांदेशातील गिरीदुर्ग

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी बुधवार, 21/03/2018 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
         प. खांदेशातील गिरीदुर्ग १. आमच्या ट्रेकमधील एक विलोभनीय सूर्यास्त डिसेंबर महिना म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! नाताळच्या सुट्टीला जोडून नवीन काही किल्ले फिरायचे आणि थंडीचे सोने करायचे असा विचार होताच. प. खांदेश म्हणजेच धुळे; धुळ्याचे प्राचीन नाव रसिका.

COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.

लेखक किरण नाथ यांनी बुधवार, 21/03/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.

दोसतार...२

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 21/03/2018 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://www.misalpav.com/node/42264
आम्ही ओणवे होऊन अंगठे धरले होते तरी ही हसत होतो. हसत हसता धन्या जाधवचा तोल गेला तो पडला. भामरे मास्तर आणखीनच भडकले. ते काही बोलणार इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली. आम्ही सगळे मास्तरना तेथेच सोडून वरच्या ग्राउंडवर पसार झालो. पुढच्या प्रसंगातून आम्हीही सुटलो आणि भामरे मास्तरही सुटले.
पण घडल्या प्रसंगामुळे टंप्या खूपच बिथरला होता. तो म्हणाला की मी आता जे करायचे ते करुनच दाखवतो.

पावनखिंड लढा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 20/03/2018 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या. काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले मिसळपावर बर्‍याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू मिपाकरांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल… काही विचारणा… १. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे? २. विशाळगडाला सध्या काय रंग रूप आहे? तिथे कोणाचे स्मारक उभे आहे? ३.

दोसतार...

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 20/03/2018 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
एल्प्या , टंप्या आणि मी हे त्रिकुट आख्ख्या शाळेत एकदम फेमस होतं. फेमस म्हण्जे काय लैच फेमस. सगळे मास्तर आणि बाया आमाला वळखायच्या. कायबी असू दे , कुटं जायचं असू दे की मग कुठलं काम असू दे आमी कायम बरोबर . बाकावर बसायला एकत्र ,मधली सुट्टी सोबत, छोटी सुट्टी सोबत ,खेळायला सोबत डबा खायला सोबत . इतकंच काय तर दोन तासाच्या मधे कधी आमच्या पैकी कुणाला लघ्वीला जायचे असेल तर लागली नसली तरीबी बाकीचे दोघे सोबतच जायचो. शाळेत येताना जाताना प्रत्येकाच्या घराची वाट वेगळी होती म्हणून बरं नायतर घरी जाताना बी एकत्रच गेलो असतो. खरंतर टंप्या आणि यल्प्या हे अगोदरपासूनच बरोबर.

इंद्रधनुष्य

लेखक चुकार यांनी मंगळवार, 20/03/2018 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
रंगआंधळा इंद्रधनुष्य, शोधतो रंगाऱ्याला. म्हणे माझे रंगव डोळे, रंग येऊ दे जगायला.
काव्यरस

सोबत आणि सोबतीचे परिणाम 

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 20/03/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झाल असावं अस मला वाटत. मग हळूहळू पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं.

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 19/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील. आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो.

प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 19/03/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ती आली होती फक्त एकदाच घरी एक वाटी दूध मागायला मला वाटले तिला दूध आवडते म्हणून गेलो म्हशी पाळायला खरी पंचाईत तेव्हा झाली जेव्हा कळले म्हैस व्यायल्याशिवाय दुध देतच नाही म्हशींसोबत एक रेडा बघितला बाप माझ्यावर जाम भडकला शिव्या देउनी खूप बुकलला व्यक्त केले मग मी पुढचे पत्ते सांगून टाकले त्यांना , भावी सुनेला दूध आवडते इकडे झाला उलट गेम रेड्याने धरला म्हशीवर नेम रेडा असा काही चौखूर धावला प्रेमाचा डाव बघता बघता उधळला बाप माझ्यावर भरपूर पिसाळला सुरु झालं घरी भलतंच महाभारत कसलं दूध अन कसलं प्रेम ? सरळ गेलो माघारी अन म्हशी दिल्या परत सिद्धेश्वर विलास पाटणकर