Skip to main content

चहा-साखरेचे डबे

लेखक कवितानागेश यांनी सोमवार, 02/07/2018 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
चहा-साखरेचे डबे .... प्रत्येक घरात असतात. त्यांनी तसंच राहायचं असतं, एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! त्यांची जागाही ठरलेली असते. हाताशी सहज येतील, पटकन दिसतील अशी सोयीची जागा. आणि डबे सुध्दा ठरलेले असतात. जवळजवळ एकसारखे, थोडे लहानमोठे. त्यांनी तसं च राहायचं असतं. एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! त्यांच्या खुणेनी इतरही वस्तू आजूबाजूला येतात आणि जातात. पण या दोघांचा मात्र उल्लेखही एकत्रच होतो. चहासाखरेच्या डब्यांची फळी, असाच पत्ता असतो तिथला. वास्तविक चहा आणि साखरेत काहीही साम्य नाही. पण सोयीसाठी म्हणून, कधीतरी, कुणीतरी त्यांना एकमेकांजवळ मांडलं.

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 02/07/2018 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा. भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक .

चिंब

लेखक कोमल यांनी सोमवार, 02/07/2018 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली. पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते. तिच्या जन्माच्या वेळी वेड्यासारखं बरसून त्यानंही आनंद साजरा केलेला. पहिल्यांदा दप्तर पाठीवर लावून, त्यावरून रेनकोट घालून ती जशी शाळेला जायला निघाली तसा तोही आलाच. पहिल्या दिवशी खिदळत शाळेत पोहोचणारी ती एकटीच. आणि मग तर तिला सवयच लागली, पाऊस आला की दप्तराला रेनकोट घालायचा आणि आपण चिंब भिजत घरी यायचं.

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 02/07/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच. आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते.

मला भेटलेले रुग्ण - १७

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 02/07/2018 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो.

विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 01/07/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही. (ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.) पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 01/07/2018 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

वाहनं आणि प्रवास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/07/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे खेड्यापाडयातला पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांतून होत असे. अगदी लग्नाचे वर्‍हाड सुध्दा या गावातून त्या गावी बैलगाडीने निघायचं. घर ते शेत आणि आजूबाजूच्या चार- पाच मैलांवर असलेल्या खेड्यापाड्यात कामेकाजे जाण्यासाठी पायी चालण्याचा तो काळ होता. याच काळात इकडे कुठे कुठे सायकलीही दिसू लागल्या. त्यावेळी अनेक कर्मचारी रोज वीस- पंचवीस मैलांचा प्रवास आपल्या सायकलींनी करत असत. 30 ते 40 वर्षांपूर्वी या प्रदेशातल्या ग्रामीण भागात क्वचित मोटरसायकली सुध्दा दिसू लागल्या होत्या. जावा आणि राजधूत कंपनीच्या या मोटारसायकलींना ग्रामीण भागात फटफट्या म्हटलं जायचं.

जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!

लेखक निनाद यांनी रविवार, 01/07/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची. आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो. हं लिही, स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत! हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते. मुगाची डाळ एक किलो गुळ अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको.

संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 01/07/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ? या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा पुन्हा टिका करताना दिसतात. काय असतील या संघ विरोधामागची कारणे ? इंग्रजांविरुद्ध मोठ्या लढाईला सुरुवात झाली ती 1857 मधे. त्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले आणि झाशीच्या राणीसारखे संस्थानिक त्यात सहभागी होते. पुढे वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र लढा दिला. सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, तीन चाफेकर बंधू फासावर चढले.