Skip to main content

रायगडाच्या घेर्‍यात

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 07/08/2020 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
६ एप्रिल १६५६ चा दिवस. एन आषाढ वणव्यात एका बलदंड आणि प्राचीन गडाच्या पायथ्याशी फौजा पोहचल्या आणि बघता बघाता त्यांनी गडाला मोर्चे लावले, मोक्याच्या जागा रोखल्या, गडाला वेढा पडला. अर्थात गडाचा फास हा असा आवळल्यानंतर गडावर कैद झालेला सरदार, त्याच्या दोन मुलांसह लगेचच शरण आला. हा जहागीरदार होता चंद्रराव मोरे आणि बरोबर होती त्याची दोन मुले कृष्णाजी व बाजी. अर्थात चंद्रराव हे याचे खरे नाव नव्हते, हि होती पदवी. जावळीच्या दुर्गम प्रदेशावर राज्य करणार्‍या मोरे घराण्याच्या राजपुरुषाला हि उपाधी लावली जात असे.याचे खरे नाव येसाजी मोरे.

अनुष्टुप छंद - सोपा करून सांगायचा प्रयत्न

लेखक धष्टपुष्ट यांनी शुक्रवार, 07/08/2020 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मराठीमध्ये ओवी, हिंदीमध्ये दोहा, तसा संस्कृतमध्ये अनुष्टुप छंद मला खूप लवचिक आणि सार्वत्रिक वाटतो. अनुष्टुप संस्कृतमध्येच नव्हे तर मराठीमध्ये लिहिण्यासाठीही खूप सोयीचा आहे. सगळ्यांच्या ओळखीची भीमरूपी वापरून हा सोपा छंद स्पष्ट करायचा हा प्रयत्न. लघु गुरु यांची तोंडओळख आपल्याला असेलच असं मानून पुढचं लिखाण आहे. परंपरेनुसार अशी त्याची लक्षणे दिल्यामुळे तो विनाकारण अवघड वाटतो- श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्। द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥ ह्याचा आकृतिबंध सोपा करून दिला तर असा दिसेल.

संवाद

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 07/08/2020 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा! काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते.

पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 06/08/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे.

बाधा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 06/08/2020 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
बाधा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना . राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता . हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा .

बुंदीचे लाडू ....

लेखक पियुशा यांनी बुधवार, 05/08/2020 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
बुंदीचे लाडू हा आमचा आवडीचा लहानपणापासूनचा सवंगडी :) सध्या कोरोनामुळे बाहेरच खाण टाळत रक्षाबंधनासाठी घरीच लाडू केले . लहानपणी जवळ जवळ बऱ्याच लग्नात बुंदी किंवा बुंदीचे लाडू सगळ्यांच्याच खाण्यात आले असतीलच, आताशी लग्ना मध्ये वेगवेगळ्या मेनुच्या गर्दीत बुंदी न बुंदीचे लाडू जणू हद्दपारच झालेत असो .

विराणी- गझल

लेखक मी-दिपाली यांनी बुधवार, 05/08/2020 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
गझल एक संवेदनशील काव्यप्रकार ! ज्याची मोहिनी जितकी गझलकाराला असते तितकीच तिचा आस्वाद घेणाऱ्याला असते. जेव्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करायचं ठरलं तेव्हा खुपच जुजबी माहिती होती. म्हणजे गझलेत प्रामुख्याने विरोधाभासी प्रतिकांचा वापर केला जातो. उदा.भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुगंधी जखमा,लाघवी खंजीर यांसारख्या. पण अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी गुगलुन बघितलं तर ब्रह्मांडच हाती आलं. गझल इतकी तंत्रशुद्ध असते याची कल्पनाच नव्हती. गझलेत पाच ते सतरा द्विपदी असतात. त्यातील पहिल्या द्विपदीला मतला असे म्हणतात तर बाकीच्यांना शेर.