Skip to main content

खूप काही हरवलं आहे!

Published on 17/12/2007 - 19:24 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 30181

समुद्रपक्षी

Published on 17/12/2007 - 14:06 प्रकाशित मुखपृष्ठ
Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः आहे मी एक समुद्रपक्षी, माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण, मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त! कार्वर म्हणतो, Start where you are, with what you have make Something of it Never be satisfied! मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात? माझे दोन चिमुकले पंख, पेलतील ना हे शिवधनुष्य! आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी! कारण,जोडीला माझी जिद्द आहे, आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती, माझी मनोदेवता,माझा आतला आवाज! नाह
लेखनविषय:

याद्या 4898
Taxonomy upgrade extras

चारोळी

Published on 17/12/2007 - 10:05 प्रकाशित मुखपृष्ठ
तुझ्या प्रेमासाठी झालो दिवाणा तझ्या नकाराने होइन का शहाणा? -सुशील
लेखनविषय:

याद्या 4316

विजय दिन

Published on 17/12/2007 - 06:05 प्रकाशित मुखपृष्ठ
भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणणार्‍या सर्व सैनिकांना मिसळपावातर्फे मानाचा मुजरा. हे युद्ध ३ डिसेंबर ला सुरु होवून १६ ला संपले. बांग्लादेशातील नागरीकांना व बांगलामुक्ती वाहिनीला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या.

याद्या 8607

एडीपस आणि कूटप्रश्न

Published on 17/12/2007 - 01:37 प्रकाशित मुखपृष्ठ
एडीपस आणि कूटप्रश्न "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, किती रे विकारी असे बंधु माझा..." चिरंजीव ती स्फिंक्स हेरी तयाला. कधी एक माणूस त्या ठायि आला उखाण्यात पाहे जणू आरशाला स्वतःलाच जाणून कोड्यात साचा - स्वतःच्या विकारा, स्वतःच्या गतीला "असू तुल्य सारेच एडीपसाशी विलंबीत काळात त्या श्वापदाशी; भविष्यात होऊ, नि भूतात होतो..." असे ज्ञान झाल्यास गात्रांस गाळू! "न हो हे..." म्हणे देव मोठा कृपाळू विकारक्रमाने स्मृतिभ्रंश देतो.
मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस, मूळ भाषा : स्पॅनिश (एडीपस याबाबत बहुतेक लोकांना हा तपशील म
लेखनविषय:

याद्या 6873
Taxonomy upgrade extras

मला आनंद का झाला?

Published on 16/12/2007 - 11:25 प्रकाशित मुखपृष्ठ
लोकहो, "सुख पाहता जवांपाडे, दु:ख पर्वताएवढे" ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. आपण आनंदच हरवत चाललो आहोत. अनेक लहानसहान आनंदाच्या गोष्टी सभोवताली घडत असतात. पण तो आनंद आपल्याला समजत नाही. तेवढया जाणीवा आपल्याकडे नसतात. त्यासाठी तुम्हाला झालेला आनंद केवळ एका वाक्यात इथे लिहीत जा. इथे सह्या, आपला(.....) ही विशेषणे, मोठे परिच्छेद वगैरे लिहू नयेत. केवळ एका वाक्यात मला आनंद का झाला हे लिहावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 23652

मिसळपाववर आणिबाणी...

Published on 16/12/2007 - 10:59 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, या पत्राद्वारे मिसळपाववर आम्ही आणिबाणी जाहीर करत आहोत याची सर्वप्रथम सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. मराठी भाषेमधून 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते' या न्यायाने इथे उत्तम ललित, तसेच वैचारिक लेखन लोकांना करता यावे, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता यावा म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. सुरवातीला काळजीवाहू पंचायत समिती, त्यानंतर निवडणुका व निवडून आलेली पंचायत समिती या घटनांमधून मिसळपाववर लोकशाही तत्वे आणण्याचा प्राथमिक प्रयत्न झाला. परंतु लोकशाही ही संकल्पना देखील अनेक कंगोरे, अनेक छटा असणारी संकल्पना आहे आणि तिलाही बर्‍याच फेजेसमधून जावे लागते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 13005

भक्तीची शक्ती...

Published on 16/12/2007 - 09:55 प्रकाशित मुखपृष्ठ
भक्तीची शक्ती... मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं. त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं.
लेखनविषय:

याद्या 3752

मिसळपावाची घटना : लोकशाही संस्था : "लोक" म्हणजे कोण?

Published on 16/12/2007 - 03:55 प्रकाशित मुखपृष्ठ
आजकाल मिसळपावाची "घटना" किंवा "नियमावली" लिहिण्याबाबत चर्चा होत आहे. या बाबतीत "लोकशाही" हा शब्द पुष्कळदा वापरात आलेला दिसतो. देशांच्या/राज्यांच्या बाबतीत लोकशाही म्हणजे काय, याबद्दल आपण नागरिकशास्त्रात शिकलेलो आहोत, आणि जगातील विविध उदाहरणांनी "राज्यात लोकशाही म्हणजे काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो. राज्यातले "लोक" कोण? याबद्दल एकमत नसेल तरी जवळजवळ एकमत आहे. राज्यात हक्काचे रहिवासी हे त्या राज्यातले लोक.

याद्या 8320