Skip to main content

आमची बायको कुत्रा पाळते

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 08/11/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमची बायको कुत्रा पाळते तुम्ही पाळून देऊ नका आमच्या पायाखाली जळते तुम्ही पोळून घेऊ नका.
कुत्रे पाहून मैत्रीणीकडे वेडे खूळ मनात भरले आपण पपी घेऊ गडे लाडे लाडे फर्मान सुटले
भलतीच पपी वाटली मला घेऊ ग लवकर, म्हटले पपी नव्हे, घात झाला कुत्रे शोधणे सुरू झाले.
अल्सेशियन, बव्हेरियन डोबरमॅन, चिव्हावा सारे कनाईन धुंडून पामेरोरियन ठरला घ्यावा
नकद चार हजार मोजून शुभ्र कुत्रा हिने खरिदला सतत लाड त्याचे पाहून माझा भाव खाली उतरला
पपीची खेळणी आणि खाऊ रोज हिची धावपळ बघून वाटे पपीला गिळू की खाऊ सारखा
Taxonomy upgrade extras

आप्पा आणि बाप्पा

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 08/11/2008 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
" काहीतरी उद्योग काढ बघू" आप्पा प्रधान " आता गुपचूप झोप " बाप्पा सरमळकर " अरे बाप्पा मनाला काहीतरी चाळा हवा ना" " खरच नको रे आप्पा. गेल्यावेळेला काय गोंधळ झालेला. आठवतय ना? त्यांनी आपल्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला असता. आपण बाबा-पूता केल म्हणून थोडक्यात निभावल " " आता त्याची आठवण कशाला ? " " मग आता का चिडतोस ? " " चिडत नाही. पण आत्ता काय करायचय बोल ?" " ठीक आहे. तूझा जर एवढा आग्रहच असेल तर..." . *************************************************************************************** आप्पा सबनीस आणि बाप्पा महाले हे दोघ जीवश्च कंठश्च मित्र. आप्पा थोडासा घाबरट. तूमच्या आमच्या सारखा.

सदू आणि दादू

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 08/11/2008 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
सदू आणि दादू नेहेमी प्रमाणेच गोदू ची वाट पहाताहेत. पण ह्यावेळी ते प्रत्यक्ष भेटत नसून मिसळ पाव वर भेटताहेत ) सदू : नमस्कार मंडळी. कोणी आहे का इथे (हसणारी बाहुली) दादू : नमस्कार सदू. मी आहे (हसणारी बाहुली) सदू : तू आहेस का मला वाटल कुणीच नसणारै (मनात : कशाला उगवलास रे अवेळी. चांगला एकांतात भेटणार होतो गोदूला) दादू : अरे पण तू ह्या वेळी कसा काय (मनात: चल कट बर लवकर) सदू : अरे थोड कंपनीच काम करत होतो. आता आटोपल.

चमचमीत भरली वांगी

लेखक आकांक्षा यांनी शनिवार, 08/11/2008 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ लहान वांगी, १ मोठा बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेली कोथिंबीर, तेल, तिखट, हळद, मोहरी, गोडा मसाला, कांदा लसुण मसाला, चवीपुरती साखर (आवडीनुसार), मीठ, दाण्याचा कुट (साधारण पाउण वाटी), ताज दही अथवा लिंबू कॄति: प्रथम वांगी भरण्याचा मसाला तयार करुन घेणे. त्यासाठी दाण्याचा कुटामध्ये दही किंवा लिंबू घालावे, मग कांदा लसुण मसाला, तिखट, गोडा मसाला, मीठ आणि चवीपुरती साखर घालावी व ते व्यवस्थित मळुन घेणे. हे सईल नसावे. आता वांग्याना उभी चिर देऊन त्यात हे मिश्रण भरावे. आता कढईत २ चमचे तेल घ्यावे. गरम झाले की मोहरी घालावी व थोडी कोथिंबीर घालावी. कोथिंबीरीचा सुगंध दरवळला की वांगी सोडावीत.

गदर संस्थापकाची १२४ वी जयंती

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 07/11/2008 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे याम्ची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष! डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले.

"हलो"ह्या शब्दातली क्षमता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 07/11/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले. नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं. नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं, "हा माझा मित्र ,सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केलीअसून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं."हलो" ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाही तरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणा

काटेकोरांटीची फुलं.

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 07/11/2008 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी.

बिहार-२

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 07/11/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
बिहाराच्या प्राप्त स्थितीत आता बिहारी प्रजेने काय करावयाला हवे असा विचार माझ्या मनात आहे.बिहारी लोकांनी राजकिय भंपकपणा आणि उथळ प्रचाराच्या बाहेर यायला हवेच. राहुल राज प्रकरणात / धर्मराज प्रकारात बिहारी राजकिय नेते एक येत आहेत असे दृष्य दिसले. त्याचे कारण म्हणजे त्यांना बिहारच्या अस्मितेचा कळवळा असे न समजता लो़काना दिशाभुल करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग नाही हे आहे. आज नाही तर उद्या बिहारी लोकांनी त्यांना जाब विचारायला हवा की भारतातील गरीबी, शैक्षणिक दारिद्र्यता आणि विषमता आपल्याकडेच का आहे? कोणी सुखासुखी आपला प्रांत सोडत नाही, बेरोजगारीने या गरीब लोकांना इतरत्र जावे लागते.