Skip to main content

(काही कविता का प्रश्न ?)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली. आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं.
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपीतले

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 28/11/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी कोल्हापुरी दादा नाद करायचा नाही..... अहो घाबरुन जाउ नका ही फक्त बोलण्याची पद्धत आहे . तर मी एक ११वीत शिकणारा विद्यार्थी आहे .आणि स्वघोषित लेखक .. तर मी आजच या हॉटेलचा कायमस्वरुपी सदस्य झालो त्यामुळे हा माझा पहिला लेख ...येथील नियमांची अजुन पुरेशी कल्पना नाही त्यामुळे सांभाळुन घ्या. मी माझे मन मोकळे करण्यासठी लिहितो पण हे मन म्हणजे काय . त्याचीच गोष्ट सांगणारा आणि माझ्या लेखनप्रवासाचा श्रीगणेशा करणारा हा लेख ....
मनाच्या कुपीत
जगाची रचना करून दमलेले देव शांतपणे विश्रांती घेत बसलेले होते.पण देवच ते विश्रांती तरी किती वेळ घेणार .नवीन काय करायचे य

फेसाळत्या सागरतीरी सांज घेते ठाव

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 28/11/2008 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सामंतांची कविता "खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव" फेसाळत्या सागरतीरी सांज घेते ठाव बोटीतून आलास इथे कोण तुझे गाव कुठे मारी गोळ्या कधी उठे बाँबची गाज सांग गड्या ! कभिन्न रात्र संपेल का रे आज सण सण सटासट मारिशी गोळ्या रक्त बघुन बांधवांचे पाणी आले डोळा नको रे भ्याडा! लपू तू असा हॉटेला मधे खेचून काढू आसशील तेथून आता तुझे मढे आवर रे ! सागरा आता तुझी खळ्खळ संपवू कायमची या शेजार्‍यांची मळमळ संपवल्यावीना नका ठेवू शस्त्र आता खाली मोक्ष यांना देण्याची वेळ आता आली कवटी अवांतर : सद्यपरीस्थीतीत कविता अप्रकाशीत करावी लागल्यास माझी हरकत नाही.

मु॑बई डायरी (नोव्हेम्बर ०८)

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 28/11/2008 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मु॑बईवरच्या हल्ल्याच्या बातम्या तुम्हीही पाहील्या असणारच. सगळेच हादरले आहेत. पण व्यक्तिशः मला खूपच धक्का बसला आहे कारण काही दिवसा॑पूर्वीच एका परीषदेच्या निमित्ताने मी चार दिवस मु॑बईत वास्तव्याला होतो. (बुधवार ते रविवार). विचित्र योगायोग म्हणजे अतिरेक्या॑नी जिथे जिथे हैदोस घातला त्या सर्व ठिकाणी मी त्याचवेळी (रात्री दहाच्या पुढे) मनमुराद भटकत होतो. जिवाची अक्षरशः मु॑बई केली होती व ती सर्व वर्णन॑ पुण्यातल्या मित्रा॑ना मारे मिटक्या मारीत करून त्या॑ना जळवल॑ होत॑. आणि गुरूवारी सकाळी टिव्हीवर बातम्या पाहता॑ना डोळ्या॑वर विश्वास बसत नव्हता. आमची परिषद कफ-परेड येथील वर्ल्ड ट्रेड से॑टर इथे होती.

रक्तदात्याना आवाहन

लेखक अभिषेक पटवर्धन यांनी गुरुवार, 27/11/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर जे. जे. हॉस्पीटल मधे रक्ताची निकड आहे. रक्त्दात्यांनी खालील क्रमांकवर संपर्क साधावा. ०२२ २३७३९०३१

सलाम त्या शुराना .....शहिद झालेल्या विराना

लेखक ग्रीष्म यांनी गुरुवार, 27/11/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
{मुंबईत झालेल्या कालच्या बोम्ब स्फोटात अतेरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या त्या सा-या लोंकाना अन पोलिस कर्मचा-याना ही आदरांजलि ... ) रोजच्या सारखे आई बाबा गेले कामाला पुन्हा येतील घरी परत वाटे आम्हाला .. रात्र झाली कुणाची आई आली बाबा आले पण माझे बाबा रात्री उशिरा येतील हेच वाटले रात्र झाली इतक्यात कुठून तरी आवाज आले बाबा धावत तिकडे गेले ... काही लोक ज्यांच्या हातात मोठी बन्दूक लोकांवर गोल्या झाडी शुर माझे बाबा अन त्यांचे मित्र हाती लहान क्षस्रे तरी त्यांचा पीछा न सोडी.. ह्या आधी बाबा माझे असेच शुरा सारखे लढले होते न जानो कितिक अपराधी त्यांच्या पायाशी येउन नि
Taxonomy upgrade extras

पश्चात्य प्रसार मध्यमांचा निषेध

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 27/11/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरच्या नीच हल्ल्याच्या बातम्या आम्ही सीएनएन वरुन बघत होतो. अशा दु:खद वेळेला आणखी एक क्लेशदायक बाब पहायला मिळत होती. या वाहिनीवर (तसेच त्यांच्या संकेत स्थळावर) भारताच्या नकाशात कश्मिर दाखवतच नव्हते! जागतीक प्रसार मध्यमांनी युनो ने संमत केलेले नकाशे दाखवावेत असा संकेत आहे. युनो ने संमत केलेल्या नकाशात पाकव्याप्त व चीनने गिळंकृत केलेले भाग वगळून काश्मिर भारताच्या नकाशातच दाखवला जातो. अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध! या सारख्या प्रसार माध्यमांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांच्यावर निषेधपत्रकांचा भडिमार करावा असे वाटते.

पोटाची भूक मरणावर मात करते हीच वस्तुस्थीती आहे.

लेखक आम्हाघरीधन यांनी गुरुवार, 27/11/2008 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक बातमी नेहमीच्या सदरातील. भ्याड हल्ल्यांना न घाबरता मुंबईकर पुन्हा सावरले मुंबई - बुधवारी रात्री दक्षिण मुंबईच्या विविध भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर मनात भीतीची सावलीही उमटू न देता सामान्य मुंबईकराने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामाला सुरवात केली आहे. शहरातील सामान्य जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. "ताज' आणि "ओबेरॉय' हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराची कारवाई अजून सुरू असली, तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र आहे.

अप्रकाशित...

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 27/11/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, कायदे तज्ञांच्या सल्लामसलतीनुसार काही सुरक्षिततेच्या कारणांकरता सध्या सुरू असलेल्या मुंबईच्या हल्ल्याशी निगडीत सर्व धागे व प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येत आहेत... आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या चर्चेत गांभिर्याने भाग घेऊन आपापली मते मांडली त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार... कृपया सहकार्य करावे... तात्या.