शिवरायांचा आदर्श बाळगणारा मराठी माणूस अक्षरक्ष: खचला आहे. कारण त्याला न्यूनगंडाने पछाडले आहे. स्वत:च्या कर्तृत्वावर त्याचा तीळमात्र विश्वास राहिलेले नाही. त्यामुळे शिवाजी महाराजानंतर शिवसेनाच आपली तारण हार आहे, असे त्याला वाटते. परंतु मराठी माणसाने वेळीत या मानसिकतेतून बाहेर यावे. कारण शिवसेना ही काही मराठी माणसांचे उन्नयन करणारी संघटना कधीच नव्हती. या संघटनेमुळे ठाकरे यांना पोट भरण्याचा स्त्रोत मिळाला आणि राजकारणात डावपेच खेळण्यासाठी मराठी माणूस मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांसह ठाकरे कुटुंबातील कोणत्याचा वक्तव्याला मराठी माणसाने भुलू नये.