शिवरायांचा आदर्श बाळगणारा मराठी माणूस अक्षरक्ष: खचला आहे. कारण त्याला न्यूनगंडाने पछाडले आहे. स्वत:च्या कर्तृत्वावर त्याचा तीळमात्र विश्वास राहिलेले नाही. त्यामुळे शिवाजी महाराजानंतर शिवसेनाच आपली तारण हार आहे, असे त्याला वाटते. परंतु मराठी माणसाने वेळीत या मानसिकतेतून बाहेर यावे. कारण शिवसेना ही काही मराठी माणसांचे उन्नयन करणारी संघटना कधीच नव्हती. या संघटनेमुळे ठाकरे यांना पोट भरण्याचा स्त्रोत मिळाला आणि राजकारणात डावपेच खेळण्यासाठी मराठी माणूस मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांसह ठाकरे कुटुंबातील कोणत्याचा वक्तव्याला मराठी माणसाने भुलू नये. कारण मराठी माणसाची त्यांना काळजी असती, तर उत्तर भारतीयांना खासदारकी, आमदारकी या संघटनेने कधीच बहाल केली नसती. राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर भांडत होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले, त्यावेळी शिवसेनेचे खासदार संसदेत मूक गिळून गप्प होते. त्यांना राज ठाकरे यांना यशस्वी होऊ द्यायचे नव्हते. याचाच अर्थ मराठी माणूस मेला, तरी चालेल आमचे राजकारण जिवंत राहिले पाहिजे, अशी शिवसेनेची खेळी होती. यातून शिवसेना काय आहे, हे प्रत्येकला समजले आहे. त्यामुळे मुंबईत त्यांचे उमेदवार भूईसपाट झाले.
एका आशावादी मराठी माणसाची भावना वाचा -
http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh…
वाचने
2347
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठ्यांन
मुळातच खचलेल्यांना
निवडणुकीचा हंगाम
सहमत ----------------
In reply to निवडणुकीचा हंगाम by चिरोटा
विचार
कुणाच्या खांद्यावर....
In reply to विचार by नम्रता राणे
आत्ता
सहमत
In reply to आत्ता by यन्ना _रास्कला