Skip to main content

एका आधुनिक अमेरिकन हरिश्चंद्राची करुण कहाणी-पाकिस्तानी अणूबाँब कसा बनला?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 05/11/2009 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या दिवा़ळी अंकात आधीच प्रसिद्ध झाला आहे. तो अंक प्रकशित होऊन ३ आठवदे झाले म्हणून इथे अपलोड केला आहे. लिपी दुसरीच (लोकसत्ता फ्रीडम) आहे, गमभन नव्हे. त्यामुळे शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती! एका आधुनिक हरिश्चंद्राची करुण कहाणी सुधीर काळे, जकार्ता एक प्रामणिक तरुण आपल्या ध्येयवादी व देशभक्तीपूर्ण भूमिकेमुळे व कायदापालनाबाबतच्या ध्यासापायी कसा दारुण अवस्थेला पोचला आणि सरकार एकदा का आपल्या मागे लागले कीं काय अवस्था होते याची ही दर्दभरी कहाणी आहे.

परछाईयां

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 05/11/2009 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
वो जो हममें तुममें करार था... रे सा ध प म ध प म सा रे सा गझल आवडीचीच. गायकही पुरेसा रंगलेला आहे. वो जो हममें तुममें कराssssssर था, तुम्हे याद हो कि ना याssssssssद हो... म ध रे सा नी ध प ध नी ध प म प म ग रे सा सा रे सा... वोही यानी वादा निबाह का, तुम्हे याद हो कि ना हो... आलापी सुरू राहते... विचारांच्या आंदोलनात घेऊन जाण्यास पुरेशी. ईज इट द बिगिनिंग ऑफ द एण्ड? कदाचित. मला नक्की नाही सांगता येणार. काही तरी गडबड आहे हे नक्की. "प्लीज. मला काही दिवस एकटेपणा हवा आहे," हे तुझं वाक्य... त्या दिवशीचं. *** थंडीची करामत कशी असते पहा.

एक प्रवास.... भाग १

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 04/11/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल.

मंडळ निघालं गोव्याला

लेखक प्रभो यांनी बुधवार, 04/11/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर.... असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात"....

(कवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 04/11/2009 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयींची माफी मागुन हे दु:ख विडंबन स्वतःला कवी समजुन काहीजण प्रयत्न करतात ढापले म्हणु नये म्हणून शब्द बदलतात समोर जे जे दिसेल त्यावर कविता करतात भुक्कड माणसे! पण वाचकांना अर्थ लागतोच असं नाही अथवा डोके बंद करुन लिहित असतो कवी! इथेच सगळी गोची आहे फुलांनी नटलेला वसंत अल्लड हसणारी लहान मुले प्रेम, प्रेमभंग, मन, आभाळ, श्रावण, पाउस अन् वर्षानोवर्षे चालणारे फुटकळ विषय सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा काव्य झालेले असते सजलेले, सजवलेले , व्रुत्ताच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- विषय साधे असतात, कवी चलाख असतो!
काव्यरस

[[मुक्तिदाता]]

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 04/11/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण मोडकांची माफी मागून- [मिपावर विडंबन अधिकृत साहित्य प्रकार आहे म्हणून हे धाडस; कृपया राग नसावा] बेलगाम, फुर्रर्रर्र गेला, बेभान, प्रसन्न पवार! पेठांच्या गल्लीबोळात, गर्दीच्या शनिवारातही उताराच्या भुसारीत, चढाच्या कात्रजातही ठरलेल्या वेळेत, जायची घाई नसुनही परवाच घेतलेल्या गाडीत, पुरती प्रॅक्टीस नसुनही वन्य प्राणीमात्रात, बांबूच्या दाट वनातही त्या गोंगाटाच्या रात्री, गणेश उत्सवातही ब्रेक नसलेल्या गाडीत, प्रसन्न बसतो फुकाचा कोण त्याचा मुक्तिदाता माहित असल्यास तुम्ही सांगणार!

आठवण

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 04/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ते आठवते का सारे? सर्द संध्याकाळी त्या गुंफुनी हात फ़िरलेले तुला ते आठवते का सारे? गर्द चांदण्या आकाशी अन गहिरे ते उसासे तुला ते आठवते का सारे? फुले उमलता प्रितीची मन हळवे झालेले तुला ते आठवते का सारे? पाठमोरा होऊन जाताना पाश सारे तोडलेले तुला ते आठवते का सारे? या देहाच्या धुरातून अश्रु तुझे दाटलेले तुला ते आठवले का सारे? प्रसन्ना जीके १५-१०-०८
काव्यरस

लोटांगण

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 04/11/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू गुरूर देवो सत्यसाईश्वरा धावत आलो दिल्लीवरूनी सरकारा तारा पट्टपुर्थीश्वरा .... विजय जाहला, सत्ता आली 'खाती ' खाती हवी आम्हाला घास मुखीचा निसटू पाहे कृपा असावी पट्टपुर्थीश्वरा ... महान राष्ट्री भाऊबंदकी लोणी हवे सारे आम्हाला सावलीनेच धरला दावा द्या वरदहस्त पट्टपुर्थीश्वरा ... पोहोच तुमची खालवर पुरती हायकमांडही ढाळीते चवर्‍या उद्दंड जाहला जाणता राजा द्या समज त्यासी पट्टपुर्थीश्वरा ... नतमस्तक हो तुमच्यापुढती दास खुर्चीचे पामर आम्ही बुडत्या नौकेस हात द्यावा घ्या दंडवत पट्टपुर्थीश्वरा ... संदर्भ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरुन धावत येवुन सत्यसाईबाबांची

बाबर , अकबर , पिअर्स

लेखक आंबोळी यांनी बुधवार, 04/11/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, गेले बरेच दिवस पिअर्स साबणाची एक जाहिरात टिव्हीवर दाखवत आहेत. ज्यात "बाबरचा मुलगा हुमायुं... हुमायुंचा ... अकबर" असे वाक्य (कॅची लाईन का काय म्हणतात ते...) आहे. मला इतके दिवसात त्या जाहिरातीचा अर्थ कळालेला नाही. बाबराचा किंवा अकबराचा आणि त्या पिअर्स साबणाचा काय संबंध? बर या कोणी ऐतिहासिक थोर विभुती न्हवेत की ज्यांचे स्मरण करावे वा त्याना आदरांजली द्यावी, त्यांची आठवण रहावी यासाठी हा खटाटोप करायला.

मनसे व सीमावाद धोरण

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/11/2009 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे व सीमावाद धोरण (डिस्केमर: इतर पक्षांबाबत काही ताशेरे येथे नाहीत पण उगाच वाद नको. इतर पक्षाच्या लोकांनी 'मनसे' ऐवजी त्यांच्या पक्षाचे नाव टाकावे व वाचल्यास हरकत नाही. 'मनसे' ही एक मानवी प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्या.) (शेवटी सीमावादातले लोकं मराठी आहेत ते महाराष्ट्रात आले पाहीजे. त्यासाठी पक्षविरहीत राजकारण व्हावे ही माझी ईच्छा. पण तसे होणे नाही. मनसेच्या नावातच 'महाराष्ट्र' आहे. म्हणून तो 'सीमावादाला' जवळचा आहे. असो.) मनसे हा मराठी अस्मिता जपण्यासाठी तयार झालेला पक्ष आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत पक्ष या विचाराला ठिकून राहीलेला आहे.