Skip to main content

ऐका जामातो देवा तुमची कहाणी

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 07/09/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका जामातो देवा तुमची कहाणी, आटपाट नगर होते, तेथे एक शिक्षक कुटुंब राहत होते. त्यांना एक मदनबाण नामक पुत्र होता. पुत्रासाठी खस्ता खाऊन त्यांनी त्याला शिक्षण दिले. वयात येताच पुत्राने काय करावे तर माता-पित्याची इच्छा डावलून आपल्या मनपसंत कन्येशी विवाह करावा. विवाहाच्या काही दिवसांतच गृहकलह उत्पन्न झाला. सासू-सुनेचे वाद-विवाद होऊ लागले, त्यात पती भरडला जाऊ लागला. एके दिवशी सून आपल्या पतीचा हात धरून आपल्या माहेरी निघून गेली. काही काळ बरा गेला, नंतर काय होऊ लागले, तर श्वशुरगृही जामाताचा मान कमी-कमी होऊ लागला, ‘जामातो दशम ग्रहम’ सारखी वाक्ये कानी पडू लागली.

मंदिराचा मालक देव, पुजारी केवळ नोकर (मध्यप्रदेश कोर्टाचा निर्णय)

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 07/09/2021 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिराची मालमत्ता तिथे देवाची सत्ता विकायचा विचार कसा करे नोकर पुजारी केवळ सेवक मालक असतो देवक पुजा-याला नाही जमीननोंदी कोर्टाने केले स्पष्ट तोंडी वापरकर्ता या रकान्यातही लिहिण्याची नाही गरज, मध्यप्रदेश कोर्टाने पुजा-यांचा अर्ज केला खारीज OMG चा हा जणू पुढील भाग न खात्या देवाचा नैवेद्य च नव्हे तर भुखंडाचे श्रीखंड ही खाण्याला कोर्टाची चपराक. https://www.loksatta.com/desh-videsh-news/temple-property-deity-pujari-…
काव्यरस

प्रवास कसला? फरफट अवघी!

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 07/09/2021 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी ( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे ) https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA अजुन उजाडत नाही ग! दशकामागून सरली दशके अन् शतकाच्या गाथा ग! ना वाटाचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग! पथ चकव्याचा, गोल, सरळ वा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफट अवघी! पान जळातून वाही ग... कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे नसते काही असले ग त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग तमातली भेसुर शांतता...
काव्यरस

तीन इच्छा

लेखक भागो यांनी सोमवार, 06/09/2021 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.

कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 06/09/2021 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.

प्रमादाच्या पथावर

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 05/09/2021 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या.

शांतीचा रस्ता –मेहेराबाद

लेखक Bhakti यांनी रविवार, 05/09/2021 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो.... मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती.

इम्पिरिकल डेटा

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 04/09/2021 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आले कुटीस मेटा सारे ओबीसी नेता हा इम्पिरिकल डेटा कुणी देता का हो डेटा आरक्षणाचा रेटा वकिलांना जा भेटा इलेक्शन ती येता बांधू कुणाचा फेटा 75 वर्षात भरल्या तुंबड्या जनतेस मात्र कुबड्या बाता त्या बड्या बड्या कोर्टात पडल्या उघड्या पाहिजे जरी आरक्षण सीमेवर करा त्या रक्षण सैन्यात जो दणादण त्या कुटुंबास आरक्षण येता नवीन ती पिढी नका लावू ही शिडी व्यसने दारू काडीबिडी आयुष्य नाही सापशिडी धमनीत लाल रक्त सर्वांच्याच आहे फक्त आला आता हा वक्त फेकून कुबड्या व्हा मुक्त ! फेकून कुबड्या व्हा मुक्त !!
काव्यरस

स्मरण चांदणे४

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 03/09/2021 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे  ४ गाव कधी  वसले याची  निश्चित माहिती नाही. कुठुनतरी स्थलांतरीत झालेल्या ब्राम्हण कुटुंबांनी इथे स्थायिक झाली असावीत.आमच्या पुर्वजांना देशमुखी कुणी  दिली ,केव्हा मिळाली माहिती नाही. माझ्या आठवणीत  आडगावशिवाय इतर काही गावात पण शेती होती.