Skip to main content

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

तुझ्या रूपातले राग

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 29/05/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती यांची क्षमा मागुन... काही दारात बारात, थोडे वेळात चुकले, माझ्या मनात होते, का तु झोपुन घेतले?.. रात्री जागवल्या साधु, राज-हरणाला पीत आर्त विनवण्या केल्या जोगियाच्या प्रहरात भल्या पहाटेला मस्तक तुझ्या चरणी झुकले काळजात कोमेजले मुक्या मागण्यांचे नि:श्वास तरि नकाराचा तुझ्या नाही केला ग दुस्वास घोरण्याच्या सुरांत तुझ्या, माझ्या मागणीला जपले मल्हाराच्या लडिवाळ, सरी आळवल्या कानात, आळविले दाराचे सूर, ठेवुन आशा ग मनात तुझ्या भुपाळाच्या ताना, वाटे निमीत्त हुकले.
काव्यरस

गणपतीपुळे बद्दल माहिती हवी आहे...

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 29/05/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीपुळे ला पुण्याहून जायचे आहे. पुढच्या आठवड्यात. कसे जायचे म्हणजे प्रवास सोयीस्कर होईल? तेथे किती दिवसांत बघून होते? आसपास अ़जून बघण्यासारखे आहे का? मध्यमवर्गाला परवडण्यासारखे हॉटेल / गेस्ट हाऊस वगैरे याबद्दल माहिती हवी आहे. इंटरनेटवर हे सर्च करुन माहिती मिळेल याची मला कल्पना आहे. पण, जे मिसळपाव चे वाचक आधी जावून आलेले आहेत ते याबाबत अधिक माहिती सांगू शकतात म्हणून येथे धागा टाकतो आहे.

शांताराम कादंबरी: घ्यावी का विकत???

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 29/05/2010 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच "शांताराम" ह्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स लिखित मुळच्या आंग्ल भाषेतील कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. (किंमत-९९० रूपये) तर ह्या कादंबरीचा सारांश कुणी सांगेल काय? मला शांताराम संग्रही ठेवायची आहे पण जास्त किंमतीमुळे धाडस होत नाही. पण अर्थातच उत्कृष्ट असेल तर मी ती घेइनच. तरी जाणकारांनी शांताराम संग्राह्य आहे का ते सांगावे.

नदीकाठी सासूरवाशीण

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नदीकाठी सासूरवाशीण
अल्याड आहे सासर माझं, पल्याड माहेरा पाहते मधी वाहे चंद्रभागा, त्यात धुनं मी गं धुते || पानी वाहे दुधगंगा, जसं अमृताच्या चवीचं त्याची गोडी काय सांगू, त्याची गोडी अविट || नदीकाठची शाळू वाळू, बारीक बारीक मदी आसतील गोटे, बी संगे खारीक || माहेर मोठं दांडगं, नाही कसली वनवा सासर बाई आसलं द्वाड, त्याला कसली पर्वा || सोडले मोकळे पाय नदीच्या ग पान्यात, ऐन्यात रूप दिसे, रूपे सोनेजडीत || जा ग माय जा ग माय, अशीच ग तू वाहत भरव तुझ्या लेकरांना, चारा देई दुष्काळात || कितीकदा येते
काव्यरस

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
तो: गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग पदर कमरेला विळखा घाली असती आपल्यातच दंग चाल तुझी मोरावानी हरणापरी चपळ अंग कुठं जाशी कुठून येशी सांग सांग सांग पोरी सांग सांग सांग
ती: गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद शिंप्याची चुक झाली केली चोळी त्याने तंग मोर हरणावानी चाल चपळ न्हाई तुझ्यागत फोपशी अंग नसत्या चौकशा करू
काव्यरस

जौहरी की गत जौहरी जाणे *....

लेखक रामदास यांनी शनिवार, 29/05/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक बाजाराची स्वत:ची अशी खास भाषा असते.सांकेतीक असते.रानडे रोडवर जसा *बापट भाव आहे तसा हा प्रकार.जव्हेरी लोक फार पूर्वी एक सांकेतीक भाषा वापरायचे. भाव करण्यासाठी हथ्था वापरायचे. हाताच्या खूणांनी एकमेकांना भाव सांगायचे .काही जव्हेरी बोली भाषा वापरायचे जी फक्त त्यांनाच समजायची. हे सगळं करण्याचा उद्देश असा की खरा भाव ग्राहकाला कळू नये. रत्नपारख्यांच्या राज्यात या सांकेतीक भाषेला फरच महत्व आहे.ग्राहकाची हौस आणि नड यावरच रत्नांचा भाव ठरतो. (व्यावहारीक नजरेतून पाहीलं तर सगळी अनमोल रत्ने फेरविक्रीस घेऊन गेलं तर कवडी मोलाची असतात.

कलकात्याजवळ माओवाद्यांनी ट्रेन उडवली

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 28/05/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/india/Maoists-trigger-train-crash-10… सकाळची बातमी http://72.78.249.107/esakal/20100528/5461284406080672712.htm आज पहाटे १.१५मि. मुंबईला जाणारी ट्रेन कलकात्याजवळ उडवली...अधिकृतरीत्या १०० ठार आणि १६० जखमी...ट्रेन उडवल्यानंतर जवळूनच जाणार्या मालवाहू गाडीखाली आली...इंजिनावरच ६० + मृतदेह...

बालपण...

लेखक मानस् यांनी शुक्रवार, 28/05/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण... दिवाळी चे दिवस … आम्ही सारे आजीच्या घरी सुट्टी साठी आलेले.सारे काके, आत्या वगैरे… दिवाळी म्हणजे फटाके, नवे कपडे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या चुलत-आते भावंडाना भेटून खेळणे मस्ती करणे. दिवाळी ची रात्र. थंडीचे दिवस.आजीचे घर म्हणजे जुना प्रचंड मोठा वाडा होता… मोठ-मोठे तीन चौक, १५-२० पोरांना पळापळी खेळता येईल एवढे पटांगण होता एकेक चौक म्हणजे!! त्याच्या भोवती ओवर्या आणि मग खोल्या… सहा खोल्यांचे घर आजीचे होते… समोरच्या प्रचंड चौकात एका बाजूला केळीचे एक बेट असल्या सारखे… म्हातारी रखमाबाई तिथे भांडी घासत असे. दिवसभर दंगा करून आम्ही पोरे दामून जात असू.